संदेष्ट्यांपैकी एकजण वारला तेव्हा त्याची बायको विधवा झाली. ती अलीशाकडे रडत रडत आली, आणि म्हणाली, “माझा नवरा तुझा सेवक असल्यासारखा होता. परंतु आता तो मरण पावला आहे. परमेश्वराचा तो मान राखत असे हे तुला माहीत आहे. पण तो एका माणसाचे देणे लागत होता. तो माणूस आता माझ्या मुलांना गुलाम करुन घ्यायला येतो आहे.” (२ राजे ४: १)
मोशेच्या नियमशास्त्राच्या नियमांतर्गत, कर्जदार आणि त्याच्या संततीस कर्जदाराला गुलाम बनविण्याचा कायदेशीर अधिकार होता. जुबीली वर्षापर्यंत त्याची परवानगी होती-कर्ज क्षमा करण्याची वेळ. या प्रणालीमुळे दास्यत्वाद्वारे कर्ज काढून टाकले जाऊ शकत होते.
अलीशा म्हणाला, “मी तुला काय मदत करु? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग.” तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही.” (२ राजे ४: २)
जेव्हा आपण अशा परिस्थितींचा सामना करतो जेथे आपल्या गरजा ह्या आपल्या उपलब्ध संसाधनांपेक्षा अधिक असतात, तेव्हा आपल्याजवळ जे आहे ते आपण अनेकदा 'काहीच नाही' म्हणून फेटाळून लावतो. तरीही, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की देव 'काहीच नाहीस' चमत्कारामध्ये बदलण्यात माहीर आहे. २ राजे ४:२ मध्ये जसे उदाहरण दिले आहे, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याजवळ जे थोडे आहे त्यास देव बहुगुणीत करू शकतो, मग ती थोडीशी रक्कम, एक माफक प्रतिभा, समर्पित प्रार्थनेची वेळ, किंवा उपासाप्रमाणे आपला वैयक्तिक त्याग असो. देवाच्या हातात, 'काहीच नाही' हे दैवी विपुलतेचा प्रारंभ बिंदू आहे.
यावर अलीशाने तिला सांगितले, “आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. (२ राजे ४:३)
तिचा आज्ञाधारकपणा आणि विश्वासात, देवाच्या माणसाने दिलेल्या सूचना तिने पूर्ण केल्या. ही निवड, तथापि, कदाचित तिच्या शेजाऱ्यांना समजली नसती, आणि जिज्ञासू, कदाचित अनाहूत प्रश्न देखील प्रस्तुत केले असते. तरीही, देवाच्या संदेष्ट्याद्वारे दिले गेलेल्या प्रभूच्या वचनावर अतूट विश्वास प्रदर्शित करून तिच्या दृढ विश्वासाने संभाव्य सामाजिक अस्वस्थतेवर मात केली.
४मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव.” ५मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. (२ राजे ४: ४-५)
प्रार्थनेत, जेव्हा तुम्ही सर्व नकारात्मक वाणी, संशय आणि इतरांशी तुलनेसाठी द्वार बंद करता, हे मग तेव्हाच देवाच्या आशीर्वादांचा तुमच्या जीवनात वर्षाव होण्यास सुरुवात होतो. ह्या विचलित करणाऱ्या गोष्टी बंद केल्याने तुम्ही देवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करू शकता, जे मग अधिक सखोल आध्यात्मिक वाढीस चालना देते. आशीर्वादांचा वर्षाव सुरु होतो जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना करण्याचे थांबता आणि प्रभूमधील तुमच्या एकमेव पाचारणाची आणि आध्यात्मिक प्रवासाची प्रशंसा करू लागता.
६अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.” पण एकही भांडे शिल्लक नव्हते तिचा एक मुलगा तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले. ७मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल वीक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल.” (२ राजे ६-७)
विधवेचे तेल हे तेव्हाच थांबले जेव्हा तिने ओतणे थांबविले, हे सूचित करते की देवाचे आशीर्वाद हे आपल्या सातत्यपूर्ण विश्वासाच्या कार्याशी जुळलेले आहे.
हे इतरांना सतत देणे, आणि सेवा करण्याचे महत्त्व सूचित करते, मग याची पर्वा नाही की आमच्या प्रयत्नांची प्रशंसा किंवा प्रतिपूर्ती केली जाते. जेव्हा आपण अस्वीकार किंवा विश्वासघाताचा सामना करतो, तेव्हा माघार घेणे, आणि आपले प्रेम आणि सेवेचा वर्षाव करणे थांबवणे याचा मोह होऊ शकतो. तथापि, असे केल्याने, आपण आपल्या जीवनातील आशीर्वादांचा प्रवाह प्रभावीपणे थांबवितो.
लक्षात ठेवा, चमत्काराचे मोजमाप हे विधवेच्या विश्वासाच्या आधीच्या कृतिशी जुळलेले आहे- तिने किती पात्रे उसणे घेतली. अतिरिक्त तेल जे तिने प्राप्त केले त्याने केवळ तिचे कर्ज पूर्ण भरून काढले नाही परंतु तिच्या भविष्यातील तरतूदही सुनिश्चित केली. जर तिने अधिक पात्रे उसणे घेतली असती, तर त्यानुसार तिचे आशीर्वाद बहुगुणीत झाले असते; जर तिने कमी उसणे घेतले, तर तिने कमी प्राप्त केले.
त्यामुळे, हे महत्वाचे आहे की आपण आपली सेवा आणि वरदानांचा सतत वर्षाव करीत राहावे, इतरांच्या प्रतिक्रियांची पर्वा न करता. असे केल्याने, आपण आपल्या जीवनात देवाचा आशीर्वाद प्रवाहित होण्यासाठी द्वार उघडे ठेवतो. दानधर्म करण्याचे प्रत्येक कार्य-मग त्याची प्रशंसा होते किंवा नाही-ते भविष्यातील चमत्कारांसाठी बियाणे पेरते. दानधर्म करण्यासाठी आपल्या संकोचद्वारे आपण देवाच्या आशीर्वादांना मर्यादित करू नये. त्याऐवजी, बिनशर्त देण्याचा प्रयत्न करू या, हे जाणून की 'द्या आणि तुम्हांला देण्यात येईल' हे केवळ एक अभिवचन नाही तर एक दैवी तत्व आहे.
८एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहात होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे. ९एकदा ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा आपल्या इथे नेहमी येतो तो अलीशा परमेश्वराचा पवित्र माणूस आहे, तो नेहमी आपल्या घरावरुन जातो. १०तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या आणि एक पलंग, एक टेबल खुर्ची आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला उतरायला ही खोली होईल.” (२ राजे ८-१०)
शुनेमकरीन स्त्रीने तिच्या जीवनात देवाच्या उपस्थितीसाठी जागा निर्माण करण्याच्या कृतीचे प्रतीक म्हणून, तिच्या घरात संदेष्टा अलीशासाठी खोली बनविण्याद्वारे देवाच्या कार्यासाठी असणारा तिचा गहन आदर प्रदर्शित केला. हे केवळ एक भौतिक जागा बनवण्याबद्दल नव्हते परंतु सांसारिक चिंतांपेक्षा आध्यात्मिक बाबींना प्राधान्य देण्याविषयी होते.
प्रश्न ज्याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे तो हा आहे: देवाच्या कार्यासाठी आपण आपल्या जीवनात त्याप्रमाणेच जागा निर्माण करीत आहोत का? वेळ, शक्ती, संसाधनांसाठी आपण समर्पण करीत आहोत का की त्याची उपस्थिती स्वीकारावी आणि त्याची इच्छा पूर्ण करावी? असे करण्यासाठी आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये त्याच्या दैवी मार्गदर्शनाचे स्वागत करीत, देवाच्या अभिषेकास सामावून घेण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे शुनेमकरीन स्त्रीने तिच्या पाहुणचारासाठी आशीर्वाद अनुभवले, आपण देखील, दैवी पुरस्कार प्राप्त करू शकतो जेव्हा आपण देवाच्या अभिषेकाचे आयोजन करायला शिकतो.
अलीशा गेहजीला म्हणाला, “आपण तिच्यासाठी काय करु शकतो?”
गेहजी म्हणाला, “मला माहीत आहे की तिला मूलबाळ नाही आणि तिचा नवरा वृध्द आहे.” (२ राजे ४: १४)
एक सामर्थ्यशाली संदेष्टा असताना देखील, अलीशा शुनेमकरीन स्त्रीचे तिला मुल असण्याबद्दलच्या इच्छेशी अवगत नव्हता. हे प्रकट करते की देवाच्या संदेशवाहकांना देखील सर्वज्ञता नाही. काही गोष्टी ह्या त्यांच्यापासूनही गुप्तच राहतात. केवळ देवालाच आपल्या गहन इच्छा माहीत आहेत.
१६अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या पोटच्या मुलाला कुशीत घेऊन बसलेली असशील.”
ती म्हणाली, “नाही, माझे स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.” १७या बाईला दिवस राहिले. अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंतात तिने एका मुलाला जन्म दिला. (२ राजे ४: १६-१७)
या वांझ स्त्रीला पुत्राचे अभिवचन हे अकल्पनीय बक्षीसाप्रमाणे वाटले असेन. प्राचीन जगात, वांझपणा हा कठोर कलंक होता जो स्त्रियांना सहन करावा लागला, ज्यामुळे नेहमी खूप दु:खी व एकाकी वाटत असे. या दैवी अभिवचनाने पुत्र असण्याची तिची गहन इच्छा केवळ पूर्ण केली नाही परंतु त्यामुळे तिच्या वांझ अवस्थेशी संबंधित सामाजिक बदनामी देखील दूर होणार होती.
देवाच्या संदेष्ट्यासाठी एक स्त्रीने इतक्या उदारपणे भौतिक गोष्टींचा पुरवठा केला होता ती आता संदेष्ट्याच्या देवा द्वारे आशीर्वादित झाली होती. तुम्ही देवाच्या नावाकरिता काय केले आहे हे तो विसरत नाही.
या बाईने आपल्या मुलाला परमेश्वराचा माणूस अलीशाच्या पलंगावर ठेवले. खोलीचे दार लावून घेतले आणि ती बाहेर पडली. (२ राजे ४:२१)
स्त्रीचा विश्वास अढळ आणि प्रगल्भ होता. तिच्या पुत्राच्या मृत्युनंतर, तिने त्याच्या पुरण्याऐवजी त्याच्या पुनरुत्थानासाठी तयारी केली. एलीयाने सारफथ येथील विधवेच्या पुत्राला पुनरुत्थित केले होते त्याविषयी तिने नि:संशय ऐकलेल्या कथांपासून तिचा विश्वास निर्माण झाला होता.
पण ती डोंगर चढून वर गेली. अलीशाला वंदन करुन त्याचे पाय धरले. तिला दूर करायला गेहजी पुढे झाला. पण अलीशा त्याला म्हणाला, “तू मधे पडू नको, ती काळजीत आहे. परमेश्वराने मला याबद्दल सांगितले नाही. या बाबतीत त्याने मला अंधारात ठेवले.” (त्याने ही बातमी माझ्यापासून लपवली) (२ राजे ४:२७)
ही दुसरी वेळ होती की देवाने अलीशाला ती गोष्ट प्रकट केली नव्हती पण गुप्त ठेवली होती. पहिल्या वेळेला प्रभूने शुनेमकरीन स्त्रीला पुत्र नाही याबद्दल संदेष्टा अलीशाला सांगितले नव्हते, आणि दुसरा प्रसंग जेव्हा त्या स्त्रीचा पुत्र मरण पावला होता.
३२अलीशा घरात आला. ते मूल त्याच्या अंथरुणावर मृतावस्थेत पडले होते. ३३अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघंच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. (२ राजे ४: ३२- ३३)
अलीशा संदेष्टा, हा अढळ विश्वास असणारा माणूस होता, जो त्याचा शिक्षक एलीया द्वारे देवाच्या चमत्कारिक कार्यांचा प्रथम साक्षीदार होता आणि तो अनुभव घेतला होता. हा प्रभाव निर्णायक होता जेव्हा तो शुनेमकरीन स्त्रीच्या मृत पुत्राला सामोरे गेला. निराशेच्या स्थितीला सामोरे जाताना, अलीशाने गहन विश्वासाला प्रदर्शित केले होते. त्यास माहीत होते की देवाने असे चमत्कार पूर्वी एलीया द्वारे, अशाच परिस्थितीत केले होते. (१ राजे १७:२०-२३)
त्याचा विश्वास, तथापि, हा भूतकाळातील अनुभवांवर केवळ आधारित नव्हता. अलीशाला विवेकी आध्यात्मिक धारणाही होती, की मुलाला मृत्युमधून जिवंत करण्याचा देवाचा हेतू समजावा. त्याच्या शिक्षकाकडून शिकलेला विश्वास आणि त्याचे स्वतःचे आध्यात्मिक विवेक यावर तो अवलंबून राहिला, आणि देवाचा चांगुलपणा आणि सामर्थ्यावरच पूर्णपणे विश्वास ठेवून होता. अलीशाची निरंतर प्रार्थना ही त्यामुळे त्याच्या विश्वासाची साक्ष होती-विश्वास जो भूतकाळातील प्रमाणांवर मुळावलेला तरीही वर्तमान दैवी मार्गदर्शन स्वीकारण्यास तयार होता.
अलीशा गिलगाल येथे परत आला. तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडलेला होता. संदेष्ट्यांचा गट अलीशासमोर बसला होता. अलीशा आपल्या सेवकाला म्हणाला, “एक मोठे पातेले अग्निवर ठेव आणि या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.” (२ राजे ४:३८)
वचन ३८ मध्ये उल्लेख केलेला दुष्काळ हा कदाचित सात वर्षांचा दुष्काळ असेन जो २ राजे ८:१-३ मध्ये सूचित केला आहे.
३९ यावर एकजण रानात पाला गोळा करुन आणायला गेला. तेव्हा त्याला एक रानवेल दिसला. त्याची फळे तोडून त्याने तीअंगरख्याच्या खिशात भरून आणली व ती फळे कापून अग्निवरच्या भांड्यात टाकली. परंतु ती फळे कशाची आहेत ते काही त्या संदेष्ट्यांना माहीत नव्हते. ४०मग ही शाकभाजी सर्वाना खायला दिली. खायला लागल्यावर सर्वजण अलीशाला ओरडून सांगायला लागले. “परमेश्वराच्या माणसा, या भांड्यात तर विष आहे.” शाकभाजी अपायकारक असल्याने त्यांना ते खाता येईना. (२ राजे ४: ३९- ४०)
२ राजे ४:२९-४० मध्ये उल्लेख केलेली रानवेल ही पवित्र शास्त्राच्या काळातील त्या भागातील जंगली काकडी असावी असे वाटते. तिला थोड्या प्रमाणात घेतले जात असे, या वनस्पतीच्या कडूपणामुळे पोट खराब होऊ शकत होते, परंतु मोठ्या प्रमाणात घेतले तर, त्यामुळे गंभीर पाचक गुंतागुंत आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” पीठ आणून दिल्यावर अलीशाने ते मोठ्या भांड्यात घातले. मग अलीशा म्हणाला, “आता हे सगळ्यांना वाढा.” आता त्या शाक भाजीत काही दोष राहिला नव्हता. (२ राजे ४: ४१)
आध्यात्मिक पोषण आणि वाढीसाठी हे एका मौल्यवान तत्वाचे प्रदर्शन करते. पिठामधून विषारी पदार्थ शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, अलीशाने आणखी सपीठ त्यात टाकले. यामुळे घातक पदार्थाचे रुपांतर जीवन-सांभाळून ठेवणाऱ्या भोजनात झाले. हे एक गहन आध्यात्मिक धोरण प्रतिबिंबित करते: हानिकारक घटक किंवा चुकीच्या विश्वासाला (अर्थातच, त्याच्यासाठी येथे जागा आहे) काढून टाकण्याऐवजी, आपण जितके शक्य होईल तितके चांगले, पूर्ण आणि आध्यात्मिक पोषण देणारे घटक भरण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
योहान ६:३५ मध्ये प्रभू येशूला जीवनाची भाकर म्हणून व्यक्त केले आहे. लक्ष, हे त्यामुळे, त्याच्यावर आणि जीवन-देणाऱ्या त्याच्या वचनांवर असले पाहिजे. ख्रिस्तावर आपला विश्वास, विचार आणि भक्ती केंद्रित करण्याद्वारे, जे कधी हानिकारक असे होते त्यास आपण काहीतरी लाभदायक आणि जीवन-देणारे म्हणून रुपांतरीत करू शकतो. सदोष सिद्धांत किंवा चुकीच्या समजुतीचे 'विष' हे ख्रिस्ताच्या समृद्ध आणि जीवनाची पुष्टी करणाऱ्या संदेशाद्वारे निष्फळ केले जाते. येशूच्या जीवन-देणाऱ्या शिकवणीमध्ये आपण जितके अधिक भरून जातो, तेव्हा हानिकारक घटकांना तितकीच कमी जागा मिळते. आध्यात्मिक नवीनीकरणाची ही दैवी प्रक्रिया आहे, चमत्कारिक घटनांप्रमाणे रुपांतर जेव्हा अलीशाने विषारी पीठाला खाण्यास सुरक्षित असे केले.
४२बाल-शालीश येथून एकदा एक माणूस आपल्या नव्या पिकाची भाकर परमेश्वराच्या माणसासाठी घेऊन आला. त्याने सातूच्या वीस भाकऱ्या आणि पोतेभरुन कोवळी कणसे आणली होती. तेव्हा अलीशा म्हणाला, “हे सर्व या लोकांना खायला दे.” ४३अलीशाचा सेवक म्हणाला, “काय? इथे तर शंभर माणसे आहेत. एवढ्या सगळ्यांना हे कसे पुरेल?” पण अलीशाने त्याला सांगितले, “तू खुशाल ते आहे तेवढे या सर्वांना दे. ‘ते पोटभर खातील आणि शिवाय त्यातून उरेल,’ असे परमेश्वर म्हणतो.” ४४मग अलीशाच्या नोकराने त्या संदेष्ट्यांसमोर सर्व अन्न ठेवले. त्यांनी ते पोटभर खाल्यावरही काही अन्न शिल्लक उरलेच. परमेश्वर म्हणाला तसेच झाले. (२ राजे ४: ४२-४४)
संदेष्टा अलीशाने भाकरीच्या लहानशा तुकड्याने १०० माणसांना तृप्त केले, जे प्रभू येशूने केलेल्या चमत्काराशी निर्विवाद समांतरता दाखवते, विशेषतः त्याचे लोकसमुदायाला तृप्त करणे. ही समानता ख्रिस्ताचा अग्रदूत किंवा प्रकार म्हणून अलीशाची भूमिका अधोरेखित करते, जे समान दैवी गुणधर्म आणि कृतींचे वर्णन करते.
ज्याप्रमाणे प्रभू येशूने हजारो लोकांना तृप्त करण्यासाठी भाकर बहुगुणीत केली, त्याप्रमाणेच, अलीशाने देखील, देवाच्या सामर्थ्याने, १०० माणसांना तृप्त करण्यासाठी भाकरीचा लहानसा भाग वाढविला होता, अशा प्रकारे देवाचा पुरवठा आणि त्याच्या लोकांची काळजी दर्शविते. अलीशाच्या जीवनातील ही घटना जुन्या करारातील व्यक्ति आणि येणारा मशीहामधील संबंध मजबूत करते, जे लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तित्व आणि सेवा कार्यासाठी तयार करते.
Chapters