मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर ठळक लिही;
म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे.
कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे,
तो फसवावयाचा नाही;
त्यांस विलंब लागला तरी त्याची वाट पाहा;
तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही. (हबक्कूक २:३-४)
तसे पाहिल्यास, ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक नष्ट होतात. (नीतिसूत्रे २९:१८)
तुमचे दृष्टांत पाहा
7 मुख्य गोष्टी: दृष्टांत
१. दृष्टांत हा केवळ त्या व्यक्तीला प्रगट होईल जो ऐकण्याच्या मनस्थितीत आहे.
तुम्हाला एकटेच देवाबरोबर व्हावे लागते की त्याचे मार्गदर्शन प्राप्त करावे. तुमचे ठिकाण हे तळघरात एक खोली असू शकते, राहण्याची खोली जेव्हा सर्व जण झोपले आहेत, पहाटेचे चालणे, किंवा बागेत एखादे शांत ठिकाण. तुमचा त्याच्याबरोबरील वेळ व्यत्यय विरहित असला पाहिजे. तुमचे मोबाईल उपकरण बाजूला ठेवा,टीवी बंद करा, तुमचे फेसबुक पान बंद करा आणि तुमचे कुटुंब व मित्र यांना सांगा की तुम्हाला अडथळा करू नये. याकोब देवाबरोबर एकटा होता. उत्पत्ति ३२:२२-३२
२. दृष्टांत हा लिहिला पाहिजे.
देवाचा धावा करण्यात तुम्ही वेळ घालविल्यानंतर, संपूर्ण सव्विस्तर माहिती लिहून काढा जे तो तुम्हाला प्रगट करतो. त्यास वर्तमान काळात लिहा, जसे काही ते अगोदरच घडले आहे. एक लिहिलेला दृष्टांत तुम्हांला एक योग्य दिशा देतो आणि तुमच्याबरोबर सहकार्य करतो ज्याची तुम्हाला गरज आहे कीत्या इच्छित अंतिम परिणामापर्यंत जावे. ते तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देते ज्याची तुम्हाला गरज आहे की जीवनाच्या कठीण आवाहनातून मार्ग काढावा.
नुकतेच, मी एक मासिक वाचत होतो, ज्यामध्ये लोकांवर फारच मनोरंजक अभ्यास होता जे हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून पाच वर्षांपूवी पदवीधर होऊन निघाले होते. त्यांनी पाहिले की काही पदवीधर बिझनेस मध्ये फार चांगले करीत आहेत, शेकडो हजार डॉलर किंवा अधिक कमवीत आहेत आणि इतर हे केवळ थोडे बहुत कमवीत होते. का काही लोक उत्कृष्ट कार्य करीत होते आणि इतर हे त्याच मार्गात चालून व्यवस्थित पाय रोवत नव्हते? असे दिसते की ते त्याच्या चौकटीतून बाहेर येण्यात अपयशी ठरत होते. कशाने फरक केला होता?
तुम्हाला ठाऊक आहे काय, कोणताही अपवाद नाही, प्रत्येकजण जे यशस्वी वर्गात मोडत होते त्यांनी त्यांचा दृष्टांत घेतला आणि तो लिहून काढला होता? देवाचे सामर्थ्य कार्यांत येते जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टांत लिहून काढता. तुमची काय इच्छा आहे? चला त्यास कागदाच्या तुकडयावर लिहा, आणि"चान्स" ह्या चौकटीच्या बाहेर पडा.
३.दृष्टांताला स्पष्ट ठेवले पाहिजे.
तुम्हाला तुमचा दृष्टांत साधा, सरळ आणि तुम्ही समजाल त्या भाषेत लिहिला पाहिजे की पाचव्या वर्गातील मुलगा सुद्धा त्यास समजू शकेल. तो दृष्टांत निर्माण करणे जो समजण्यास स्पष्ट व सरळ आहे ते संभ्रम ला काढून टाकते जे तुमच्या प्रगती मध्ये अडथळा करू शकते. एक दृष्टांत जो सरळ आहे तो तुम्हाला प्रेरणा देईल व प्रत्येकामध्ये एक उत्साह निर्माण करेल जे त्याबरोबर जुळलेले आहेत आणि मग ते त्याबरोबर मोठया आग्रहपूर्ण अपेक्षेने कार्यरत राहतील.
४. दृष्टांत हा लावला पाहिजे.
एकदाकी तुम्ही तुमचा दृष्टांत लिहिला, आणि त्यास सरळ केले, तर आता वेळ आहे की त्यास फळ्यावर लावावे म्हणजे जे प्रत्येक त्याबरोबर जुळलेले आहेत ते त्यास वाचूशकतील. तुमचे लावलेले दृष्टांत हे तुम्हाला सतत आठवण देणारे होईल की तुमच्या जीवन, कुटुंब आणि/किंवा विवाहात काय शक्य आहे, जरतुम्ही त्याच्या मार्गदर्शनाचे अनुकरण कराल. ते तुमचे प्रेरणा देणारे होईल कीजीवनाच्या निरुत्साहअडथळे,निराशा, वर प्रभुत्व मिळवावे जे तुमच्या दृष्टांताच्या विरोधात येतात.
लक्षात घ्या पवित्र शास्त्र हे सांगत नाही"चाला". तेसांगत नाही "लोळा". ते सांगत नाही "फेरफटका". ते सांगते "पळा!"
५. दृष्टांत अडथळ्यांवर मात करते.
असा विचार करू नका की कारण देवाने तुम्हाला एक स्पष्ट दृष्टांत दिला आहे की सर्व काही सहज होईल. तुम्ही काही कठीण आवाहनांना तोंड देणार आहात, आणि तुम्ही काही अदृश्य संकटांत संघर्ष करणार आहात. परंतु देवाकडून दृष्टांत तुम्हाला सामर्थ्य आणि धैर्य देतो की त्याच्यामागे तडफदार क्रोधाने आक्रमण करावेजे तुम्हाला समर्थ करते कोणतेही अडथळे पार करावे जे तुमच्या मार्गात येत आहेत.
६. दृष्टांत देवाच्या वेळेत स्वयं प्रगट होईल.
कृपा करून तुमच्या दृष्टांतासाठी घाई करू नका. संयमी राहा.
जेव्हा तुमचा दृष्टांत प्रगट होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या योजना करता, तुम्ही त्या योजनांना तुमच्या वेळेमध्ये घुसडता आणि मग शक्यपणे तुमच्या अंतिम कार्याला उशीर किंवा वेगळ्याच मार्गावर नेता. दृष्टांत प्रगट होतो जेव्हा परमेश्वर योग्य वेळ निश्चित करतो.
७. दृष्टांताला विश्वासा द्वारे जगले पाहिजे.
जितके अधिक तुम्ही तुमच्या दृष्टांतावर केंद्रित राहता तितका अधिक तुमचा विश्वास वाढतो. सावकाश आणि स्थिर विश्वास घेऊन तुमच्या दृष्टांताच्या प्रवासात पाऊल उचलणे हे तुमच्या यशस्वी होण्याला संधी साठी द्वार उघडतात. जर तुम्ही तुमचा विश्वास कार्यरत करण्याचे निवडता, तुम्ही तुमच्या आश्वासित मार्गात चालण्यातधैर्याने पुढे जाल जे दृष्टांत यशस्वी होण्याकडे नेते.
जर तुम्ही ह्या सात मुख्य गोष्टी लागू कराल, तर तुमचा दृष्टांत तुमचे जीवन, कुटुंब आणि प्रत्येकजण जे तुमच्याशी जुळलेले आहे त्यांच्यावर सामर्थ्याने प्रभाव करेल.
"पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही; धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल." (हबक्कूक २:४)
ह्यासत्यावरचाला. हा तुमचा विश्वास आहे जो तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व समस्यांवर प्रभावपाडेल. जेव्हा शत्रू येतो, हा तो तुमचा विश्वास आहे जो तुम्हाला त्यातून सुखरूप घेऊन जातो. हे इतके महत्वाचे आहे की ते बायबल मध्ये चार वेळा पुन्हा पुन्हा म्हटले आहे. कारण त्यांच्यासाठीच देवाची धार्मिकता प्रगट होते विश्वासाकडून विश्वासाकडे.
कारण असे लिहिले आहे, नीतिमान विश्वासाने जगेल. रोम १:१७
....कारण नीतिमान विश्वासाद्वारे जगेल. गलती३:११
माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही. (इब्री १०:३८)
ह्याबाबतीत काहीही तडजोड नाही. तुमचा स्वतःचा विश्वास हा तुमच्या वैयक्तिक विजयाची किल्ली आहे. अनेक लढाई ज्या तुम्हांला लढावयाच्या आहेत त्या वैयक्तिक आहेत. त्यापैंकी अनेक हे सांघिक नाहीत. जरी ज्या सांघिक आहेत त्यात वैयक्तिक प्रभाव आहे. म्हणून त्यापैकी प्रत्यक्षात तुम्हांला कशातही जिंकण्यासाठी, तुमच्या विश्वासाने तेथे योग्यपणे कार्य केले पाहिजे.
कारण जल समुद्राला व्यापून टाकिते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल. (हबक्कूक २:१४)
"जो काष्ठास म्हणतो, जागे हो, मुक्या पाषाणास म्हणतो, ऊठ, त्याला धिक्कार असो! (हबक्कूक २:१९)
मूर्तीपूजे विरुद्ध एक कडक वचन.