निर्गम ९: ६ स्पष्ट करते, "दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशांतील सर्व जनावरेमेली; तथापि इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही." हे वचन दर्शविते कीमिसर वर पाचव्यापिडेने त्या देशांतील सर्वजीवननिर्वाहाच्या वस्तू नष्ट केल्या.
तरीसुद्धा निर्गम ९: २०-२५ ह्यात मिसर मध्ये जीवनास लागणाऱ्या वस्तू आहेत, जे सातव्या पीडे पडून घरांमध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत. मिसरच्या जीवननिर्वाहाच्या वस्तू कशा काय सुरक्षित ठेवल्या जाऊ शकतात जर त्या अगोदरच्या अध्यायात पूर्णपणे नष्ट केल्या आहेत.?
दिसणाऱ्या विरोधाभास साठी येथे दोन शक्य स्पष्टीकरण आहेत
पहिले, निर्गम ९:३ स्पष्ट करते, "तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल; भयंकर मरी उद्भवेल.
वरील वचनाची सावधानपूर्वक पडताळणी प्रकट करते की,परमेश्वराने हे स्पष्ट केले आहे की मिसरच्या जीवन निर्वाहाच्या कोणत्या वस्तू ह्या नष्ट होतील.
"तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल"
देवाने प्लेग ला ते जे शेतात आहेत तेथपर्यंतच मर्यादित केले.
यात काही शंका नाही, की अनेक घोडे, गुरेढोरे, वगैरे, हे कदाचित तबेल्यात असतील आणि ते मृत्युपासून वाचले, ज्यात फारो चे युद्धाचे घोडे सुद्धा होते. (संदर्भ: निर्गम १४:६-७)
दुसरे, बायबल हे स्पष्ट करीत नाही की पाचवी पीडा आणि सातव्या पीडे मध्ये किती वेळ गेला आहे. पाचव्या पीडे नंतर, ज्याने मिसर मधील सर्व जीवनावश्यक वस्तू नष्ट केल्या, मिसरी लोकांनी इस्राएलच्या ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या त्यातून कदाचित काही घेतल्या असतील. कारणकी, इस्राएल लोक तर मिसरी लोकांचे गुलाम होते,
दुसरी शक्यता ही की जीवनावश्यक वस्तू त्यांनी सभोवतालच्या (लिबिया, इथियोपिया, कनान वगैरे) भागातून आणल्या (किंवा घेतल्या)असतील. पहिल्या पर्यायास पूर्ण करण्यास फार थोडया समयाची गरज होती तर दुसऱ्या पर्यायास कमीत कमी काही आठवड्याची आवश्यकता होती. परंतु कारण की बायबल हे सांगत नाही किती वेळ हा गेला असेन, दोन्हीही हे शक्य असेन.
पापकबुली: येशूच्या नांवात, कोणताही जादुगार, चेटूक किंवा मंत्रतंत्र हे माझ्या आणि माझ्या सेवाकार्या आड माझ्या जीवनभरथांबू शकणार नाही. (निर्गम ९: ११)
देवाचा न्याय
पाहा, उद्या या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टि करीन की मिसरी राष्ट्रांची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टि झाली नाही. तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानांत असेल ते आण; जी माणसे व गुरे घरी आसऱ्यास न आणिल्यामुळे रानांत सांपडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील. फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीति वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवीत घरी आणिली; आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास व जनावरे रानांत राहू दिली. (निर्गम ९: १८-२१)
देवाच्या न्यायात सुद्धा येथे दया आहे कारण तो वास्तवात दयेचा परमेश्वर आहे.
परमेश्वराने प्रत्येकाला सांगितले कीवास्तवात न्याय हा येत आहे. तथापि, त्याने फारोचे सेवक आणि त्याची गुरेढोरे ही त्यातून वाचू शकतील हे सुद्धा सांगितले. ते ज्यांनी हे जाणले आणि देवाची आज्ञा पाळली ते वाचले-इतरांवर संकट आले.
त्यांच्या नुकसान साठी केवळ ते स्वतःच दोषी होते.
ह्यावरून आपण एक सिद्धांत शिकतो, परमेश्वर नेहमीच त्याच्या न्यायाची घोषणा करतो. दुसरे, तोत्या न्यायाबाहेर कसे निघावे याचा मार्ग सुद्धा आपल्याला सांगतो. फक्त तेव्हाच मग न्याय हा येतो.
देवाचे भय
फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीति वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवीत घरी आणिली; आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास व जनावरे रानांत राहू दिली. (निर्गम ९: १८-२१)
देवाचे भय हे देवाच्या वचनास तुमच्या प्रत्युत्तरात दिसते. जर तुम्ही खरेच देवाच्या भयात चालत आहात, देवाच्या वचनाला प्रत्युत्तर हे ताबडतोब आणि आवेगपूर्ण असेन.
देवाच्या वचनाला टाळणे किंवा प्रत्युत्तर करण्यास उशीर करणे हे घोषणा करते की तो व्यक्ति देवाला भीत नाही.
खोटा पश्चाताप
तेव्हा फारोने मोशे व अहरोन यांस बोलावून आणून म्हटले, मी या खेपेस पाप केले आहे, परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहो.तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टि झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांस जाऊ देतो; तुम्हांला इत:पर राहावायला नको. (निर्गम ९: २७-२८)
फारो त्याचे आणि त्याच्या लोकांचे पाप स्वीकारतो, आणि मोशेला विनवणी करतो की देवाची मध्यस्थी करण्यास सांगतो.
तथापि, जरी तो आणि त्याचे लोक त्यांचे पापमय स्थिती जाणतात, तो पश्चाताप करीत नाही.
तुमच्यापापा बद्दल केवळ बोलणे किंवा स्वीकारणे हे देवाला प्रसन्न करीत नाही, येथेप्रामाणिक पश्चाताप व्हावयास हवा आणि त्याकडून देवाकडे वळावयास पाहिजे. फारो ने म्हटले की तो इस्राएल लोकांना जाऊ देईल परंतु त्याने तसे केले नाही.
प्रथम, पश्चाताप हा प्रायश्चित्त नाही. प्रायश्चित्त हे पापा साठी स्वेच्छेने दु:ख भोगणे आहे आणि त्यामध्ये हे आवश्यक नाही की त्यात चरित्र किंवा आचरणा मध्ये बदल व्हावा.
दुसरे, पश्चाताप हा खेद नाही. यहूदा हा देवाच्या पुत्राला त्याच्या पापमय फसवणुकीमुळे खेदात होता परंतु त्याच्या उथळ खेदाने त्यास देवाकडे नेण्याऐवजी आत्महत्त्येकडे नेले, कारणखेद हाखरा पश्चाताप नाही.
पश्चाताप मध्ये बदलण्याची कल्पना घेऊन चालणे आहे-तुमचे मन बदलणे, तुमचे आचरण बदलणे, तुमचे मार्ग बदलणे.
बायबल म्हणते, "त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णवनीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो."
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०