बंधुजनहो, इस्राएल साठी देवाकडे माझ्या अंत:करणाची इच्छा व प्रार्थना ही आहे की त्यांचे तारण व्हावे.
इस्राएल साठी आपण प्रार्थना का करावी?
आपल्याला इस्राएल साठी प्रार्थना करण्याची गरज आहे याचे एक मुख्य कारण हे आहे कारण ते देवाचे लोक आहेत. परमेश्वर इस्राएल ला "डोळ्यातील बाहुली" असे म्हणतो, जो प्रेमळपणाचा शब्द आहे (अनुवाद ३२:१०; जखऱ्या २:८). परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो जे इस्राएल ला आशीर्वाद देतील आणि जे इस्राएल ला शाप देतील त्यांना शाप देईन. (उत्पत्ति १२:२-३)
मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. (रोम १०:२)
ज्ञाना शिवाय आस्था ही धोकादायक आहे. स्टोव्ह मध्ये अग्नि असणे चांगले आहे. घरा मध्ये अग्नि घराला नष्ट करेल. घरा मध्ये अग्नि हा आस्थे प्रमाणे आहे, आणि ते धोकादायक आहे. आस्था ही ज्ञानाने नियंत्रणात ठेवली पाहिजे. आस्था जी ज्ञाना द्वारे उपयोगात आणली जाते ती महान लाभ उत्पन्न करते.
ह्यामुळेच अनेक धार्मिक लोक; आणि अनेक प्रामाणिक ख्रिस्ती हे भटकले जातात. त्यांना पुष्कळ आस्था आहे परंतु फार अल्फ ज्ञान आहे. आणि कारण की त्यांना देवाच्या वचनाचे अल्प असे ज्ञान आहे, अनेक चांगले ख्रिस्ती सुद्धा पराजय चा सामना करतात.
यहूदी हे त्यांच्या धर्माविषयी फारच आस्था ठेवून होते, परंतु ते पुरेसे नव्हते. केवळ विश्वास ठेवणे, हे पुरेसे नाही, लोकांना सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ते जे प्रामाणिक आहेत ते सुद्धा फारच चुकीचे होऊ शकतात. प्रभु येशूने म्हटले, "आणि तुम्ही सत्य जाणाल, आणि सत्य तुम्हांला बंधमुक्त करील. (योहान ८:३२)
कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. (रोम १०:३)
नीतिमत्वाचा एक प्रकार जो संत पौल येथे वर्णन करीत आहे हे ते स्वतःचे नीतिमत्व आहे (फिलिप्पै ३:९). याउलट, देवाचे नीतिमत्व हे परिपूर्ण आहे. तसेच, देवाचे नीतिमत्व हे काहीतरी नाही जे आपण मिळवितो परंतु ते आहे जे आपण येशू ख्रिस्ता मधील विश्वासा द्वारे प्राप्त करतो.
परंतु विश्वासाचे नीतिमत्व अशा प्रकारे बोलते, "तूं आपल्या मनात म्हणू नको की, उर्ध्वलोकी कोण चढेल?' (अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास). किंवा 'अधोलोकी कोण उतरेल? (अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास). (रोम १०:६-७)
प्रेषित पौल केवळ हे म्हणत होता की कृपे द्वारे नीतिमत्व समजण्यात अपयश हे अशी वागणूक निर्माण करते, परिणामतः ख्रिस्त आपल्या वतीने बदली असा झाला यास ते नकार देतात.
ते जे अजूनही विश्वास ठेवतात की तारणा साठी त्यांचे कार्य हे महत्वाचे आहे ते हे नकार करीत आहेत की ख्रिस्त तेथे स्वर्गात आहे, जो मनुष्यांसाठी मध्यस्थी करीत आहे. (रोम ८:३४)
जे ख्रिस्ताला त्याच्या वर्तमान स्थितीवरून खाली आणते. हे नकार करण्या प्रमाणे आहे की ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्गात गेला आहे.
त्याचप्रमाणे, आपल्याला आपल्या पापाचा दंड भोगला पाहिजे हे त्याचा नकार करण्यासारखे आहे की ख्रिस्ताचा मृत्यू त्यासाठी पुरेसा नव्हता. जर आपल्याला आपल्या पापासाठी दंड दयायचे आहे, तर मग कदाचित ख्रिस्त आपल्यासाठी मरणच पावला नाही.
की येशू प्रभु आहे असे जर तूं आपल्या मुखाने कबूल करिशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा 'आपल्या अंत:करणात' विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल; कारण जो अंत:करणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते. कारण जो कोणी प्रभूचे नांव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. (रोम १०: ९-१०, १३)
पापी व्यक्तीने तारण मिळविण्यासाठी कठीण कार्ये करण्याची गरज नाही. त्यास केवळ एवढेच करावयाचे आहे की ख्रिस्तावर भरवसा ठेवावा. नीतिमान यहूद्यांच्या मुखात हे शब्द सतत होते ते विश्वासाचे वचन होते. जे नियमशास्त्र ते वाचीत व उच्चारीत असत ते ख्रिस्ताकडे निर्देश करते.
वचन हे म्हणत नाही की कोणीही केवळ हे वचन बोलावे, की "येशू हा प्रभु आहे" आणि विश्वास ठेवावा की तो मृत्युमधून उठला त्याचा नवीन जन्म झाला आहे.
ग्रीक शब्द 'होमोलोगिओ' येथे 'कबूल करणे' असा भाषांतरित केला आहे, त्याचा अर्थ केवळ वचन बोलण्यापेक्षा अधिक आहे. त्याचा अक्षरशः अर्थ हा आहे, 'वर चढणे' म्हणजे "करार, स्वीकारणे" (strong चा शब्दकोश.)
लूक ६:४६ मध्ये प्रभु येशूने म्हटले, "तुम्ही मला प्रभु, प्रभु म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही?" म्हणजे याचा अर्थ ते केवळ शब्दा पेक्षा अधिक आहे. त्यामध्ये व्यक्तीचे कार्य सामाविलेले आहे.
पापकबुली हे पवित्र शास्त्रावरून आहे, परंतु अंत:करणातील विश्वासाचा हा परिणाम आहे. केवळ तेव्हाच जेव्हा लोकांनी त्यांच्या अंत:करणाने विश्वास ठेवला असेन तेव्हा पापकबुली ही देवाचे सामर्थ्य मोकळे करेल. अंत:करणात प्रामाणिक विश्वासा शिवाय पापकबुली हे मृत कार्य आहे. (इब्री ९:१४)
तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्यावाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणार्याचे चरण किती मनोरम आहेत!' असा शास्त्रलेख आहे. (रोम १०:१४-१५)
तर तारणासाठी तीन भागाची जबाबदारी आहे:
- १. व्यक्तीला विश्वास ठेवला पाहिजे,
- २. सेवकाने प्रचार केला पाहिजे,
- ३. आणि इतरांनी पाठविले पाहिजे.
सैतान ह्या तिन्ही भागामध्ये कार्य करतो की लोकांना देवाच्या तारणाचे दान प्राप्त करण्यापासून रोखतो. आज, शुभवर्तमान प्रचार करणे हे इतके सोपे झाले आहे, केवळ "सांगा' क्लिक करा की शुभवर्तमान पाठवावे आणि तरीही अनेक लोक हे करणार नाहीत. परंतु मी देवाला धन्यवाद देतो, येथे तरीही काही शेष राहिलेले आहेत जे पवित्र आत्म्याच्या वाणी कडे कान देतात.
आणि त्यांना जर पाठविले नाही तर, ते घोषणा तरी कशी करितील? 'चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत!' असा शास्त्रलेख आहे. (रोम १०:१५)
शुभवर्तमान सांगण्याद्वारे तुम्ही प्रत्यक्षात शुभवर्तमान प्रचार करीत आहात. जेव्हा लोक समजतात की शुभवर्तमान सांगणे जे तारणाच्या हिस्स्यासाठी तितकेच महत्वाचे आहे जसे इतर हे तो संदेश स्वीकारीत आहेत, तेव्हा मग ते यशया सोबत त्यांच्या विषयी आनंद करतील ते जे संदेश प्रचार करीत आहेत.
ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. (रोम १०:१७)
परमेश्वर बोलण्यात चुकत नाही; आपण ऐकण्यात चुकतो. त्यामुळे, आपण आपला विश्वास वर्तमान काळात ठेवतो जर आपण आपले आध्यात्मिक कान उघडे करू की देवाचे वचन काय सांगत आहे ते ऐकावे.
चार कारणे की चर्च ने लोकांना पीकाची कापणी करण्यास पाठविले पाहिजे.
(१) आदेश जो वरून आहे – "संपूर्ण जगात जा" (मार्क १६:१५);
(२) खालून आक्रोश –"त्यास माझ्या पित्याच्या घरी पाठीव" (लूक १६:२७),
(३) आतून पाचारण- "आमच्याकडे ये व आम्हाला साहाय्य कर" (प्रेषित १६:९),
(४) आतून प्रेरणा-"ख्रिस्ताची प्रीति आपल्याला आवरून धरते." (२ करिंथ ५:१४)
Chapters