त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये. (इब्री २:१)
वाहवत जाण्याविषयी सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे की ती सूक्ष्म अशी आहे व हेतूपूर्वक नाही. मला ठाऊक नाही की एखादा ख्रिस्ती व्यक्ति एका सकाळी उठतो व निर्णय करतो, "मी येथून पुढे प्रभु येशूच्या मागे चालणार नाही." तथापि, प्रत्यक्षात काय घडते ते हे की, येथे प्रार्थना, वचन व मध्यस्थी कडून हळूहळू दूर जाणे होते. वरवर पाहिले तर, कदाचित त्याकडे सर्व वैध कारणे असतील परंतु सखोलतेमध्ये सत्य हे आता ख्रिस्ता ऐवजी जगासाठी अधिक आवड निर्माण होते. आणि एके दिवशी, तुम्ही तुमच्या स्वतःला अचानकपणे पाहता की तुम्ही पित्याच्या घरापासून किती दूर वाहवत गेलेला आहात.
वाहवत जाण्यापासून आपण आपल्या स्वतःला कसे रोखावे?
देवाच्या वचनाच्या सत्याकडे नीट लक्ष देण्याद्वारे-तो आपला संदर्भाचा मुद्दा आहे.
कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. (इब्री २:२)
पहिल्या शतकात यहूदी लोकांद्वारे हे सामान्यपणे स्वीकारले जात होते की देवाचे नियमशास्त्र मोशे ला देवदूतांद्वारे दिले गेले होते-सरळपणे स्वयं परमेश्वरा द्वारे नाही. स्तेफन जो पहिला हुतात्मा, याने यहूद्यांना नियमशास्त्राविरुद्ध जाण्यासाठी खडसावले हे म्हणत, "अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजिलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; पण तुम्ही ते पाळले नाही." (प्रेषित ७:५३)
देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली. (इब्री २:४)
चमत्कार व आरोग्याचा उद्देश हा परमेश्वर त्याच्या वचनाविषयी साक्ष देत आहे.
हा तो परमेश्वर आहे जो त्याचा संदेश मान्य करीत आहे.
देवाच्या अलौकिक सामर्थ्यामध्ये कसे चालावे?
चमत्कारीक पाहण्यासाठी, आपण आपले वचन नाही, परंतु त्याचे वचन बोलले पाहिजे. आपण आपल्या नाही, तर त्याच्या वचनाचा प्रचार केला पाहिजे. परमेश्वर त्याच्या वचनास समर्थन देतो, आपल्या नाही. म्हणून परमेश्वराला त्याच्या वचना साठी मागणी करीत तयारी करा.
थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले
तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” (इब्री २:७—८)
जर परमेश्वराने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमे मध्ये घडविले आहे, तर मग मनुष्य कोणत्याही प्रकारे देवदूतांपेक्षा कमी नाही! देवदूतांना परमेश्वराच्या प्रतिमे मध्ये घडविले गेले नाही. त्यांना एका उद्देश साठी परमेश्वरा द्वारे केवळ निर्माण केले होते; त्यातील एक उद्देश हा संतांची सेवा करावी. तर मग मनुष्य हा देवदूतांपेक्षा लहान कसा असेल?
प्रभु येशूने म्हटले, "मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करितो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळविले आहे." (योहान १५:१५)
मनुष्याचा उद्धार केल्यानंतर, त्यास येशू बरोबर मित्र व सहकारी सुद्धा आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय स्थानात बसलेले आहे इतक्या श्रेष्ठ पदावर चढविले गेले आहे.
आपल्याला ठाऊक आहे की येशू जो स्वयं परमेश्वर आहे जो मनुष्य स्वरुपात पृथ्वीवर आला. तथापि, इब्री २:९ स्पष्टपणे सांगते की, "येशूला सुद्धा तात्पुरत्या स्वरुपात देवदूतांपेक्षा कमी असे करण्यात आले होते. का? मृत्युच्या उद्देशा साठी.
देवदूत हे आत्मिक सत्व आहेत, आणि आत्मे मरत नाहीत! ते अमर सत्व आहेत, ते युगानुयुगे कायम राहतात. म्हणून, मृत्युच्या उद्देशा साठी, मनुष्याला देवदूतांपेक्षा कमी करण्यात आले होते. मनुष्याने अमर सत्व धारण करण्यापूर्वी त्यास मेले पाहिजे, केवळ रुपांतरच्या प्रकरणात जेथे जे ख्रिस्ता मध्ये जीवित आहेत ते मृत्यूचा स्वाद न घेता अमरत्वामध्ये बदलतात.