देवाने आत्मिक वाढ ही सतत पुढे जाणारी प्रक्रिया म्हणून ठरवली आहे. पवित्र शास्त्र विश्वासणाऱ्याच्या जीवनाचे वर्णन वारंवार प्रवास म्हणून करते महिमेपासून महिमेकडे, सामर्थ्यापासून सामर्थ्याकडे, विश्वासापासून विश्वासाकडे जाणे.(२ करिंथकर ३:१८; रोमकर १:१७)
तरीसुद्धा, अनेक प्रामाणिक विश्वासणारे स्थैर्य अनुभवतात. ते देवावर प्रेम करतात, मंडळीमध्ये जातात, अधिकाची इच्छा धरतात; परंतु आत कुठेतरी काहीतरी पुढे जाण्यास विरोध करते. अनेक वेळा ते न दिसणारे ओझे म्हणजेच ठेस असते.
प्रेषित पौल लिहितो:
“तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याचे आज्ञापालन करण्यापासून तुम्हाला कोणाने अडविले?”
(गलातकर ५:७)
येथे लक्ष द्या—प्रश्न काय अडविले असा नाही, तर कोणाने अडविले असा आहे. आत्मिक वाढ अनेकदा तत्त्वज्ञानामुळे नव्हे, तर नातेसंबंधांमुळे खंडित होते. ठेस अंतःकरणात असा प्रतिकार निर्माण करते की आज्ञापालन मंदावते, आत्मिक भूक बोथट होते, आणि देवाच्या आवाजास प्रतिसाद देण्याची संवेदनशीलता कमी होते.
वाढीसाठी शिकण्यास तयार हृदय आवश्यक आहे
आत्मिक परिपक्वतेसाठी नम्रता आवश्यक असते. परंतु ठेस हळूच हृदय कठीण करते; त्यामुळे ताडना म्हणजे हल्ला वाटतो आणि मार्गदर्शन म्हणजे नियंत्रण वाटते.
पवित्र शास्त्र सांगते,
“नाशापूर्वी मनुष्याचे हृदय गर्विष्ठ होते, आणि सन्मानापूर्वी नम्रता असते.”(नीतिसूत्रे १८:१२)
ठेसलेले हृदय शिकण्यास तयार राहत नाही. ते स्वीकारणारे नसून संरक्षणात्मक बनते. जेव्हा शिकण्याची वृत्ती हरवते, तेव्हा वाढ थांबते देव बोलणे थांबवतो म्हणून नव्हे, तर हृदय शरण जाणे थांबवते म्हणून.
नियती नातेसंबंधांद्वारे उलगडते
देव अनेकदा आपली नियती लोकांद्वारे पुढे नेतो—नेते, मार्गदर्शक, कुटुंबीय, आणि कधी कधी कठीण नातेसंबंधांद्वारेही. पण जेव्हा ठेस प्रवेश करते, तेव्हा ती दूर जाणे, अविश्वास किंवा एकटेपणा निर्माण करते आणि देव ज्या मार्गांनी कार्य करणार होता ते मार्गच बंद होतात.
पवित्र शास्त्र म्हणते,
“दोघे एकापेक्षा चांगले; कारण त्यांना त्यांच्या श्रमाचे उत्तम फळ मिळते. त्यांपैकी एक पडला, तर दुसरा आपल्या सोबत्याला उचलतो.”(उपदेशक ४:९–१०)
ठेस आपल्याला एकटे चालायला प्रवृत्त करते; पण नियती क्वचितच एकांतात पूर्ण होते. ज्याला आपण ठेसमुळे दूर ढकलतो, तोच कदाचित देव आपल्या उन्नतीसाठी वापरणार असतो.
विलंबित वाढ म्हणजे पुन्हा-पुन्हा येणारे हंगाम
इस्राएल लोकांनी ज्या प्रवासाला अकरा दिवस लागले असते, तो चाळीस वर्षे वाळवंटात फिरत राहिले.(व्यवस्थाविवरण १:२)
हा विलंब प्रतिज्ञेच्या अभावामुळे नव्हता, तर अंतःकरणातील प्रतिकारामुळे—कुरकुर, अविश्वास आणि ठेसलेले हृदय यांमुळे.
नंतर पौल विश्वासणाऱ्यांना इशारा देतो,
“चला, आपण परिपूर्णतेकडे जाऊया; पुन्हा पाया घालू नये.”(इब्री ६:१)
ठेस लोकांना आत्मिक पुनरावृत्तीमध्ये अडकवते—ज्या धड्यांनी आधीच परिपक्वता आणायला हवी होती, त्याच धड्यांकडे पुन्हा पुन्हा नेते.सुसमाचाराची शुभवार्ता
शुभवार्ता ही आहे: ज्या क्षणी ठेस सोडून दिली जाते, त्या क्षणी आत्मिक वाढ पुन्हा सुरू होते.देव थांबलेल्या विश्वासणाऱ्यांना लाजवत नाही; तो त्यांना पुढे येण्याचे आमंत्रण देतो.
यशया संदेष्टा म्हणतो,
“जे परमेश्वराची वाट पाहतात ते आपले सामर्थ्य नवे करितील.”
(यशया ४०:३१)
नवीनपणा जखमा जपण्यात नाही, तर त्यांना सोडून देण्यात आहे.
Bible Reading Genesis: 25-26
प्रार्थना
प्रभु, माझ्या आत्मिक वाढीस अडथळा आणणारी प्रत्येक ठेस तू मला दाखव.माझे हृदय बरे कर, नम्रता पुनर्स्थापित कर, आणि मला तुझ्या उद्देशांशी पुन्हा सरळ रेषेत आण.मी कटुते पेक्षा परिपक्वतेची निवड करतो.येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-१● भविष्यात्मक मध्यस्थी काय आहे?
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे # 2
● देवाच्या समर्थ हाताच्या पकडीत
● स्तुति ही जेथे परमेश्वर वास करतो
● तुमच्या नोकरी संबंधी एक रहस्य
टिप्पण्या
