यावर यहोशाफाट म्हणाला, “येथे एखादा परमेश्वराचा संदेष्टा नक्कीच असला पाहिजे. आपण काय करावे असे परमेश्वराला वाटते ते आपण त्यालाच विचारु या.”यहोरामचा एक सेवक म्हणाला, “शाफाटचा मुलगा अलीशा इथेच आहे. एलीयाच्या हातावर तो पाणी घालत असे, त्याचा तो सेवक होता.” (२ राजे ३:११)
अशा दिवसांत जेथे पुरुष स्वतःवर अनोख्या शीर्षकांचा भडीमार करीत असे, देवाच्या कोणत्याही सेवकासाठी हे एक अद्भुत शीर्षक आहे. एलीयासाठी अलीशाची नम्र तरीही व्यवहारिक सेवा त्याचे अतूट समर्पण आणि वचनबद्धता प्रतिबिंबित करते. संदेष्टा एलीयाच्या हाताखाली त्याच्या प्रशिक्षणाच्या काळादरम्यान आध्यात्मिक पाया जो त्याने प्राप्त केला त्याने केवळ त्याच्या क्षमतेस सन्मानित केले नाही परंतु त्याच्या भविष्यकाळासाठी त्यास आणखी सज्ज देखील केले.
तेव्हा आता एखाद्या वीणावादकाला इथे बोलावून आणा.”
एक वादक येऊन वीणा वाजवू लागला तेव्हा परमेश्वराचे सामर्थ्य अलीशात आले. (२ राजे ३:१५)
हा निनावी संगीतकार देवाने दिलेल्या वरदानांसह प्रतिभासंपन्न होता, आणि त्याने देवाच्या गौरवाकरिता त्याचा उपयोग केला. त्याने असा कधीही विचार केला नाही की संगीत युद्ध जिंकण्यात आणि इतिहासाचा मार्ग बदलण्यास मदत करण्याइतके मोठे काहीतरी करू शकते. परंतु प्रत्यक्षात तसेच घडले. या निनावी संगीतकाराने त्याच्या कौशल्याच्या सन्मानासाठी तासंतास तालीम केली असावी, आणि एके दिवशी देवाने दिलेल्या त्याच्या क्षमतेसह, देवाचे सामर्थ्य संदेष्टा अलीशावर आले.
१६मग अलीशा म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे: या खोऱ्यात जागोजाग खणून ठेवा १७परमेश्वर म्हणतो तुम्हाला वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल. तुम्हाला आणि तुमच्या जनावरांना पाणी मिळेल. (२ राजे ३:१६-१७)
देवाने दरीमध्ये पाणी पाठविण्याचे अभिवचन दिले, परंतु देव काय पुरविणार होता ते गोळा करण्यासाठी त्यांना खड्डे खणावयाचे होते. पाणी दिसण्यापूर्वी त्यांना खड्डे खणावे लागले, म्हणजे जेव्हा ते येईल तेव्हा ते त्याच्यापासून लाभ घेऊ शकतील.
यावरून हे तत्व दिसून येते की देवाला जो आशीर्वाद द्यायचा आहे त्यासाठी आपण तयारी करावी अशी त्याची इच्छा आहे. त्याचे ऐकण्याने, आपण त्याच्या कार्यात सहभागी होतो आणि त्यासाठी तयार होतो.
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की देवाच्या आशीर्वादांसाठी तयारी करणे हे नेहमीच बागेत चालण्यासारखे नाही. ते मागणी करणारे होऊ शकते, कधीकधी रखरखीत वाळवंटात खड्डे खोदण्यासारखे कोरडे आणि आव्हानात्मक असे वाटते. इस्राएली लोक, थकलेले आणि कोरडे पडलेले, एका कठीण कामाचा सामना करीत होते. त्या दृश्याची कल्पना करा: थकलेली माणसे, तहानेने तोंड कोरडे पडलेले, खड्डे खणण्याची संदेष्ट्याची आज्ञा सांगताना त्यांच्या नेत्यांकडे पाहत आहेत. जेरीस आणणारे उद्धिष्ट, यात काही शंका नाही, परंतु सर्वात आवश्यक असे होते. या तयारीवर त्यांचे जगणे अवलंबून होते.
दररोजच्या आयुष्याच्या चक्रात, आपण त्या परिस्थितींचा सामना करू शकतो जे आपल्याला शारीरिक, भावनात्मक किंवा आध्यात्मिक रीतीने पिळून काढू शकतात. हे रखरखीत, उजाड आणि निरुसाहीप्रमाणे वाटू शकते. परंतु हे असे समय आहेत जेव्हा आपल्याला आपले खड्डे खणण्यास बोलावण्यात येते, की आपल्याला आशीर्वादांच्या दैवी वर्षावासाठी तयार करावे.
कदाचित याचा अर्थ एक सुसंगत प्रार्थना जीवन राखणे असा असू शकतो, जरी जेव्हा आपण शून्यात बोलत आहोत असे वाटत असले. याचा अर्थ जरी ते बदलत नसले तरी, इतरांची सेवा प्रीतीने व दयेने करीत राहावे असा असू शकतो. किंवा त्याचा अर्थ हा असू शकतो की जरी जेव्हा परिणाम हे ताबडतोब दिसत नाहीत, तरी व्यक्तिगत वाढ आणि विकासाचा पाठपुरावा करीत राहणे.
जर आपण पेंटेकॉस्टचा आशीर्वाद अनुभवण्याची अपेक्षा करीत असलो तर आपण त्यासाठी तयारी केली पाहिजे. "ही दरी पूर्णपणे खळग्यांनी भरून काढा हा सल्ला नाही परंतु देवाकडून आपल्यासाठी आज्ञा आहे.
पेंटेकॉस्टच्या आशीर्वादासाठी तयारी करण्यात कोणाला क्षमा करणे समाविष्ट असू शकते; एकता आणि सुसंवादामध्ये कार्य करणे त्यात समाविष्ट असू शकते, सदस्यांमध्ये आध्यात्मिक वाढीला प्रोत्साहन देणे, किंवा स्थानिक समाजाची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे जाणे. उघड आध्यात्मिक कोरडेपणाच्या कालावधीमध्ये देखील, आत्म्याचा आशीर्वाद जेव्हा तो येतो तेव्हा त्यास प्रवाहित होण्यासाठी आपण मार्ग तयार करणे सतत चालू ठेवले पाहिजे.
तथापि, आपण हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की प्रयत्न जे आपण त्यासाठी लावतो ते तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नाही, कारण देवाची कृपा ही कार्याने प्राप्त केली जात नाही. त्याऐवजी, आपल्या तयारीने आपल्याला देवाच्या योजनेशी सुसंगत केले पाहिजे, जेव्हा त्याचे आशीर्वाद येतात तेव्हा त्यांना प्राप्त करण्यासाठी आणि बहुगुणीत करण्यासाठी आपल्याला तयार करावे.
नंतर सकाळी, सकाळच्या यज्ञाच्या वेळी, अदोमच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि सगळे खोरे पाण्याने भरले. (२ राजे ३:२०)
वेदीवर जेव्हा इस्राएली लोकांनी त्यांचे धान्य अर्पण केले, तेव्हा ते देवाला त्याची दया आणि त्यांच्या गरजा पुरविण्यासाठी आभार मानत होते. पवित्र शास्त्र सांगते की जेव्हा धान्य अर्पण केले जात असे, तेव्हा देव पाण्याची त्यांची गरज पुरवीत होता जे त्यांना जिवंत ठेवण्यासाठी महत्वाचे होते.
Chapters