4देव म्हणतो, “तरूण मुले नेतेपदी बसतील अशी परिस्थिती मी निर्माण करीन. 5प्रत्येकजण दुसऱ्याविरूध्द उभा राहील,
(यशया ३:४-५)
प्रभूच्या मार्गदर्शनापासून विचलित होण्याचा एक महत्वपूर्ण परिणाम म्हणजे दुर्बळ नेत्यांचा उदय, ज्यांची तुलना लेकरे आणि बाळांच्या निर्णय करण्याच्या क्षमतेसमान केली जाऊ शकते. या अननुभवी आणि कुचकामी नेत्यांमध्ये नीतिमत्ता आणि न्यायाने शासन करण्यासाठी आवश्यक शहाणपण आणि परिपक्वता आणि नैतिक दिशा दाखविण्याचा अभाव असू शकतो, अशा प्रकारे सामाजिक समस्या वाढविते आणि लोकांना दैवी मार्गापासून दूर नेते.
यरूशलेम व यहुदा यांची वाणी आणि कृती परमेश्वराच्या विरूध्द् आहे. परमेश्वराच्या तेजस्वी डोळ्यांना हे सर्व स्पष्टपणे दिसत आहे.(यशया ३:८)
यरुशलेमेच्या पतनास कारणीभूत घटकांपैकी एक म्हणजे लोक त्यांच्या जिभेचा उपयोग प्रभूच्या सेवेकरिता करण्याऐवजी त्याच्याविरुद्ध करीत होते. आपल्या कृतींमुळे देव कसा दुखविला जाऊ शकतो हे अनेकदा ओळखणे सोपे असते, परंतु आपण आपल्या शब्दांच्या प्रभावाकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे कारण ते त्याच्या दैवी उपस्थितीला उत्तेजन देऊ शकते. आपल्याला केवळ आपल्या कृत्यांद्वारेच देवाचे गौरव करण्यासाठी बोलाविले गेले नाही परंतु आपल्या शब्दांद्वारे देखील, याची खात्री करीत की आपले बोलणे, आपला विश्वास आणि मुल्ये प्रतिबिंबित करत आहे.
आपल्या शब्दांबद्दल विचारशील असण्याच्या महत्वावर प्रभू येशूने जोर दिला आहे, जसे मत्तय १२:३६-३७ मध्ये स्पष्ट केले आहे. त्याने चेतावणी दिली की प्रत्येक व्यर्थ शब्दासाठी व्यक्तींना जबाबदार धरले जाईल आणि हे की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. आपल्या आध्यात्मिक प्रवासात आणि देवासोबतच्या नातेसंबंधात आपले बोलणे महत्वाची भूमिका बजावते.
प्रभूबरोबर मजबूत संबंध बनविण्यासाठी, आपण आपली कृत्ये आणि आपले बोलणे दोन्हीही त्याच्या वचनाबरोबर एकरूप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे नकारात्मकतेचे किंवा हानीचे स्त्रोत बनण्याऐवजी प्रेम, करुणा आणि सत्य व्यक्त करण्यासाठी आपल्या जिभेचा वापर करणे आवश्यक आहे. आपल्या विश्वासाची मुल्ये टिकवून ठेवणारे वैचारिक बोलणे जोपासण्याद्वारे, आपण अधिक शांततामय जगात योगदान करू शकतो, आणि आपल्या स्वतःला त्याच्या जवळ आणू शकतो.
त्यांनी स्वतःला आपत्तीत लोटले आहे.(यशया ३:९)
त्यांच्यावर न्यायदंड आणण्यासाठी देवाला असाधारण किंवा अनोखा उपाय करण्याची गरज नाही. त्याऐवजी, त्यांना त्यांचे स्वतःचे चुकलेले मार्ग व कृत्यांनुसार वागू देण्याद्वारे, त्यांनी अपरिहार्यपणे स्वतःवर संकटाला निमंत्रण दिले आहे. हे दैवी मार्गदर्शनाचे पालन करण्याचे आणि प्रभू द्वारे निश्चित केलेल्या धार्मिक मार्गापासून दूर जाण्याच्या परिणामाचे महत्त्व अधोरेखित करते.
माझ्या लोकांनो, तुमच्या मार्गदर्शकांनी तुम्हाला योग्य मार्गापासून परावृत्त केले व चुकीच्या मार्गाने नेले.(यशया ३:१२)
यशया ३:१२ खराब नेतृत्वाचे दोन महत्वपूर्ण धोके अधोरेखित करते:
१. दिशाभूल:
अकार्यक्षम नेते लोकांना भरकटवू शकतात, त्यांना योग्य मार्गापासून विचलित करण्यास प्रवृत्त करतात आणि संभाव्यतः अनुयायांसाठी हानिकारक परिणाम होऊ शकतात.
२. योग्य मार्गाचा नाश:
असे नेते केवळ त्यांच्या अनुयायांना भरकटवत नाही परंतु सक्रियपणे योग्य मार्गाला नष्ट करतात, ज्यामुळे लोकांसाठी खूपच कठीण करतात की धार्मिक मार्गाकडे पुन्हा त्यांचा मार्ग प्राप्त करावा आणि देवाबरोबर मजबूत संबंध पुन्हा मिळवावा.
Chapters