नामान हा अरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्याला कोड होते. (२ राजे ५:१)
बायबल नामानबद्दल कसे वर्णन करते त्याकडे पाहा:
• अरामाच्या सेनेचा सेनापती
• एक थोर व प्रतिष्ठीत पुरुष
• एक पराक्रमी वीर पुरुष
पण एक कोढी होता.
नामानाच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडत होत्या, पण एक गोष्ट त्याच्या आयुष्यातील इतर सर्व गोष्टींवर अक्षरशः सावली करत होती.
ज्यांना जग सदोष, अपयशी, कमकुवत नीच समजते अशा लोकांचा देव कसा उपयोग करतो हे मला आश्चर्याने भरणे कधीही थांबवत नाही. या प्रकरणात, जरी नामान हा कोढी होता, देवाने त्याचा उपयोग केला, आणि त्याच्या द्वारे, देवाने अरामी देशाला विजय दिला होता.
जर तुम्ही बायबल वाचले असेल, तर तुम्हांला समजेल की योसेफ बंदिवान होता. दानीएल बंदिवान होता. ती लहान मुलगी बंदिवान होती. बंदिवासात राहणे ही काही सुखद गोष्ट नाही.
अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलमध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलमधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानच्या बायकोची दासी झाली. (२ राजे ५:२)
त्यांच्या शारीरिक स्वातंत्र्याशी तडजोड केली गेली होती, तरीही उल्लेखनीय, त्यांची आध्यात्मिक लवचिकता अखंड होती. समजण्यासारखे, बंदिवास हा एक भयावह अनुभव होता. तरीही, योसेफ, दानीएल आणि लहान मोलकरीण यांच्यामधील गहन समानता ही, त्यांच्या साखळ्यांच्या चेंगरून टाकणाऱ्या ओझ्याखाली असताना देखील, त्यांचा देवावरील अढळ विश्वास होता.
देवाविरुद्ध त्यांनी कधीही संताप बाळगला नाही. त्याऐवजी, संकटातही त्यांचा विश्वास वाढला, सहन करणाऱ्या विश्वासाचे प्रदर्शन केले ज्याने त्यांच्या भौतिक परिस्थितीच्या पलीकडे नेले होते.
नामानाच्या घरातील ही लहान मुलगी, कुटुंब व मित्र यांच्यापासून खूप दूर, एका अनोळखी देशात एकटीच असताना, नामानाच्या घरात गुलाम म्हणून काम करीत होती. नामान व त्याच्या कुटुंबाबद्दल तिने फार सहज कटुत्व आणि दु:खी भावना बाळगली असती. अखेर, ती तिच्या इच्छेविरुद्ध तेथे होती. ती देवावर सहज नाराज होऊ शकली असती आणि म्हणाली असती, "मला या देवाशी काहीही घेणेदेणे नाही.' देवाने मला अशा गोंधळाच्या अवस्थेत कसे येऊ दिले.'
ती नामानच्या बायकोला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनमधला संदेष्टा अलीशा याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे कोड बरे करु शकेल.” (२ राजे ५:३)
असे काही आहेत जे त्या गोष्टी मनात बाळगतात आणि त्यावर विचार करत राहतात ज्या त्यांच्याबरोबर भूतकाळात घडल्या होत्या. ते त्यांच्या भूतकाळाने बंदिस्त आहेत. बंदिवासात असणे हे चांगले नाही, पण बंदिस्त असण्याचे मन आणि वागणूक ठेवणे हे अत्यंत वाईट आहे.
या उलट, ही मुलगी तिचा स्वामी नामान याच्याबद्दल विचारशील आणि सहनुभूतीशील होती. ती ज्याच्या घरात गुलाम म्हणून होती त्या व्यक्तीबद्दल तिने चांगला विचार केला. ती कसे उत्तर देते याकडे पाहा.
"शोमरोनातल्या संदेष्ट्याशी (अलीशा) माझ्या धन्याची गाठ पडली तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते."
जरी ती एक लहान मुलगी होती, तरी तिला देव व देवाचा संदेष्टा अलीशाबद्दल बरेच काही ठाऊक होते. याचा अर्थ हा आहे की ती अशी मुलगी होती जिला लहान वयातही देवाच्या गोष्टींमध्ये प्रशिक्षित केले गेले होते. मी विश्वास ठेवतो की देव लहान लेकरांना देखील श्रीमंत आणि प्रभावी व्यक्तींवर छाप पाडण्यासाठी उपयोग करू शकतो आणि त्यांना त्याच्या राज्यात आणतो.
यामुळेच तुम्ही तुमच्या लेकरांना लेकरांच्या सेवाकार्यात आणले पाहिजे, जे आमच्या मुख्य उपासनेबरोबर चालू असते. त्यांना देवाचे वचन आणि उपासनेमध्ये प्रशिक्षित केले जाते. त्यांच्या विकासाच्या या महत्वाच्या पैलूंना पुढे ढकलणे हे भविष्यात खेद करण्याकडे नेऊ शकते जेव्हा आपण इच्छा केली असती की त्यांनी देवाबद्दल पूर्वीच ओळखले पाहिजे होते. कृपा करून आजच सुरुवात करा. निर्णय घ्या; मी माझ्या लहान लेकरांना देवाच्या घरात घेऊन येईन आणि लहान वयातच त्यांना देवाच्या वचनात प्रशिक्षित करेन.
"मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे; म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. (नीतिसूत्रे २२:६)
ज्यांनी आपले वाईट केले, आपल्याला दुखावले, आणि आपला अस्वीकार केला आहे त्यांच्यासाठी आपल्याला येथे एक शिकवण आहे. आपण त्यांच्यासाठी चांगले करण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजे.
नामान मग अरामच्या राजाकडे गेला. त्याने राजाला ही इस्राएलची मुलगी काय म्हणाली ते सांगितले. (२ राजे ५:४)
सर्वात मनोरंजक गोष्ट ही आहे की या लहान मुलीने जे बोलले ते राजवाड्यात ऐकण्यात आले. तिची वाणी राजवाड्यात ऐकण्यात आली.
देवाचा आत्मा मला हे म्हणताना मी ऐकला, "अपराध, दुखावले जाणे आणि क्षमाहीनतेस त्यांच्यावर मात करू देण्याचा जे अस्वीकार करतात- त्यांची वाणी प्रभावाच्या ठिकाणी ऐकू येईल. त्यांची वाणी राजापुढे नक्कीच ऐकण्यात येईल."
जर या लहान मुलीने तिच्या मनात कटुत्व आणि क्षमाहीनता बाळगली असती, तर तिने कदाचित असे म्हटले असते, "हा माणूस नामान याने मला माझ्या कुटुंबापासून वेगळे केले. आता तो कोढी आहे, हे चांगले आहे. देवाने माझे समर्थन केले आहे. देवाची स्तुती होवो." तथापि, तिने अपराध, दुखावले जाणे आणि क्षमाहीनता बाळगण्याचा नकार दिला. हे कारण होते की नामान बरा झाला आणि देवाकडे वळला.
९तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराशी आला आणि दाराबाहेर थांबला. १०अलीशाने नोकरा मार्फत नामानला निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात सात वेळा स्नान कर म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील.”
११नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “मला वाटले, अलीशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवील आणि मला बरे करील. १२अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करुन मी शुध्द का होऊ नये?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला. (२ राजे ५:९-१२)
आता नामान अपमानित झाला होता कारण अलीशाने नामानास वाटले तसे वागले नाही. नामान त्याच्या चमत्काराच्या इतक्या जवळ होता, आणि तरीही त्याने ते गमावले असते कारण तो अपमान मनात बाळगून होता.
येथे अनेक ख्रिस्ती लोक आहेत जे त्यांच्या चमत्काराच्या इतक्या जवळ येतात आणि ते गमावितात कारण ते अपमान आणि दुखावले गेल्याच्या भावनेस त्यांच्यावर मात करू देतात.
एके दिवशी, आम्ही उपासना घेतली, आणि संपूर्ण जागा भरलेली होती. तेथे अक्षरशः दरवाजाजवळ देखील जागा नव्हती. स्वयंसेवक लोकांना जाण्याच्या वाटेवर बसवण्याचा प्रयत्न करीत होते. एक कुटुंब आले आणि आमच्या स्वयंसेवकांना बोलले. आम्ही येथे जमिनीवर बसण्यासाठी आलो नाही. जर येथे जागा नव्हती, तर तुम्ही आम्हाला का बोलावले? लोक जे अत्यंत बुद्धिमान आणि समाजातील उच्च पदावर होते ते जमिनीवर बसलेले होते. त्या दिवशी देवाच्या आत्म्याने सामर्थ्याने स्पर्श केला. त्या कुटुंबाने अपराधामुळे त्यांचा आशीर्वाद गमावला होता.
तातडीच्या कारणामुळे जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता, तेव्हा बसण्यासाठी तुम्हांला मऊ उशी दिली तर काही फरक पडतो का? नाही, विषय केवळ एवढाच असतो की जीवन हे वाचवले गेले पाहिजे-आरोग्य हे मिळाले पाहिजे-एवढेच हवे असते. लोक ऑपरेशन थिएटरच्या बाहेर अन्न-पाण्याशिवाय तासंसात थांबून राहतात-सर्व जण केवळ एवढीच आशा करीत असतात की त्यांचे प्रियजन हे वाचले जावे.
Chapters