"तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दया; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे." (मत्तय २८:१९-२०)
एस्तेर ८:३-४ म्हणते, "मग एस्तेरने पुनः राजाचे आर्जव केले; ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, यहूद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान अगागी याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी. तेव्हा राजाने एस्तेरपुढे आपला सोनेरी राजदंड केला आणि एस्तेर उठून राजापुढे उभी राहिली."
जरी हामानाचा पराभव केला गेला होता; राजाचे फर्मान अजूनही यहूद्यांच्या विरोधात पक्के होते. राजाने शत्रूला मारले होते; पण त्याचे म्हणणे हे लागू होते. लोकांना मारण्याची नियुक्त केलेली वेळ अजूनही जवळ येत होती, आणि लोक वध करण्याचे फर्मान पूर्ण करण्यास तयार झाले होते, जे म्हणते, की त्या सर्वांना मारून टाका."
तुम्ही याची कल्पना करू शकता की ते किती धोकादायक झाले असते जर वेळेवर काहीही केले गेले नसते. तथापि एस्तेर ८:१० मध्ये बायबल म्हणते, "मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रे लिहून त्यांवर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचर व सांडणी यांच्या स्वारांवर डाकेने रवाना केली."
राजाला अगोदरच्या फर्माना विरोधात वेगवान घोड्यांवर दुसरे फर्मान पाठवावे लागले नाहीतर वध करण्याचे काम काही ठिकाणी चालू राहिले असते आणि उपास व प्रार्थना या व्यर्थ ठरल्या असत्या. म्हणून एस्तेरने तिच्या लोकांना वाचविण्यासाठी मध्यस्थी केली. मध्यस्थी करणे ही आता प्रत्येक चर्च मध्ये काळाची गरज झाली आहे म्हणजे आत्मे ही वाचविली जावीत. दुर्दैवाने, ही आज सर्वात दुर्लक्षित सेवा आहे.
जरी ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावर विजय मिळविला आहे, मध्यस्थीची गरज आहे की त्या विजयास कार्यरत करावे. तथापि, मध्यस्थी पाठोपाठ जाणे आणि लोकांना सुवार्ता सांगण्याची गरज आहे. मध्यस्थीनंतर सुवार्ता सांगितली पाहिजे. वाईट बातमी पेक्षा सुवार्ता अधिक वेगाने जायला पाहिजे; म्हणून सरकारी घोड्यांचा वापर करण्यात आला-ते साधारण घोड्यांपेक्षा वेगवान होते. वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन तेथे तातडीची भावना होती.
आतापर्यंत लोकांना वाईट बातमीची सवय झाली आहे, पण आता सुवार्ता सांगण्याची वेळ आहे. येशूचे बोलणे हे आज्ञा देण्याचे वाक्य होते ते आपल्याला काय करायचे आहे ते सांगते. आता जेव्हा त्याजकडे सैतानावर सामर्थ्य आहे, त्याचा पराभव केल्यामुळे, आता त्याजजवळ जीवन व मृत्यूची किल्ली देखील आहे. आपल्याला लोकांना सांगण्याची गरज आहे म्हणजे ते सतत त्रासात राहणार नाहीत. आपणांस त्यांना सांगण्याची गरज आहे की त्यांना सतत पापात राहावयाचे नाही कारण त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आता प्रयोजन आहे. योहान ८:३६ म्हणते, "म्हणून जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल."
येशूने त्यांना स्वतंत्र केले आहे; त्यांना ही बातमी मिळाली पाहिजे. त्याने त्यांचे आजार व रोगांसाठी किंमत भरली आहे. त्याने ते काढून टाकले आहे आणि त्यास वधस्तंभावर खिळिले आहे. त्याने पूर्णपणे भरले आहे, म्हणून त्यांना येथूनपुढे आजारात मरण्याची गरज नाही. त्याने किंमत भरली आहे म्हणजे ते चांगल्या आरोग्यात चालू शकतात. आपल्या जीवनाच्या त्रासापासून तो आपल्याला शांति देण्यासाठी आला. ही सुवार्ता आहे जिला आपणांस जितक्या वेगाने पसरविता येऊ शकते तितक्या वेगाने पसरविण्याची गरज आहे.
आपणांस सर्वात वेगवान घोड्यावर बसण्याची गरज आहे आणि सुवार्ता पसरविली पाहिजे. शत्रू लोकांना मारीत आहे आणि त्यांना फसवीत आहे, म्हणून आपल्याला सोडविणारे एजंट म्हणून उभे राहिले पाहिजे. त्यांनी पाप व मृत्युच्या बंधनातून मुक्त व्हावे म्हणून जेव्हा आपण मध्यस्थी करतो, तेव्हा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहचण्याची देखील गरज आहे. सुवार्ता पसरविण्यासाठी शक्य तितक्या माध्यमांचा उपयोग चला आपण करू या. सैतान हा पराभूत केला गेला आहे. आणि आपण मुक्त आहोत.
एस्तेर ८:३-४ म्हणते, "मग एस्तेरने पुनः राजाचे आर्जव केले; ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, यहूद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान अगागी याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी. तेव्हा राजाने एस्तेरपुढे आपला सोनेरी राजदंड केला आणि एस्तेर उठून राजापुढे उभी राहिली."
जरी हामानाचा पराभव केला गेला होता; राजाचे फर्मान अजूनही यहूद्यांच्या विरोधात पक्के होते. राजाने शत्रूला मारले होते; पण त्याचे म्हणणे हे लागू होते. लोकांना मारण्याची नियुक्त केलेली वेळ अजूनही जवळ येत होती, आणि लोक वध करण्याचे फर्मान पूर्ण करण्यास तयार झाले होते, जे म्हणते, की त्या सर्वांना मारून टाका."
तुम्ही याची कल्पना करू शकता की ते किती धोकादायक झाले असते जर वेळेवर काहीही केले गेले नसते. तथापि एस्तेर ८:१० मध्ये बायबल म्हणते, "मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रे लिहून त्यांवर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचर व सांडणी यांच्या स्वारांवर डाकेने रवाना केली."
राजाला अगोदरच्या फर्माना विरोधात वेगवान घोड्यांवर दुसरे फर्मान पाठवावे लागले नाहीतर वध करण्याचे काम काही ठिकाणी चालू राहिले असते आणि उपास व प्रार्थना या व्यर्थ ठरल्या असत्या. म्हणून एस्तेरने तिच्या लोकांना वाचविण्यासाठी मध्यस्थी केली. मध्यस्थी करणे ही आता प्रत्येक चर्च मध्ये काळाची गरज झाली आहे म्हणजे आत्मे ही वाचविली जावीत. दुर्दैवाने, ही आज सर्वात दुर्लक्षित सेवा आहे.
जरी ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावर विजय मिळविला आहे, मध्यस्थीची गरज आहे की त्या विजयास कार्यरत करावे. तथापि, मध्यस्थी पाठोपाठ जाणे आणि लोकांना सुवार्ता सांगण्याची गरज आहे. मध्यस्थीनंतर सुवार्ता सांगितली पाहिजे. वाईट बातमी पेक्षा सुवार्ता अधिक वेगाने जायला पाहिजे; म्हणून सरकारी घोड्यांचा वापर करण्यात आला-ते साधारण घोड्यांपेक्षा वेगवान होते. वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन तेथे तातडीची भावना होती.
आतापर्यंत लोकांना वाईट बातमीची सवय झाली आहे, पण आता सुवार्ता सांगण्याची वेळ आहे. येशूचे बोलणे हे आज्ञा देण्याचे वाक्य होते ते आपल्याला काय करायचे आहे ते सांगते. आता जेव्हा त्याजकडे सैतानावर सामर्थ्य आहे, त्याचा पराभव केल्यामुळे, आता त्याजजवळ जीवन व मृत्यूची किल्ली देखील आहे. आपल्याला लोकांना सांगण्याची गरज आहे म्हणजे ते सतत त्रासात राहणार नाहीत. आपणांस त्यांना सांगण्याची गरज आहे की त्यांना सतत पापात राहावयाचे नाही कारण त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आता प्रयोजन आहे. योहान ८:३६ म्हणते, "म्हणून जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल."
येशूने त्यांना स्वतंत्र केले आहे; त्यांना ही बातमी मिळाली पाहिजे. त्याने त्यांचे आजार व रोगांसाठी किंमत भरली आहे. त्याने ते काढून टाकले आहे आणि त्यास वधस्तंभावर खिळिले आहे. त्याने पूर्णपणे भरले आहे, म्हणून त्यांना येथूनपुढे आजारात मरण्याची गरज नाही. त्याने किंमत भरली आहे म्हणजे ते चांगल्या आरोग्यात चालू शकतात. आपल्या जीवनाच्या त्रासापासून तो आपल्याला शांति देण्यासाठी आला. ही सुवार्ता आहे जिला आपणांस जितक्या वेगाने पसरविता येऊ शकते तितक्या वेगाने पसरविण्याची गरज आहे.
आपणांस सर्वात वेगवान घोड्यावर बसण्याची गरज आहे आणि सुवार्ता पसरविली पाहिजे. शत्रू लोकांना मारीत आहे आणि त्यांना फसवीत आहे, म्हणून आपल्याला सोडविणारे एजंट म्हणून उभे राहिले पाहिजे. त्यांनी पाप व मृत्युच्या बंधनातून मुक्त व्हावे म्हणून जेव्हा आपण मध्यस्थी करतो, तेव्हा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहचण्याची देखील गरज आहे. सुवार्ता पसरविण्यासाठी शक्य तितक्या माध्यमांचा उपयोग चला आपण करू या. सैतान हा पराभूत केला गेला आहे. आणि आपण मुक्त आहोत.
Prayer
पित्या, वधस्तंभावर तुझ्या बलिदानाबद्दल मी तुझे आभार मानतो. मी तुझ्या पूर्ण केलेल्या कामासाठी तुझे आभार मानतो ज्याने मला आजाराच्या बंधनातून मुक्त केले आहे. मी प्रार्थना करतो की तू मला तुझ्या आत्म्याने सक्षम कर की जेथे कोठे मी जातो तेथे सुवार्ता पसरवावी. मी प्रार्थना करतो की तुझा चांगला हात मजवर राहो आणि वास्तवात तू मला एक बदललेला एजंट असे घडवेल. सुवार्ता पसरविण्यापासून मला काहीही अडथळा करणार नाही. महान आज्ञा पाळण्यासाठी मी कृपा प्राप्त करतो. येशूच्या नावाने. आमेन.
Most Read
● आपण वर घेतले जातील (रैप्चर) तयार आहात का?● राग समजून घेणे
● एक घुंगरू व एक डाळिंब
● चालण्यास शिकणे
● कालेबचा आत्मा
● उपास कसा करावा?
● आदर व ओळख प्राप्त करा
Comments