पाहा, ज्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेविता. (यिर्मया ७:८)
आपण जेव्हा योग्य वचनावर विश्वास ठेवतो, ते आपल्याला लाभ देऊ शकते.
तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजिले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केलेते पाहा. (यिर्मया ७: १२)
शिलोह हे इस्राएल चे मुख्य नगर होते- धार्मिक केंद्र-जवळजवळ ४०० वर्षे. हे ते ठिकाण होते जेथे दर्शनमंडप आणि देवाच्या कराराचा कोश इतके वर्षे राहिला होता. तथापि, एली च्या पुत्रांच्या दुष्टतेमुळे, परमेश्वर लोकांवर क्रोधात होता, आणि देवाच्या कराराचा कोश हा पलिष्टी लोकांनी हस्तगत केला होता. शिलोह चा नाश झाला होता.
आज सुद्धा, अनेक शहरे ही रिकामी चर्च ने भरलेली आहेत; ती शिलोह प्रमाणे आहेत-ठिकाणे जेथे कधी परमेश्वराची उपासना आणि सन्मान केला गेला होता, परंतु आता तसे दिसत नाही.
हा धडा आपल्या हृदयावर कोरला गेला पाहिजे: मग यात पर्वा नाही की किती आध्यात्मिक प्रगती, किंवा सौभाग्य किंवा गौरव कोणाला मिळाले असेल; ते सर्व शून्य होऊ शकते जर आपण देवाची वाणी ऐकणे आणि त्याच्याबरोबर आपले संबंध सुधारण्यास थांबतो.
मुलेबाळे काटक्या जमा करितात, वडील माणसे अग्नि पेटवितात, आणि आकाशराणीप्रीत्यर्थ पोळ्या कराव्या व अन्य देवास पेयार्पणे दयावी म्हणून स्त्रिया कणीक तिबीतात, असे ते मला क्रोधास पेटवितात. (यिर्मया ७:१८)
यहूदा व यरुशलेम ची मूर्तीपूजा हे पारिवारिक आचरण होते. कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला ह्या परराष्ट्रीय देवतेला सन्मान देण्यासाठी एक विशेष भूमिका होती जसे आकाश राणी.
आकाश राणी ही बाबेल ची अष्टरोथ देवी होती, ज्यास ग्रह वेनस बरोबर जोडले आहे, ज्याची उपासना ही, कनानी दैवत, अशेरा, अष्टारोथ, अनाथ च्या पंथा सारखे होते.
मरीये ला कधीकधी "आकाश राणी" हे शीर्षक दिले गेले होते. हे शीर्षक कोणालाही लगेचच एक सुचना देते ज्यास यिर्मया चे पुस्तक ठाऊक आहे.
तुमच्या पूर्वजांस मी मिसर देशातून बाहेर आणिले त्या दिवशी होमबलीविषयी किंवा यज्ञबलीविषयी मी त्यांस काही सांगितले नाही व आज्ञा दिली नाही. (यिर्मया ७:२२)
जेव्हा परमेश्वराने इस्राएल लोकांना सीनाय पर्वत येथे दहा आज्ञा दिल्या, तेथे बलिदान किंवा याजकपण विषयी काहीही नव्हते. ते केवळ नंतर आले, एकदाकी इस्राएल ने करार स्वीकारला (निर्गम २४:१-८). मुद्दा हा स्पष्ट आहे: देवाची प्राथमिकता इस्राएल साठी ही आज्ञा पाळणे ही होती, आणि बली आणि याजकपण हे नंतर होते.
१ शमुवेल १५:२२ प्रमाणे हा तसाच विचार आहे. मग शमुवेल म्हणाला, "परमेश्वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञांपेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे."
आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन-हिन्नोमच्या खोऱ्यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधिली आहेत. (यिर्मया ७:३१)
मंदिरात मूर्तीपूजेपेक्षा अत्यंत वाईट मानवी बलिदान हे यरुशलेमेच्या मुख्य क्षेत्रात करण्यात येत होते.
उच्च स्थाने: पवित्र शास्त्राच्या वेळेची उच्चस्थाने ही नेहमीच उच्च स्थाने नव्हती. ही विशेष उच्च स्थाने, उदाहरणार्थ, खोऱ्यात सुद्धा होती. ते यरुशलेम नगराच्या दक्षिण व पश्चिम दुर्गम खडकाळ भागातील ठिकाण होते. परंतु उच्च स्थाने, हेपवित्र स्थळ, उपासनेच्या उद्देशा साठी एक उंच व्यासपीठ दगडांनी बांधले जात होते.
हिन्नोमच्या पुत्रांचे खोरे हे यरुशलेमच्या मंदिराच्या उच्च भागाच्या दक्षिणेला आहे. ते कचरा टाकण्याचे [तेथे सतत अग्नीचा धूर दिसत असे]ठिकाण तसेच लहान लेकरांचा बळी देण्याचे ठिकाण असे दोन्ही म्हणून वापरीत होते.
अहाज, इस्राएल चा राजा, याने स्वतःच्या पुत्राला अग्नीत बली दिले होते (२ राजे १६:३). तीच गोष्ट मनश्शेच्या दिवसांत घडली, जेव्हा लेकरांना कनान च्या दैवतांना बली दिले जात होते (२ राजे २१:६).
ज्याची आज्ञा मी दिली नव्हती, ना ही माझ्या मनात तेकधी आले होते:
अनेक कनानी दैवता प्रमाणे नाही, याव्हे ने मानव बली देण्याची कधीही आज्ञा दिली नव्हती. परमेश्वर हे म्हणू शकतो की हे त्याच्या मनात सुद्धा कधी आले नाही की अशी गोष्ट विचारावी; ते पूर्णपणे त्याच्या स्वभावाच्या विरोधात होते.
अब्राहामाचे इसहाकाला अर्पण करणे थांबविण्याची घटना (उत्पत्ति २२) हीपरमेश्वरासाठी एकजोर देऊन म्हणण्याचा मार्ग आहे, की"मला कधी मानवी अर्पण नको आहे."