अशा गोष्टी तुम्हांला [वारंवार]लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे [सावधीगिरी]आहे. (फिलिप्पै ३:१)
एक पुढारी साठी काही गोष्टी वारंवार सांगणे हे चूक नाही परंतु हे सावधगिरीसाठी सुरक्षितपणा आहे. विषयाचा विचार जर केला तर,येथे काही गोष्टी आहेत ज्यावर सतत जोरदिला पाहिजे.
त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्यादुष्कर्म्यांविषयीसावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा. कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरंवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहो. (फिलिप्पै ३:३-४)
प्रेषित पौलाने आपल्याला ह्या एका वचनात तीन गोष्टी सांगितल्या आहेत.
१. त्या कुत्र्यांविषयी सावध असा
२. त्यादुष्कर्म्यांविषयीसावध असा
३.दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा
प्रेषितपौल ह्या वचनात फसविणारे व हानिकारक लोकांना कुत्रे म्हणत आहे. येशूने शिष्यांना चेतावणी दिली, 'की जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका," (मत्तय ७:६). नीतिसूत्रे आपल्याला प्रगट करते कीकाही लोक त्यांच्या पापांकडे परत जातात जसे कुत्रा त्याच्या ओकीकडे वळतो. हे चित्र स्पष्ट सांगते की जे लोक पापाच्या जीवनाकडे पुन्हा वळतात ते कुत्र्यांप्रमाणे आहेत.
परंतु जास्त निराशाजनक काय आहे ते हे की ते इतरांना तसेच करण्यास शिकवितात. ह्याकारणामुळेच आपण कुत्र्यांपासून सावध असले पाहिजे.
देवाचे काम हे नेहमीच लोकसमुदायाला आकर्षित करते- आणि जेथे मेंढरे ही एकत्र आहेत, तेथे कुत्रे व लांडगे शिकार करण्यास येतातच.
मला ख्रिस्त व त्याच्या पुनरूत्थानाचे सामर्थ्याची ओळख करू घ्यायची आहे. (फिलिप्पै ३:१०)
प्रार्थना:
प्रभु येशू, मला तुझीव तुझ्या पुनरूत्थानाच्या सामर्थ्याची ओळख करू घ्यायची आहे.
तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे. (फिलिप्पै ३:१६)
जे काही आपण प्राप्त केले आहे त्याचा आपण सांभाळ केला पाहिजे नाहीतर ते आपण गमाविणार
कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. (फिलिप्पै ३:१८-१९)
लक्षात घ्या, हे तुमचे शब्द नाहीत परंतु तुमचे आचरण जे प्रत्यक्षात दाखविते की मग तुम्ही वधस्तंभाचे मित्र किंवा शत्रू असे आहात.
ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्यावैऱ्यांचे गुणधर्म:
१. त्यांचा अंत नाश आहे
२. पोट हे त्यांचे दैवत (त्यांचे काम हे देवा पेक्षा अधिक महत्वाचे आहे)
३.निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे
४. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. (ज्यावर तुम्ही तुमचे चित्त लाविता ते निश्चित करते की तुम्ही देवाचे आहातकिंवा नाही.)