एका वावटळीद्वारे एलीयाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एलीया अलीशाबरोबर गिलगालला गेला. (२राजे २:१)
असे दिसते की संदेष्टा एलीयाचा स्वर्गात जाण्याचा निश्चित समय एखाद्या निश्चित व्यक्तीच्या संबंधात प्रख्यात होता. एलीया आणि त्याचा उत्तराधिकारी दोघेही, तसेच गट जे संदेष्ट्यांचे पुत्र म्हणून ओळखले जात होते, यांना ठाऊक होते की एलीयाचा पृथ्वीवरील समयाचा शेवट जवळ आला होता, आणि दैवी वावटळीच्या द्वारे त्यास घेऊन जाण्यात येणार होते. ही माहिती सहसा त्या भविष्यवाणीकडून आलेली दिसत होती जी कमीतकमी त्यात समाविष्ट असणाऱ्यांना प्रकट केली गेली होती, ज्यामुळे या घटनेस त्यांच्या संपर्कातील लोकांना सामान्य माहिती म्हणून केले होते.
इस्राएली लोकांसाठी गिलगाल हे महत्वाचे ठिकाण होते कारण ते विधीचा मार्ग आणि त्यांच्या प्रवासातील बदल असे दोन्हीही प्रतिनिधित करीत होते. येथेच त्यांनी सुंता करवून घेतली, जे त्यांच्या दैहिक इच्छांवर उपाय करण्याचे आणि आध्यात्मिक परिवर्तनाचे प्रतीक होते (यहोशवा ५:६-९). याव्यतिरिक्त, गिलगाल हे ते ठिकाण होते जेथे इस्राएल लोकांसाठी मिळणारा मान्ना बंद झाला होता, आणि तेव्हापासून इस्राएली लोक अभिवचनाच्या देशातील उत्पन्न खाऊ लागले होते.
अभिवचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याने त्यांच्या विश्वासाला एक वळण दिले होते, कारण आता त्यांना जे दिसते त्यापेक्षा विश्वासाने चालण्यावर अवलंबून राहावे लागत होते (२ करिंथ ५:७). हे परिवर्तन त्यांच्या आध्यात्मिक वाढीचा आणि देवाच्या योजनेवरील विश्वासाचा पुरावा होता.
गिलगालबद्दल आणखी एक मनोरंजक माहिती ही आहे की कनानवर ताबा मिळविण्यादरम्यान इस्राएलींसाठी त्या ठिकाणाने आधार म्हणून कार्य केले. हे येथेच त्यांनी यार्देन नदीतील बारा धोंडे घेऊन त्यांच्या चमत्कारिकरित्या यार्देन ओलांडण्याचे एक स्मारक म्हणून उभारिले होते, याशिवाय गिलगालच्या महत्वावर आध्यात्मिक पल्ला पूर्ण करण्याचे ठिकाण आणि त्यांच्या प्रवासात दैवी हस्तक्षेप म्हणून जोर देणे होते.
एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला बेथेलला जायला सांगितले आहे.”पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघेही जण बेथेल येथे गेले. (२राजे २:२)
बेथेल हे पवित्र शास्त्राच्या इतिहासातील एक महत्वाचे ठिकाण होते. हे बेथेल येथेच अब्राहामाने एक वेदी बनविली होती, एक ठिकाण जेथे देवाबरोबर संभाषण करता यावे, अर्पण करावे, आणि आपल्या स्वतःला पूर्णपणे त्यास समर्पित करावे (उत्पत्ति १२:८). "बेथेल" नाव स्वयं "देवाचे घर" म्हणून भाषांतरित केले जाते, असे सूचित करते जेथे देवाची उपस्थिती अनुभविली जाते.
याशिवाय, बेथेल हे ते ठिकाण होते जेथे याकोबाने स्वप्नामध्ये एक शिडी पृथ्वीवरून वर स्वर्गाकडे जात आहे असे पाहिले होते (उत्पत्ति २८:१०-१९). या दृष्टांताने या कल्पनेवर जोर दिला की बेथेल हे देवाबरोबर घनिष्ठ संबंधाचे एक ठिकाण म्हणून प्रतीक असे आहे, जे परमेश्वराबरोबर गहन संबंध वाढवते. बेथेल हे परमेश्वराबरोबर घनिष्ठ संबंधाचे प्रतीक आहे.
एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे जायला सांगितले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडून राहणार नाही.” तेव्हा ते दोघे यरीहोला गेले. (२राजे २:४ )
इस्राएली लोकांनी त्यांना वचन दिलेल्या, कनान देशाकडे प्रवास करताना यरीहो हे पहिले नगर होते ज्याचा त्यांनी ताबा मिळविला. ते सहजपणे त्यांच्या ताब्यात आले नाही. त्यांना त्यासाठी युद्ध करावे लागले. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी, एका ख्रिस्ती व्यक्तीला देखील शत्रूच्या कार्यांवर प्रभुत्व मिळविण्याची गरज असते. यरीहो प्रतीकात्मकदृष्ट्या आध्यात्मिक युद्धाबद्दल बोलते.
एलीया अलीशाला म्हणाला, “तू तेथेच थांब कारण परमेश्वराने मला यार्देन नदीवर जायला सांगितले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वराची आणि तुमच्या आयुष्याची शपथ, मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघे तसेच पुढे निघाले. (२राजे २:६)
तुम्ही काळजीपूर्वक या वास्तविकतेकडे लक्ष द्यावे अशी माझी इच्छा आहे की आपण बाप्तिस्म्याद्वारे ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुरण्याबरोबर एकरूप होतो. कारण येशूने स्वतः देखील यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा घेतला. तो बाप्तिस्म्याच्या पाण्यात खाली गेला हे मृत्यूस सूचित करते. त्याचे पाण्यातून वर बाहेर येणे हे पुनरुत्थानास सूचित करते. तेच आपल्यासाठी देखील समान आहे.
यार्देन हे देखील ठिकाण आहे जेथे तुम्ही देवाची वाणी स्पष्टपणे ऐकू लागता. पित्याने स्वर्गातून बोलले, हे म्हणत, "हा माझा 'पुत्र' मला 'परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे."" (मत्तय ३:१७). हेच ते येशूला यार्देनकडे घडले जेव्हा त्याचा बाप्तिस्मा केला गेला.
यार्देन हे उघडलेल्या स्वर्गाचे ठिकाण आहे. हे तेच ठिकाण आहे जेथे अलीशाने एलीयाला स्वर्गाकडे जाताना पाहिले होते. याचा अर्थ यार्देन हे परिवर्तनाचे देखील ठिकाण आहे. हे ते ठिकाण आहे जेथे देह (तुमच्या संवेदना) तुम्हांला येथूनपुढे ताब्यात ठेवू शकत नाही.
एलीयाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले. अलीशा आणि एलीया मधल्या कोरडया वाटेने नदी पार करुन गेले. (२राजे २:८)
स्पष्टपणे, संदेष्टा एलीया, मोशे व यहोशवाच्या पदचीन्हांवर असा एक व्यक्ति म्हणून चालला ज्याचा देवाने चमत्कारिकरित्या पाणी दुभागण्यासाठी उपयोग केला.
नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग.”अलीशा म्हणाला, “तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.” १०एलीया म्हणाला, “ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस. मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. नाहीतर नाही.” (२ राजे २:९-१०)
पवित्र शास्त्रात, आध्यात्मिक आशीर्वाद हे त्याशी घनिष्ठपणे जुळलेले असतात ज्यावर एखादा व्यक्ति त्याचे लक्ष केंद्रित करतो. गंभीर प्रश्न हा आहे की एखाद्याचे लक्ष परमेश्वराकडे आहे का, किंवा त्याऐवजी ते इतर गोष्टींद्वारे अडखळलेले आहेत. दुर्दैवाने, अनेक चमत्कारांकडे दुर्लक्ष केले जाते किंवा ते गमाविले गेले आहेत अशा अडथळ्यांच्या कारणामुळे. इब्री. १२:२ येशूकडे "पाहत राहण्याच्या" महत्वाविषयी ठोसपणे म्हणते, जेथे शब्द "पाहणे" लक्षपूर्वक विचार करण्यास सूचित करते आणि इतर सर्व अडथळ्यांपासून इतरत्र पाहण्यास सुचविते जे येशूकडून लक्ष विचलित करू शकते.
जेव्हा अलीशाने दुप्पट वाट्यासाठी विनंती केली, तो शक्तीच्या दुप्पट वाट्यासाठी मागत नव्हता, परंतु, त्याऐवजी, प्रथम जन्मलेल्यासाठी परंपरागत राखीव आशीर्वादाचा ठेवलेला दुप्पट वाटा मागत होता. पवित्र शास्त्राच्या काळात, आध्यात्मिक आशीर्वाद हे प्रथम जन्मलेला असण्याच्या अवस्थेसह नेहमी जुळलेले असत. एलीयाने अलीशाला म्हटले की "त्याने कठीण गोष्ट मागितली आहे" (२ राजे २:१०). या वाक्याचा हा अर्थ नाही की दुप्पट वाटा हा देवासाठी कठीण होता, परंतु हे की ते अलीशासाठी आव्हानात्मक होते की दुप्पट वाटा प्राप्त करणे हे त्याचे लक्ष केंद्रित करण्यावर अवलंबून होते.
पन्नास संदेष्ट्यांनी वावटळीला (टोर्नाडो) पाहिले, जे एलीयाबरोबर वर स्वर्गात जाण्यासोबत होते. त्यांनी वादळास पाहिले होते, ती एक सामर्थ्यशाली शक्ती होती, आणि त्याच्या होण्याने विनाश झाला होता, परंतु अलीशाने जे पाहिले होते ते त्यांनी पाहिले नाही. स्वाभाविक जगावर त्यांचे लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांना त्या घटनेची आध्यात्मिक बाजू समजण्यापासून रोखले. (२ राजे २:७)
अलीशाने, याच्या उलट, परिस्थितीच्या दैहिक पैलूंच्याही पलीकडे पाहिले आणि त्याऐवजी वावटळीमध्ये जे काही घडत आहे ते पाहिले, जेथे देवाने त्याचे स्वर्गीय वैभव प्रकट केले होते. दैवी प्रदर्शनामध्ये, देवाने अग्निमय रथ आणि अग्नीचे घोडे पाठविले की एलीयाला त्याच्या उपस्थितीत आणावे. अलीशाच्या अटळ लक्ष देण्यास पुरस्कार दिला गेला जेव्हा त्याने देवाला एलीयास घेऊन जाताना पाहिले, आणि एलीयाचा झगा खाली पडला. त्याने तो झगा धरला आणि त्यास शांती प्राप्त झाली, कारण त्याचे डोळे, चक्राकार वावटळीच्या गोंगाटाने अडखळले जाण्याऐवजी घटनेच्या खऱ्या आध्यात्मिक महत्वावर केंद्रित होते.
वावटळ आपल्या सर्वांकडे येतात. काहींसाठी हे नोकरी गमाविणे असू शकते, इतरांसाठी, आजार; आणखी इतरांना आर्थिक नियंत्रणाबाहेर जाणे. जेव्हा इतर हे वावटळीच्या ढिगाऱ्याकडे पाहत बसतात, तेव्हा तुमचे डोळे वर करा आणि देवाकडे पाहा आणि असे होवो की तुमचे मुख व हृदयातून स्तुती आणि प्रशंसा येवो. तुमच्यापैकी जे हे वाचत आहेत ते वावटळीचा अनुभव करीत असू शकतील. त्याने तुम्हांला गोंधळात टाकू देऊ नका. त्याऐवजी, तुमचे डोळे येशूवर ठेवा, हे जाणून की तो तुमच्याबरोबर आहे आणि ह्या कठीण परिस्थितीतून तुम्हांला दिशा देईल आणि शेवटी तुम्हांला शांती आणि आध्यात्मिक वाढीकडे मार्गदर्शन करेल.
Chapters