जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ती तुडवितील व उलटून तुम्हांस फाडितील." (मत्तय ७:६)
प्रत्येक जणांस उपदेश देण्यात येणार नाही. आपल्याला दैवी ज्ञानाची गरज आहे की याची पारख करावी की कोण स्वीकारणारा आहे आणि कोण नाही.
"मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल." (मत्तय ७:७)
मागणे व प्राप्त करणे हे पुढील वचनांच्या प्रकाशात पाहिले पाहिजे:
आपण विश्वासाने मागितले पाहिजे (मत्तय २१:२२ व मार्क ११:२४)
शंका न बाळगता आपण मागितले पाहिजे (याकोब १:५-७)
आपण देवाच्या इच्छेप्रमाणे मागितले पाहिजे (१ योहान ५:१४-१५)
आपण आपल्या स्वतःच्या वासनांवर खर्च करण्यासाठी नाही मागितले पाहिजे (याकोब ४:२-३)
शोधणे आणि प्राप्त करणे हे मत्तय ६:३३ च्या सुद्धा प्रकाशात असले पाहिजे. जर आपण देवाचा शोध करण्यापेक्षा कशाचा तरी अधिक शोध घेत आहोत, आपण आपल्या स्वतःच्या पूर्ततेस अडथळा करीत आहोत.
"लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा." (मत्तय ७:१२)
तुम्ही दहा आज्ञा एका वचनात एक करू शकत नाही
मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. (मत्तय ७:२१)
विश्वासाचे केवळ उच्चारण हे पुरेसे नाही. आपण जे विश्वास ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला प्रत्यक्षात जगले पाहिजे. आज आपण पाहतो शेकडो हे चर्च उपासना, प्रार्थना सभा व प्रार्थना परिषदांना येतात-ते चांगले आहे परंतु ते जे विश्वास ठेवतात त्यानुसार त्यांचे जीवन दिसत नाही. हे मग खरेच काही लोकांना निराश करते. ते शुभवर्तमान ला अडथळा करते. महात्मा गांधींनी म्हटले होते, "ख्रिस्त व त्यांची शिकवण मला आवडते, परंतु मला ख्रिस्ती लोक आवडत नाहीत." महात्मा गांधींनी असे का म्हटले?
लूक ६:४६ मध्ये, येशूने म्हटले, "तुम्ही मला प्रभु, प्रभु म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही?"
"कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतील." (रोम २:१३)
"ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.
तसेच जो कोणी हे माझी वचने ऐकून त्यांप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, वा त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले." (मत्तय ७:२४-२७)
एकच कारण की का एका मनुष्याला सुज्ञ व दुसऱ्याला मूर्ख असे म्हटले याचे कारण हे की एकाने ख्रिस्ताची शिकवण ऐकली व त्याप्रमाणे केले आणि दुसऱ्याने केवळ ऐकले, ऐकत राहिला परंतु त्या गोष्टी केल्या नाहीत. तोच तर फरक आहे सुज्ञ असण्यात व मूर्ख असण्यात.
एके दिवशी एक मनुष्य दात दुखत आहे असे आमच्या सभेला आला म्हणून मी त्याच्यासाठी प्रार्थना केली व त्यास ब्रश व टूथपेस्ट सुद्धा दिली. पुढच्या सभेला तो आला, आणि त्याच्यापेक्षा अधिक त्यास दाता मध्ये दुखत होते. मी त्यास विचारले, काय झाले, त्याने म्हटले, मी विश्वासपूर्वक तो ब्रश व टूथपेस्ट माझ्या उशीखाली ठेवले. आपल्यापैकी किती जनांना हे ठाऊक आहे की असे करणे हे सुज्ञपणाचे नव्हते. आता, हे केवळ एक उदाहरण आहे, परंतु मला खात्री आहे की तुम्हाला मुद्दा समजला असेल.
तुमच्या जीवनात बदल हा येईल केवळ तेव्हाच जेव्हा तुम्ही देवाचे वचन पाळाल. प्रचारक, चर्च किंवा प्रार्थना सभेला दोष देऊ नका.
जग हे अनुभवी लोकांचा अत्यंत आदर करते कारण ते हे लोक आहेत ज्यांनी ऐकले, शिकले व त्या गोष्टी आचरणात आणल्या आहेत. त्याप्रमाणेच, लोक जे देवाचे वचन पाळतात त्यांचा देवाच्या राज्यात अत्यंत आदर केला जाईल.
१. प्रत्येकाने घर बांधिले, परंतु त्यांनी भिन्न मार्गाने ते बांधिले.
२. तीच गोष्ट जी सुज्ञ मनुष्याच्या विरोधात आली तीच मूर्ख मनुष्याचा विरोधात सुद्धा आली- वारा, पूर, व पाऊस. प्रत्येक घर हे त्याच परीक्षेच्या अधीन होते. कोणतेही घर हे परीक्षेवाचून राहिले नव्हते. तेच वादळ ज्याने एका घराला धडक दिली त्याने दुसऱ्या घराला सुद्धा धडक दिली. ख्रिस्ती-जीवन हे वादळापासून मुक्त जीवन नाही. आपण वादळामधून जाऊ. परमेश्वराने त्याच्या वचनात हे कधीही म्हटले नाही की येथे कधीही वादळ नसणार. कोणताही संदेश जो असे म्हणेल की तुमच्या जीवनात कधीही वादळ हे येणार नाही ती फसवणूक असेल.
वास्तवात, पौल व बर्णबा ने प्रारंभीच्या चर्च ला म्हटले, "आपणांला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते." (प्रेषित १४:२२)
लूक मध्ये एक महत्वाचे सत्य हे जोडले गेले आहे जे मत्तय मध्ये नाही.
ते म्हणते की मनुष्य ज्यास खोलवर जायचे होते त्यास खडकापर्यंत खोल खणावयाचे होते. खडकावर बांधण्यापूर्वी त्यास बऱ्याच गोष्टी ज्या अडखळण करीत होत्या त्या काढावयाच्या होत्या. आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत हे खरे सुद्धा आहे. आपल्यापैंकी जे अनेक एका सामान्य ख्रिस्ती संस्कृती मध्ये वाढतो, येथे अनेक अडथळे व प्रभाव आहेत ज्यास आपल्याला काढावयाचे असते यापूर्वी की आपण खडकापर्यंत पोहोचावे. इतर, सुद्धा, जे पूर्णपणे ख्रिस्ती-विरहित संस्कृती मध्ये वाढले आहेत त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी काढून टाकावयाच्या असतात, परंतु त्या वेगळ्या असतात.
१. रूढी
२. दु:खविणे
येथे वचनात नेहमीच काही शब्द असतील जे तुम्हाला दु:खवितील
येथे चर्च मध्ये सुद्धा लोक असतील जे तुम्हाला दु:खावितील
पाया
एकच कारण की का एक घर स्थिर राहिले आणि एक पडले हा तो पाया मधील फरक होता. एक पाया हा वाळू होता व इतर पाया हा खडकावर होता. वाळू ही नेहमीच हलते, सरकते त्याउलट खडक हे स्थिर असतात-भक्कम. वाळू हे जगाचे तत्वज्ञान आहे. याउलट खडक हे देवाचे वचन आहे.
Chapters