"आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे." (नीतिसूत्रे १३:१२)
जेव्हा निराशेचे वारे आपल्या सभोवती आक्रोश करतात, तेव्हा आपल्या अंत:करणात बर्फाळपणाची जाणीव करणे सोपे आहे. निराशा, जसे अनिमंत्रित पाहुण्यासारखे आहे, जे आपल्या अंत:करणाच्या दारावर कोणत्याही वेळेला धडक देऊ शकते, आणि आमची अंत:करणे आजारी आणि आपले आत्मे क्षीण करून ठेवतात. कदाचित ते एक स्वप्न असू शकते जे कायम आवाक्याबाहेर असे दिसते किंवा संधीचे द्वार जे बंदच राहते. ते अनुत्तरीत प्रार्थनांचे प्रतिध्वनी आहे, किंवा अपूर्ण अपेक्षांचा डंख. ही शांतता आहे जी अपूर्ण आशांच्या शून्यामध्ये रेंगाळते.
अशा प्रकारच्या हृदयविकारामुळे मार्ग रात्री जास्त लांब आणि अंधार दाट वाटू शकतो. परंतु लक्षात ठेवा, आपला प्रवास हा सावलीच्या दरीमध्ये संपत नाही. आशेचा देव आम्हांला दुखां:हून वर येण्यास सांगतो, त्याच्या आशेच्या चांगल्या झऱ्यातून पिण्यास आपल्याला आमंत्रित करतो, एक झरा जो कधीही कोरडा होत नाही. "आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी" (रोम. १५:१३).
आशेशिवाय जीवन निराशाजनक परिणामाच्या प्रकारचे जीवन आहे- कंटाळवाणे, उदास आणि थकलेले. परंतु देवाने आपल्याला यासाठी निर्माण केले नाही की सतत निराशेने ग्रस्त जीवन जगावे. त्याने आपल्यात जीवन फुंकले की त्याच्या दैवी रंगांच्या मिश्रणांचा संपूर्ण स्पेक्ट्रम अनुभवावा- रंगांचा आनंद, शांतीचा आश्रय आणि प्रेमाचे रंग. तो आपल्याला अतूट आशेने जीवन जगण्यासाठी बोलावतो, ते जीवन जे त्याच्या सार्वकालिक अभिवचनांमध्ये निर्देशित असावे.
जेव्हा आपल्या जीवनात आशेचे नवीनीकरण होते, तेव्हा ते सूर्याच्या प्रथम किरणासारखे असते जे दीर्घ रात्रीच्या नंतर अंधाराला भेदून जाणारे असते. ते एक दैवी फुंकर आहे, जे आपल्याला स्मरण देते की आपले दु:ख हे कदाचित केवळ रात्रीपुरतेच राहणार, पण सकाळी आनंद येतो. (स्तोत्र. ३०:५)
तेव्हा मग आपण काय करावे, जेव्हा निराशा आपल्या अंत:करणाला आजारी बनवते? पुन्हा आशा करण्यासाठी मग आपण शक्ती कशी प्राप्त करावी?
प्रथम, तुमच्या निराशा देवाला समर्पित करा. प्रभू आपल्याला आमंत्रित करतो की आपण आपल्या सर्व चिंता त्याजवर टाकाव्या कारण तो आपली काळजी करतो (१ पेत्र ५:७). प्रत्येक मोडलेली आशा, प्रत्येक तुटलेले स्वप्न त्याच्या प्रेमळ हातात सुरक्षित आहे. जेव्हा तुम्ही तुमची निराशा त्याजवर सोडून देता, तेव्हा तुमचे अंत:करण हे दैवी शांतीने भरून जाईल, हे जाणून की तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या जीवनाच्या प्रत्येक तपशिलाबाबत विचार करत आहे. मी हे म्हणत आहे कारण अनेकदा मी तशा अवस्थेत होतो.
दुसरे, तुमच्या जीवाला देवाच्या वचनात मग्न करा. पवित्र शास्त्र हे सार्वकालिक आशेचा जिवंत झरा आहे जे देवाचे न बदलणारे अभिवचन आणि त्याच्या स्थिर प्रेमाने भरलेले आहे. "धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले" (रोम १५:४). जेव्हा तुम्ही दररोज त्याच्या वचनावर चिंतन करता, तेव्हा तुमचा आत्मा कालातीत सत्यांद्वारे पुनर्जीवित होईल, ज्याने युगानुयुगे असंख्य लोकांना सांभाळले आहे.
शेवटी, स्तुती आणि कृतज्ञतेचे आचरण विकसित करा. सावली असतानाही, येथे नेहमीच धन्यवादी होण्यासाठी कारण आहे. प्रेषित पौलाने, त्याच्या अनेक संकटांमध्ये, विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन दिले की नेहमी आनंद करा, निरंतर प्रार्थना करा, आणि सर्व परिस्थितीमध्ये धन्यवाद द्या (१ थेस्सलनीका. ५:१६-१८). कृतज्ञता आपले लक्ष आपल्या अभावापासून देवाच्या विपुलतेकडे करते आणि स्तुती आपले आत्मे आपल्या निराशेच्या लाटांवर नेते. जरी तुमचा आत्मा अथक निराशेच्या भाराने भारलेला असला तरीही लक्षात ठेवा, एक अचानक थांबणे, एक दैवी मध्यस्थी, आशेची कुजबुज हे तुमच्या जीवनाला बदलू शकते. आणि याची सुरुवात देवाकडे वळण्याने होते, आणि तुमच्या थकलेल्या आत्म्यामध्ये त्यास नवीन आशेची फुंकर मारू द्यावी.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, निराशेच्या काळात तू आमचा आश्रय आहे; आमच्यात तुझ्या आशेचा फुंकर घाल जे कधीही अपयशी ठरत नाही. आमचे ओझे तुझ्यावर टाकावे आणि तुझ्या अभिवचनांवर अवलंबून राहण्यास आम्हांला मदत कर. आमची शक्ती पुनर्जीवित कर आणि आमचे अंत:करण आनंद आणि शांतीने आणि तुझ्यावरील अटळ आशेने पुन्हा भर. येशूच्या नावाने. आमेन.
Most Read
● तुमच्या पीडे मध्ये देवाच्या अधीन होण्यास शिकणे● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-१
● दैवी शांति मध्ये प्रवेश कसा मिळवावा?
● विश्वासाचे सामर्थ्य
● परिस्थितीच्या दयेखाली कधीही जाऊ नये
● ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात का?
● तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा
टिप्पण्या