एकटयापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यांस ऊब येते;
एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करिता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही. (उपदेशक ४:९-१२)
"एकटयापेक्षा दोघे बरे......"कारण:
त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते-परस्पर श्रम
त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल-परस्पर साहाय्य दोघे एकत्र निजले तर त्यांस ऊब येते-परस्पर प्रोत्साहन त्याना आक्रमणावर प्रतिकार दोघांना करिता येईल-परस्पर सामर्थ्य
येथे काही लोक आहेत, मग काहीही कारण असो त्यांना इतरांची "गरज" लागत नाही. त्यांनाअसे वाटण्यास काय कारण असेल?
हे असे सुद्धा असू शकते मागील काही दिवसात त्यांना खरेच कोणाची गरज लागत होती की त्यांना साहाय्य करावे, त्यांच्या पाठीशी उभे राहावे- आणि कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे त्यांना फारच वाईट आणि दु:खी केले इतके की आता त्यांना वाटते की त्यांना कोणाची गरज नाही. अनेक प्रकारे, त्यांनी असे म्हणणे की त्यांना आता कोणाची गरज नाही हे दर्शविते की त्यांना आता कोणाची कितीतरी गरज आहे.
आपल्यालाचांगले मित्र असण्याची किती गरज आहे याबद्दल शलमोन आपल्याला एक महान ज्ञान सांगत आहे. आपल्याला चांगल्या मित्रांची गरज आहे जेव्हा आपण त्रासातसापडतो, जेव्हा आपल्यावर आक्रमण होते तेव्हा आपली बाजू घेण्यास मदत करावी. आपल्याला चांगल्या मित्रांची गरज आहे की आपल्याला शक्ती पुरवावी जेव्हा आपण अशक्त आहोत. थोडक्यात-आपल्या सर्वांना चांगल्या मित्रांची गरज आहे.
परमेश्वराकडे प्रार्थना करा की तुम्हांला काहीचांगले मित्र दयावेत.
दुसऱ्या व्यक्तीबरोबर चांगली मित्रता बनविणे हे आपल्या कल्याणासाठी महत्वाचे आहे; परंतु सर्वात उत्तम हे आहे की जेव्हा त्या मित्रते मध्ये प्रभु येशू हा तिसरा हिस्सा आहे. "तीन हे त्याहीपेक्षा उत्तम आहेत, कारण तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही."
वरील वचने ही विवाहाच्या संदर्भात प्रचार केली जातात परंतु ती मित्रतेला सुद्धा लागू करता येऊ शकतात.