तेव्हा ते सगळे आपआपल्या सेनांचा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूंसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. (यहोशवा ११: ४)
यहोशवा त्या भूमीतील राजांपासून राजावर विजय मिळवीत गेला. यामुळे शत्रू राजांनीएकत्र येण्याची एक दुष्ट योजना केली. वरील वचन त्या सेनेंच्या विशालतेचे वर्णन करते जे यहोशवा आणि त्याच्या लोकांविरुद्ध आले.
येथे एक महत्वाचा सिद्धांत आहे. जेव्हा तुम्हाला विजया नंतर विजय मिळत जातो, शत्रू हे एकत्र येतील की देवाच्या लोकांविरुद्ध लढाई करावी.
जेव्हा त्यांना येशूला वधस्तंभावर दयायला पाहिजे होते, पिलात आणि हेरोद हे मित्र झाले जरी त्यांचे संबंध चांगले नव्हते. (लूक २३: १२ पाहा)
ह्या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला. (यहोशवा ११: ५)
मेरोम चा अर्थ उंची आहे.
मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, त्यांना भिऊ नको; कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्राएलाच्या हाती देईन; त्यांच्या घोडयांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.(यहोशवा ११: ६)
"उद्या मी ह्याच वेळी" ह्या वाक्याला पाहा. हे २४ तासाच्या कालावधी विषयी बोलते.
परमेश्वराने यहोशवाला २४ तासात चमत्काराचे आश्वासन दिले होते.
घोड्याच्या पायाची शीर तोडणे म्हणजे पाया मागील नस तोडणे म्हणजे प्राण्यांस वेगाने धावण्यात असमर्थ करावे.
परमेश्वराला पाहिजे होते की त्यांनी त्यांचा विश्वास त्याच्यामध्ये स्थिर करावा, सेनेच्या आधुनिक साधनांच्या प्रबलतेमध्ये नाही. घोड्यांची वाढ आणि रथांचा वापर, त्यामुळे विजय मिळवून देण्यासाठी परमेश्वराच्या समर्थतेमध्येइस्राएलच्या विश्वासाच्या अभावाची घोषणा करते.
त्या समयी यहोशवाने मागे परतून हासोर घेतले, व त्याच्या राजाला तरवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राजांमध्ये प्रमुख होते.(यहोशवा ११: १०)
लक्षात घ्या की यहोशवाने राजाच्या मस्तकाच्या बाबतीत काय केले. यानेसंपूर्ण विजय निश्चित केला. हे एक आध्यात्मिक युद्धाचे महान सिद्धांत आहे. वरवरच्या प्रश्नांना हाताळण्याअगोदर मूळ प्रश्नांना हाताळावे.
इस्राएल लोकांच्यादेशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले. (यहोशवा ११: २२)
आज सुद्धा इस्राएल गज्जा काबीज करू शकत नाही. गथ हे पैलेस्टाईन भागात आहे. अश्दोद हे तथापि आता इस्राएली लोकांच्या हातात आहे.
Chapters