तेव्हा लोकांनी व त्यांच्या स्त्रियांनी आपल्या यहुदी भाऊबंदांविरुद्ध मोठी ओरड केली. (नहेम्या ५: १)
महत्वाची समस्या जी नहेम्या समोर होती ती श्रीमंत व गरीब मधील विभाजन कसे हाताळावे. शत्रू जो बाहेर आहे त्यापेक्षा शत्रू जो आत आहे तो फारच धोकादायक आहे.
कित्येक म्हणू लागले की, आम्ही आमचे पुत्र व कन्या मिळून बहुतजण आहो, म्हणून आमचे पोट भरण्यास पुरे इतके अन्न आम्हांस खावयास मिळाले पाहिजे. कित्येक म्हणू लागले की, अन्न मिळावे म्हणून महागाईमुळे आम्हीं आमची शेते, द्राक्षांचे मळे व घरे गहाण ठेविली आहेत.
दुसरे कित्येक म्हणू लागले की, राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षांच्या मळ्यावर आम्हीं पैसा काढिला आहे. वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंदांच्या शरीरासारखीच आहेत व आमची मुलेबाळे त्यांच्या मुलांबाळांसारखीच आहेत.
पाहा, आम्हीं आपले पुत्र व कन्या ह्यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेविले आहे; आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत; त्यांस सोडविण्याची आमच्यांत काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षांचे मळे दुसऱ्यांच्या हाती गेले आहेत. (नहेम्या ५: २-५)
नहेम्या ५: १-५ मधील सुरुवातीच्या वचनात विनाश आणि निराशा ह्या दिसत आहेत. आंतील शत्रू हा इतरांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे कारण तो एकतेला धोका निर्माण करतो.
श्रीमंत आणि गरीब यामधील दरी ही युगानुयुगापासून आहे.यरुशलेम मधील श्रीमंत यहूदी पुढाऱ्यांनी त्यांच्या गरीब यहूदी बंधुजनांना साहाय्य करण्याऐवजी, ते त्यांचे शोषण करीत होते.
अनेक यहूदी जे बैबिलोन मधील कारावास नंतर परत आले होते ते आर्थिकदृष्टया संपन्न होऊन परतले होते (एज्रा १: ११, २ इतिहास ३६: १८). लोकांनी उदारहस्ते दिले जेव्हा मंदिर हे बांधले गेले (नहेम्या ७: ७१-७२).
मी आणखी म्हणालो, तुम्ही जे करीत आहा ते ठीक नव्हे; आपले शत्रू जे विदेशी लोक त्यांच्यामध्ये आपली अपकीर्ती होत आहे, म्हणून तुम्ही आपल्या देवाचे भय धरून चालू नये काय? (नहेम्या ५: ९)
जगाला पश्चाताप करण्यास सांगावयास आपणथांबले पाहिजे जोपर्यंत आपण स्वतः पश्चाताप करीत नाहीत. प्रामाणीकपणा हा घरून सुरु होतो. न्याय हा देवाच्या घरातून सुरु झाला पाहिजे. नहेम्या पुढारी लोकांची कानउघाडणी करतो आणि त्यांना म्हणतो की जे ते करीत आहेत ते देवासमोर योग्य नाही.
यरुशलेम मधील प्रतिष्ठित लोक देवाच्या आज्ञेंचे उल्लंघन करीत होते (लेवीय २५: ३५-४१, २३: १९-२०; अनुवाद २३: १९).
भटकलेल्या जगापेक्षा आपल्याला अधिक जबाबदार धरले जाईल. एके दिवशी आपण सर्व जण प्रभु समोर ह्याचा हिशोब देण्यासाठी उभे राहणार.
हे माझ्या देवा, जे काही मी या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तूं स्मरण करून माझे बरे कर. (नहेम्या ५: १९)
नहेम्या द्वारे परमेश्वराकडे ही प्रार्थना होती.