समजंस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. (रोम ३:११)
एक व्यक्ति जो समज ठेवतो तो देवाचा शोध करेल.
एक व्यक्ति जो देवाचा शोध घेईल तो समज प्राप्त करेल.
सर्व बहकले आहेत,
ते सारे निरुपयोगी झाले आहेत. (रोम ३:१२)
कारण की व्यक्ति जो देवाचा शोध करीत नाही, असा व्यक्ति निरुपयोगी होतो.
सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. (रोम ३:१२)
चांगले करणे हे देवाला जाणण्याद्वारे येते, आणि त्याउलट नाही
चांगले करणे हे तुम्हाला देवाला जाणू देत नाही. देवाला जाणणे हे तुम्हाला चांगले करावयास लावते.
त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे;
त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे;
त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे;
त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. (रोम ३:१३-१४)
वरील वचन मानवी बोलण्यावर भर देते-घसा, जीभ, ओठ व तोंड. बोलणे व चरित्र मधील संबंध हे मत्तय १२:३४ मध्ये दिसते: "कारण अंत:करणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार." पापी हा स्वाभाविकपणे अध्यात्मिकपणात मृत आहे, त्यामुळे केवळ मृत्यू हेच त्याच्या तोंडातून बाहेर येते.
तथापि, येथे आशा आहे की तिरस्कृत तोंड हे परिवर्तीत तोंड होते आणि "येशू ख्रिस्त हा प्रभु" आहे असे स्वीकारते (रोम १०:९-१०). "कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील." (मत्तय १२:३७)
त्यांचे पाय रक्तपात करावयास जाण्याकरिता उतावळे झाले आहेत;
त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ति आहेत. (रोम ३:१५-१६)
वरील वचनात, प्रेषित पौल पाप्याचे पाय चित्रित करीत आहे. जसे पाप्याचे शब्द हे फसवणूक असे आहेत तसेच त्याचे मार्ग हे सुद्धा विनाशकारक असे आहेत.
ख्रिस्ती लोकांचे पाय हे शांतीच्या शुभवर्तमान द्वारे सूचित केले आहे (इफिस ६:१५), परंतु एक हरविलेला पापी, जेथे कोठे तो जातो तेथे मृत्यू, विनाश व संकटे आणतो. ह्या शोकांतिका ताबडतोब घडणार नाहीत परंतु त्या अवश्य येतील. हरविलेला पापी हा एका रुंद मार्गावर आहे जो विनाशाकडे नेतो (मत्तय ७:१३-१४); त्यास पश्चाताप करण्याची गरज आहे, प्रभु येशूवर भरंवसा ठेवावा, आणि अरुंद मार्गावर जावे जो जीवनाकडे नेतो.
त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. (रोम ३:१७)
वरील वचन पाप्याच्या मनावर विचार करते: त्यास देवाच्या शांतीचा मार्ग ठाऊक नाही. हेच तर कारण होते की प्रभु येशू यरुशलेम साठी रडला (लूक १९:४१-४४). पापी व्यक्ति देवाचे सत्य जाणण्यात रुची ठेवीत नाही (रोम १: २१, २५, २८); तो सैतानाच्या खोटेपणावर विश्वास ठेवण्यास प्राधान्य देतो. देवाच्या शांतीचा मार्ग हा केवळ प्रभु येशू ख्रिस्ता द्वारे आहे: "म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपणांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांति आहे. (रोम ५:१)
त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. (रोम ३:१८)
रोम ३:१८ संदर्भ देते स्तोत्र ३६:१ चा, पाप्याच्या उद्धट गर्विष्ठपणाचे वर्णन केले आहे: "त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही." संपूर्ण आढावा घेण्यासाठी, कोणास संपूर्ण स्तोत्र वाचले पाहिजे. रोम ३:१७ मध्ये उल्लेखलेला अज्ञानीपणा हा वचन १८ च्या गर्वा मुळे झाला आहे, कारण हे "देवाचे भय" हा ज्ञानाचा उगम आहे. (नीतिसूत्रे १:७)
देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात. (रोम ३:२४)
न्यायीकरण व पावित्रीकरण मधील फरक
न्यायीकरण ही कृती आहे, प्रक्रिया नाही.
न्यायीकरणाचे येथे कोणतेही मोजमाप नाही; प्रत्येक विश्वासणाऱ्यास देवासमोर उभे राहण्याचा सारखाच अधिकार आहे. तसेच, न्यायीकरण हे काहीतरी जे परमेश्वर करतो, मनुष्य नाही. कोणताही पापी देवासमोर स्वतःला न्यायी ठरवू शकत नाही. सर्वात महत्वाचे, न्यायीकरणाचा हा अर्थ नाही की परमेश्वर आपल्याला नीतिमान करतो, परंतु हे की तो आपल्याला नीतिमान घोषित करतो.
न्यायीकरण ही कायदेशीर बाब आहे. आपल्या स्वतःच्या पापी पणाच्या ठिकाणी आपल्या हिशोब वर परमेश्वर ख्रिस्ताची नीतिमत्ता ठेवतो. आणि कोणीही ह्या हिशोबास बदलू शकत नाही.
न्यायीकरण व पावित्रीकरण मध्ये गडबड करू नका.
पावित्रीकरण ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे परमेश्वर विश्वासणाऱ्यास अधिक आणि अधिक ख्रिस्ता समान करतो. पावित्रीकरण हे प्रतिदिवशी बदलू शकते. न्यायीकरण कधीही बदलत नाही. जेव्हा पापी ख्रिस्तावर भरवसा ठेवतो, परमेश्वर त्यास नीतिमान घोषित करतो आणि ती घोषणा ही कधीही रद्द केली जात नाही. परमेश्वर आपल्याकडे पाहतो, आणि आपल्याशी व्यवहार करतो जसे काही आपण कधीच पाप केलेले नाही!
Chapters