तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?' कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. (रोम ११:१)
प्रेषित पौल हे सांगत आहे की यहूदी हे देवाच्या कृपेतून वगळलेले नाहीत. एक विश्वासू यहूदी म्हणून त्याने स्वतःचे उदाहरण दिले आहे.
देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलीयाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली: हे प्रभु, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारिले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या; आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घ्यावयास ते पाहतात; परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ज्यांनी बआल दैवतांपुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणांसाठी राखून ठेवली आहेत. (रोम ११:२-४)
संदेष्टा एलीया ला वाटले की देवाने राष्ट्राला हाकलून लाविले आहे, आणि केवळ तोच एकटा प्रभूची सेवा करीत राहिला आहे. परंतु देवाने त्यास वास्तवात दाखविले की तेथे शेष राहिलेले वंशज आहेत.
तसेच हल्लीच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे. (रोम ११:५)
परमेश्वर नेहमीच मोठया गोष्टी पूर्ण करण्यासाठी लहान गटाचा उपयोग करेल. परमेश्वरा बरोबर गोष्टी ह्या नेहमी लहानाने सुरु होतील, परंतु ते नेहमी तसेच राहत नाहीत.
आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मानी नाही; नाहीतर कृपा ही कृपा होणार नाही. (रोम ११:६)
जसे सिद्धांत नुसार, तेल व पाणी मिसळत नाही, कृपा व कार्य हे एकत्र मिसळत नाहीत.
'आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये असे कान दिले,' ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. दावीदही म्हणतो, 'त्यांचे मेज व त्यांना फास' व सापळा, 'अडखळण व प्रतिफळ असे होवो. त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तूं त्यांची पाठ नेहमी वाकीव.' (रोम ११:८-१०)
जे मी सांगत आहे ते कदाचित थोडेसे रोम ११ च्या संदर्भां बाहेर असू शकते परंतु ते तुम्हांला फारच साहाय्यक असे होईल.
येथे सैतानी शक्ति आहेत ज्या आपल्याला आत्म्याच्या स्तरात पाहण्यापासून अडथळा करतात. हा वाक्प्रचार लक्षात घ्या, "मंद बुद्धी" व "त्यांचे डोळे अंधकारमय होवोत".
तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी 'ईर्ष्या निर्माण होण्यासाठी' त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. (रोम ११:११)
ऐम्पलीफाईड बायबल मध्ये असे लिहिलेले आहे, "म्हणून मी विचारले, काय ते अडखळले म्हणजे अपयशी व्हावे [त्यांच्या अत्यंत वाईट आध्यात्मिक स्थिती मध्ये, जे दुरुस्त करता येत नाही इतके]? तसे कोणत्याही अर्थाने नाही!"
मी पाहतो की प्रेषित पौल पतन पावणे व अपयशी होणे यामध्ये फरक करीत आहे. इस्राएल अडखळले, परंतु ते पतन पावले नाही-या अर्थाने की देवाचे उद्देश व योजनांपासून कायमचे काढून टाकिले गेले नाही. तुम्ही अडखळण पासून दुरुस्ती करू शकता परंतु जर तुम्ही पतन पावला तर तुम्ही नष्ट झाला आहात.
आता त्यांचा अपराध ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता किती तरी अधिक होईल? पण तुम्हां परराष्ट्रीयांना मी हे सांगतो; ज्याअर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो; ह्यांत माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना? (रोम ११:१२-१५)
संपूर्ण पवित्र शास्त्रात, आपण पाहतो की जेव्हा यहूदी लोकांनी शुभवर्तमान नाकारले तेव्हाच ते परराष्ट्रीयांकडे गेले आहे. (प्रेषित १३:४६ वाचा)
तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले: देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगावयाचे अगत्य होते; तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करिता व आपणाला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता त्याअर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. (प्रेषित १३:४६)
सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले तेव्हा, येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता; परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर; मी निर्दोष आहे; आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. (प्रेषित १८:५-६)
अशा अनेक प्रसंगात, यहूद्यांद्वारे शुभवर्तमानाचा नकार हा परराष्ट्रीयांसाठी संपन्नता असा झाला.
तथापि, पौलाने ही मनापासून इच्छा केली की याने यहूद्यांमध्ये ईर्ष्या निर्माण करण्यास चीथवावे, त्यांना प्रेरणा दयावी की परराष्ट्रीय ज्या आशीर्वादाचा अनुभव घेत आहेत तो त्यांनी प्राप्त करावा. याचे एक उदाहरण की ओबेद एदोम संपन्न होत आहे हे पाहून दावीदा मध्ये ईर्ष्या निर्माण झाली. याने दावीदाला प्रेरणा दिली की कोशाला परत आणावे. (२ शमुवेल ६:१२ वाचा)
कणिकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तूं रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्याहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नको. मारशील तर हे लक्षात ठेव की, तूं मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे. (रोम ११:१६-१८)
प्रथम फळ कदाचित पहिल्या ख्रिस्ती लोकांचे प्रतिनिधी आहेत, जे यहूदी होते.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे: जेव्हा तुम्ही परमेश्वराला प्रथम फळ आणता, उरलेला भाग सुद्धा पवित्र आहे.
प्रेषित पौल परराष्ट्रीयांना त्या वास्तविकतेमध्ये गर्व करण्याच्या विरोधात चेतावणी देत आहे की तुमच्या चांगुलपणाच्या आधारावर तारण हे तुमच्यासाठी उघडे झाले आहे. यहूद्यांच्या अविश्वासामुळे त्यांना त्यातून काढण्यास कारण झाले आणि तेच परराष्ट्रीयांचे सुद्धा होईल जर ते विश्वासात मजबूत असे उभे राहण्यात अपयशी ठरले.
देवाची ममता व कडकपणा पाहा; पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता; पण तूं त्यांच्या ममतेत राहशील तर; नाही तर तुही छेदून टाकिला जाशील. (रोम ११:२२)
परमेश्वर यहूदी राष्ट्राकडून परराष्ट्रीयांकडे वळत आहे यामध्ये गंभीरता व चांगुलपणा ह्या दोन्हीही गोष्टी आहेत. त्याचे यहूदी लोकांसाठी गंभीर परिणाम आहेत परंतु त्याने उरलेल्या जगाला आशीर्वाद दिला आहे.
आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. (रोम ११:२३)
काही परराष्ट्रीय चुकीने ह्याविचारापर्यंत गेले की इस्राएली लोकांना आता काही आशा व भविष्य हे राहिलेले नाही. इस्राएलाने कृपेच्या शुभवर्तमानाचा नकार केला आहे आणि आता ते परराष्ट्रीयांना दिले गेले आहे. देवाने आता त्यांना त्यांच्याऐवजी निवडले आहे. हे अशा प्रकारच्या गर्वाचा पौल येथे विरोध करीत आहे.
ह्या रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल; शास्त्रात असे लिहिलेले आहे, मुक्त करणारा सियोनातून येईल; तो याकोबापासून अभक्ति दूर करील; जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन, तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल.' (रोम ११:२६-२७)
येथे जुन्या करारातील अनेक भविष्यवाण्या आहेत जे यहूदी राष्ट्राची त्याच्या मूळ स्थानावर पुनर्स्थापना करण्याविषयी, भौतिकदृष्ट्या व आध्यात्मिकदृष्टया दोन्हीही बाबतीत बोलतात. यहूदी राष्ट्र संपूर्ण असे परमेश्वराकडे वळेल परंतु तेथे काही व्यक्तिगत यहूदी असतील ते कदाचित वळणार नाहीत.
कारण देवाचे कृपादान व पाचारण हे रद्द करता येत नाही. [तो ते कधी काढून घेत नाही, एकदा की ते दिले गेले आणि ज्यांना तो त्याची कृपा पुरवितो किंवा ज्यांना तो पाचारण करतो त्यांच्याविषयी तो त्याचे मन बदलत नाही. (रोम ११:२९ ऐम्पलीफाईड)
जर देवाने तुम्हाला पाचारण केले आहे, तर ते पाचारण अजूनही तेथेच आहे. आता कदाचित तुम्ही त्यात गडबड केली असेन किंवा मागे वळला असाल, किंवा सरळपणे तुम्हाला असे वाटत असेन की तुम्हाला ते आहे ते काहीही असो, सत्य हे आहे की, देवाचे पाचारण हे निष्क्रिय असे राहिलेले आहे.
आणि जर परमेश्वराने हे दान तुम्हाला दिले आहे-जर त्याने हे तुम्हाला काही अनुशंघाने ते दिले आहे-तर ते दान अजूनही तेथेच आहे!
आणि तुम्हाला केवळ एवढेच करावयाचे आहे ते हे. प्रेषित पौलाने तीमथ्यीला म्हटले, "प्रज्वलित कर" जे दान तुझ्यामध्ये आहे, हे म्हणत, "ह्याकारणास्तव मी तुला आठवण देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेविल्यामुळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर. (२ तीमथ्यी १:६)
काही दिवशी तुम्हाला वाटेल की देवाचे दान तुमच्या मध्ये किंवा तुमच्याद्वारे कार्य करीत नाही. सत्य हे आहे, ते अजूनही तेथेच आहे.
आता तेथे यासाठी पडकी बाजू आहे. जर तुम्ही शमशोन, यहूदा चे जीवन पाहता. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तडजोड व ढोंगीपणा होता आणि तरीसुद्धा ते दान सतत कार्यरत होते.
हे स्वाभाविक व आध्यात्मिक स्तरात सुद्धा खरे आहे. एक व्यक्ति स्वाभाविक स्तरात एक जन्मजात गायक असा जन्मला असेन. तो किंवा ती बार मध्ये गातात आणि लोकांना नशा किंवा मद्यामध्ये बुडून जाऊ देतात. परमेश्वर ते दान काढून घेत नाही जे त्याने त्या व्यक्तीमध्ये टाकले आहे. हे ते दान होते जे परमेश्वराने दिले आणि ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे की ते देवासाठी वापरावे, स्वतःसाठी वापरावे किंवा काही सैतानी शक्तीची सेवा करण्यास वापरावे.
त्याप्रमाणे, जेव्हा आपण आत्म्याने नवीन जन्म घेतो. आपल्याला आध्यात्मिक दाने दिली जातात. आपल्याकडे निवड आहे की ही दाने देवाच्या गौरवाकरिता त्याच्या मार्गदर्शनाखाली वापरावे किंवा ह्या दानाचा उपयोग स्वतः साठी करावा.
तेच काय ते राजा शौल च्या जीवनात घडले, तो कालचा मनुष्य झाला. तो आज ते मुकुट घालत राहिला.
Chapters