उपदेशक ३: १-३ मध्ये
सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो,
जन्मसमय व मृत्यूसमय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो,
वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो.
संयम ठेवण्याचा अपरिहार्य व अचल असा परिणाम शलमोन ने ओळखला होता. मंदिर बांधण्यासाठी सात प्रदीर्घ, कठीण व त्रासदायक वर्षे लागली होती. परंतु त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केले.
गलती ६:९ मध्ये आपण वाचतो, "चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल."
जेव्हाउपदेशक मध्ये लिहिलेले हे वचन स्पष्ट करते, ...प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. (उपदेशक ३:८)
त्याने प्रत्येक काळ आत्मसात केला, त्या प्रत्येकाकडून शिकला, आणि प्रत्येकाकडून ज्ञान प्राप्त केले.
यशस्वीहे त्यांच्याभोवती होणाऱ्या दु:खद गोष्टींना नेहमीच रोखू शकत नाही, परंतुते त्यांच्या जीवनात अत्यंत दु:ख होऊ नये यापासून रोखू शकतात. महान लोकांना मोठे दु:ख ठाऊक असते.
आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनविली आहे; त्याने मनुष्याच्या मनात [एक गूढ इच्छा ज्यास येथे पृथ्वीवर कोणीही समाधान करू शकत नाही, केवळ परमेश्वर] अनंतकालाविषयीची [एक दैवी उद्देशाच्या अर्थाने] कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम [त्याचे सर्वागीण योजना] मनुष्याला उमगत [समज, ज्ञान] नाही. (उपदेशक ३:११ ऐम्पलीफाईड बायबल)
मला हे देखील समजून आले की देव जे काही करितो ते सर्वकाळ राहणार; ते अधिक करिता येत नाहीव उणे करिता येत नाही; मनुष्याने त्याचे भय धरावे {आश्चर्यचकित होऊन आदराने, हे जाणून की तो देव आहे)म्हणून देव असा क्रम चालवितो.(उपदेशक ३:१४ ऐम्पलीफाईड बायबल)
जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे; आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे; आणि देव गत गोष्टी पुनः आपल्यापुढे आणितो.(उपदेशक ३:१५)
काय वेळ ही गुणधर्मात चक्रीय आहे?
इतिहास पुन्हा घडत आहे हे अगदी ठाऊक वस्तुस्थिती आहे.