तेव्हासिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक यांस यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठविले की आम्हांसाठी आमचा देव परमेश्वर याजकडे प्रार्थना कर. (यिर्मया ३७:३)
सिद्कीया ने संदेष्ट्याला प्रार्थने साठी विचारिले परंतु संदेष्ट्याच्या प्रचारास मानले नाही.
"फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे ते मिसरास परत जाईल." (यिर्मया ३७:७)
संदेष्टा यिर्मया द्वारे, परमेश्वराने सिद्कीयाला सांगितले कीफारो चे सैन्य बाबेल बरोबर युद्ध करण्याअगोदर मिसरास परत जाईल. मिसरा कडून जी आशा होती ती पोकळ होती.
मग राजा सिद्कीया ने लोक पाठविले आणि त्यास घेऊन गेले. राजा ने गुप्तपणे त्याच्या घरात त्यास विचारिले आणि म्हटले, "परमेश्वराकडचे काही वचन आहे काय? यिर्मया म्हणाला आहे: तो म्हणतो, आपणाला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल." (यिर्मया ३७:१७)
परमेश्वराचा संदेश बदलला नाही मग तो खाजगी [गुप्तपणे]किंवा सार्वजनिकपणे बोललागेला असो.
आता, अहो माझे स्वामीराज, माझे ऐका; माझी विनंती आपणाला मान्य होवो; मला त्या योनाथान लेखकाच्या घरात परत पाठवू नका, पाठवाल तर तेथे मी मरेन. (यिर्मया ३७:२०)
यिर्मया कोठे मरण पावला. प्राचीन लेखकांनी त्याच्या नशीब विषयी काय म्हटले आहे.
अनेक शहरे आणि गावांनी हा दावा केला आहे की त्यांच्या येथे संदेष्टा यिर्मया ची कबर आहे. हेच काय ते कोणी अपेक्षा करेल; मागे, अनेकांना पवित्र शास्त्रातील मुख्य व्यक्तींची नावे स्वतःच्या फायद्यासाठी वापरावी असे पाहिजे होते, की त्यांच्या नगरास प्रसिद्धी दयावी, यात्रा किंवा पर्यटनस्थळ असे बनवावे, आणि बरेच काही.
परंतु अनेक प्राचीन लेखक, जसे एल्माकिम, एपीफानीस, अबुलफारागीस, जेरोम, टरटुलीयन (नंतरच्या इतिहासकारांनी संदर्भ दिला आहे), यांनी म्हटले आहे की यिर्मया हा मिसर देशातमध्ये मरण पावला, की यहूदी लोकांनी त्यास तेथे दगडमार केला, एक नगर किंवा ठिकाण ज्यास तहपन्हेस म्हटले आहे-पवित्र शास्त्रात त्याच्या मृत्यूची नोंद नाही परंतु ते तहपन्हेस चा अवश्य उल्लेख करते. खालीलसंदर्भ दिलेला उतारा नोंद करतो की यिर्मया ला तेथे नेण्यात आले होते, काही यहूदी लोकांसोबत जे बाबेल च्या राजाकडून पळून जात होते.
मग असे झाले की परमेश्वर त्यांचा देव याने जी वचने यिर्मयाच्या हस्तर लोकांकडे पाठविली ती सर्व त्या सर्वांस सांगण्याचे यिर्मयाने संपविले. तेव्हाअजऱ्या बिन होशाया, योहानान बिन कोरह आणि सर्व गर्विष्ठ मनुष्ये यिर्मयाला म्हणाली, तूं खोटे बोलतोस; तुम्ही मिसर देशांत जाऊन काही दिवस राहू नका असे कळविण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठविले नाही; तर तूं आम्हांस खास्द्यांच्या हाती दयावे आणि त्यांनी आम्हांस जिवे मारावे; आम्हांस बंदिवान करून बाबेलास न्यावे म्हणू बारुख बिन नेरीया तुला आमच्याविरुद्ध मथवीत आहे. योहानान बिन कारेह, सर्व सेनानायक व सर्व लोक यांनी यहूदा देशांत राहण्याविषयी परमेश्वराची वाणी ऐकली नाही; तर ज्या सर्व राष्ट्रांत त्यांस घालविले होते त्यातून यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशांत राहण्यास परत आले होते त्या सर्वांस योहानान बिन कारेह व सर्व सेनानायक यांनी आपल्याबरोबर नेले; पुरुष, स्त्रिया, मुले, राजकन्या, यांस गारद्यांचा नायक नबूजरदान याने गदल्या बिन अहिकाम बिन शाफान याच्या हवाली केलेल्या सर्व लोकांस आणि यिर्मया संदेष्टा आणि बारुख बिन नेरीया यांस त्यांनी नेले; ते मिसर देशास गेले; त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही; ते तहपन्हेस येथे जाऊन पोहचले. तहपन्हेस येथे यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे. (यिर्मया ४३:१-८)
येथे काहीही नोंद नाही, पवित्र शास्त्रातून किंवा इतर ठिकाणाची, की संदेष्टायिर्मया ने येथून पुढे कोठे प्रवास केला आहे. आणि पुन्हा, अनेक प्राचीन लेखकांनी म्हटले आहे कीयिर्मया ला तहपन्हेस येथे दगडमार करून ठार केले.