त्याने त्यास उत्तर दिले,तुमच्या वाड-वडिलांद्वारे तुम्हाला दिलेल्या नियमा खातर तुम्ही देवाची आज्ञा मोडता व त्याचे उल्लंघन का करिता? (मत्तय १५:३)
मी अवश्य विश्वास ठेवतो की आपल्या वाड-वडिलांद्वारे दिलेले नियम (रूढीपरंपरा)हे जोपर्यंत देवाच्या नियमांचे उल्लंघन करीत नाही, तर हे ठीक आहे की त्यांचे पालन करावे. ह्या त्या रूढीपरंपरा आहेत ज्याविषयी प्रेषित पौलाने पुढील वचनात म्हटले आहे. ही वचने जे येशूने शिकविले त्याचा विरोध करीत नाहीत.
तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करिता आणि मी तुम्हांला सांगून ठेवलेले विधी जशाचे तसे दृढ धरून पाळता, ह्याबद्दल मी तुमची वाहवा करितो. (१ करिंथ ११:२)
तर मग बंधुंनो, स्थिर राहा, आणि तोंडी किंवा आमच्या पत्रद्वारे जे संप्रदाय तुम्हांस शिकविले ते बळकट धरून राहा. (२ थेस्सलनी २:१५)
समस्या निर्माण होते जेव्हा लोक वाड-वडिलांद्वारे दिलेल्या नियम (रूढीपरंपरा) खातर देवाच्या नियमांचे उल्लंघन करतात.
कारण देवाने असे म्हटले आहे की, तूं आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करितो त्याला देहांतशिक्षा व्हावी. (मत्तय १५:४)
१. तो जो शाप देतो-आशीर्वाद देतो
२. किंवाअपशब्द बोलतो
३. किंवा वाईट बोलतो
४. किंवा अत्याचार करतो
५. किंवा त्याच्या बापाला किंवा आईला वाईट वागणूक देतो.
जेव्हाव्यक्ति त्याचा पिता व आई चा सन्मान करतो, त्याच्यामध्ये जीवन हे कार्य करते. तथापि, जेव्हाव्यक्ति पिता व आई चा अपमान करतो, मृत्यू हा त्याच्यामध्ये कार्य करीत आहे. आपण आपला पिता व आई चा सन्मान करण्याचे मार्ग पाहावे.
परंतु तुम्ही म्हणता की, जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते [ ते म्हणजे पैसा आणि जे काही माझ्याजवळ आहे ते तुम्हाला साहाय्य करण्यास वापरावे] ते मी देवाला अर्पण केले आहे, मग तो त्यापासून सुटला आहे, आणि आता तो त्याचा बाप आणि आई यांचा मान राखण्यास किंवा साहाय्य करण्यास बंधनात नाही. (मत्तय १५:५)
जरी तुम्ही परमेश्वराची सेवा करीत आहात, तर तुम्ही तुमचे पिता व आई यांची काळजी घेण्यापासून किंवा त्यांना साहाय्य करण्यापासून सुटलेले नाही.
आपण देवाच्या वचनाला प्रभावकारी होऊ नये असे केव्हा करतो?
म्हणून तुमच्या रूढीपरंपरेच्या खातर (वाड-वडिलांद्वारे दिलेले नियम), तर तुम्ही देवाच्या वचनाला बाजूला केले आहे [त्यास प्रभाव करणे व अधिकार पासून वंचित आणि त्यास प्रभाव करू नये असे केले आहे] (मत्तय १५:६).
आपण देवाच्या वचनापेक्षा आपल्या रूढीपरंपरे ला अधिक महत्त्व देतो.
जे तोंडातून निघते ते अंत:करणातून येते व माणसाला विटाळविते. कारण अंत:करणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोटया साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात; न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवीत नाही. (मत्तय १५:१८-२०)
तोंडाद्वारेदूषित होणे. जर काहीतरी जे तोंडातून बाहेर येतेत्यास व्यक्तीला दूषित करण्याचे सामर्थ्य आहे तर मग काहीतरी जे आपल्या तोंडातून बाहेर येते [देवाचे वचन]त्याला सुद्धा सामर्थ्य आहे की व्यक्तीला शुद्ध करावे.
मरण व जीवन हे जिभेच्या हाती आहे. (नीतिसूत्रे १८:२५)
तुमच्याशब्दा द्वारे तुमचा न्याय केला जाईल, व तुमच्या शब्दा द्वारे तुमचा धिक्कार केला जाईल.
जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते. (मत्तय १५:११)
जे तोंडातून बाहेर येते ते काय करू शकते
१. व्यक्तीलादूषित करते
२. व्यक्तीला सन्मान आणते
३. व्यक्तीला अपमान आणते
त्यांनाअसू दया; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. (मत्तय १५: १४)
एक पुढाऱ्याने आध्यात्मिकदृष्टया आंधळे नाही असले पाहिजे. ह्यामध्ये हा सुद्धा बोध आहे की एक पुढाऱ्यास त्याचे किंवा तिचे आध्यात्मिक डोळे उघडेठेवले पाहिजे की लोकांचे योग्य पुढारपण करावे.
तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो; आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. (मत्तय १५: २८)
तिने काहीतरी म्हटले ज्याने तिला ज्याची अधिक आवश्यकता होती ती सुटका आणली. काहीतरी तिने म्हटले ज्याने तिच्या विश्वासाला प्रदर्शित केले. दोन्हीही प्रकरणात इस्राएल मध्ये मोठा विश्वास दिसून आला.
Chapters