एबद-मलेख राजगृहातून निघाला व राजाकडे जाऊन म्हणाला. (यिर्मया ३८:८)
एक परराष्ट्रीय, (आणि शक्यतो अक्षरशः षंढ), म्हणून एबद-मलेख ला मंदिर आणि अनेक यहूदी सणापासून दूर ठेवले होते (लेवीय २१:२०). तरीहीइतर राज्य करणारे अधिकारी,जे त्या सणात अवश्य भाग घेत असतत्या वर्गापेक्षा त्यास भक्तिभावाचे व दयाळू हृदय होते.
मी आपणांला मसलत दिली तर आपण ती ऐकणार नाही. (यिर्मया ३८: १५)
अनेक वेळेला आपण देवाच्या मनुष्याकडून माहिती घेतो, हे म्हणत, "परमेश्वर मला काय बोलत आहे?"
तथापि, जेव्हा परमेश्वर प्रत्यक्षात आपल्यालाबोलतो, आणि ते काहीतरी असते जे आपणास ऐकावयाचे नसते तर मग आपण सहजपणे त्याकडे दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्याला जे ऐकावयास पाहिजे असते ते बोलत नाही तर जे आपल्याला ऐकण्याची गरज आहे.
प्रार्थना: परमेश्वर मला बोल आणि मी ते पाळेन (हे अनेक वेळा बोला.)
सिद्कीया राजा यिर्मयास म्हणाला, जे यहूदी फितून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करितील. यिर्मया म्हणाला, ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत, मी तुला जे सांगत आहे ती परमेश्वराची वाणी मान असे मी तुला विनवितो, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल. (यिर्मया ३८: १९-२०)
भीती आपल्याला देवाची वाणी ऐकण्यापासून रोखते
लोकांचे भीती, समाजाची भीती