बवाज त्या वडील मंडळीसव सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहा की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्ल्योन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे.
याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रुथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे; ते यासाठी की मयताचे नांव त्याच्या वतनात कायम राहावे, मृताचे नांव त्याच्या भाऊबंदातून व त्याच्या गांवच्या वेशीतून नष्ट होऊ नये; याविषयी तुम्ही आज साक्षी आहा. (रुथ ४: ९-१०)
ह्या वाक्या कडे लक्ष दया: "आज तुम्ही साक्षी आहां"
हे स्पष्ट करते की विवाह सोहळा हा का महत्वाचा आहे, आणि तो नागरी अधिकारी द्वारे का ओळखला जावा. बवाज रुथ वर प्रेम करीत होता ते सार्वजनिक होते, एक प्रेम ज्यास पाहिजे होते की सार्वजनिकपणे साक्षी आणि पंजीकृत व्हावे.
अनेक वेळेला लोक मला विचारतात,"विवाहसोहळा हामहत्वाचा आहे?" "आपण देवासमोर केवळ विवाह करू शकत नाही काय?" "होय-एखादया निर्जन बेटा वर".
परंतु तुम्हीकोणत्याही निर्जन बेटावर नाही. येथे साक्षी आणि नागरी अधिकारी आहेत ज्यांना तुमचे वैवाहिक प्रीतीचे समर्पण घोषित करावयाचे आहे. परमेश्वराला पाहिजे की तुम्ही हे करावे!"
तो तिजपाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. (रुथ ४: १३)
लक्षात घ्या, हा तो परमेश्वर होता ज्याने रुथ ला आशीर्वादित केले की तिला पुत्र व्हावा.
शेजारच्या स्त्रिया "नामी च्यापुत्राला" हाक मारू लागल्या. (रुथ ४: १७)
परमेश्वराने नामी चे क्लेश आनंदात बदलले. परमेश्वर नेहमीच त्याचा लोकांना स्थापित करतो.