त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही संध्याकाळी म्हणता, उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे; आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे तुम्हांला ओळखता येत नाहीत? (मत्तय १६: २-३)
येशूच्या वेळी, लोकांकडे सुद्धा वातावरण बद्दल भाकीत करण्याचे समजत होते. आभाळाकडे पाहून, ते सांगू शकत होते की वातावरण कसे होईल.जरी ते वातावरणा बद्दल सव्विस्तर माहिती देऊ शकत नव्हते, तरी ते सामान्यपणे हे सांगू शकत होते कीत्या दिवशी काय होणार आहे. सकाळीआभाळ तांबूस, उघाड होईल, रात्रीतांबूस आभाळ, चांगले वातावरण.
ह्यासामान्य सिद्धांताला कुतर्क सांगणाऱ्या उपकरणाची गरज नाही.
जरी पुढारी वातावरण बद्दल भाकीत करू शकत होते, तरी त्यांना आध्यात्मिक पारख नव्हती. परुशी, शास्त्री, सदुकी ह्यांनी राष्ट्रात एक आध्यात्मिक पुढारी असले पाहिजे होते. दुखद आहे की ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी होते. ते पृथ्वीवरील गोष्टींनी इतके भरलेले होते की त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते.
त्यांच्याप्रमाणेच, आपण सुद्धा सावधान असले पाहिजे. जरी आपण तंत्रज्ञान व इतर विभागात इतकी प्रगती केली आहे ते आपल्याला आपल्या जीवनासाठी आध्यात्मिक दृष्टीकोण घेण्यास साहाय्य करू शकत नाही. आपण आपल्या बुद्धीवरच अवलंबून नाही राहिले पाहिजे परंतु त्याऐवजी आपण देवाच्या वचनावर विसंबून राहिले पाहिजे. नाहीतर, आपणनिश्चितचढोंगी होणार,जसे पूर्वीचे पुढारी होते.
तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नाही तर परुशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले. (मत्तय १६:१२)
मत्तय १५:९, १६:१२ आपल्याला हे स्पष्टपणे दाखविते की, सर्व सिद्धांत जे वेगवेगळ्या प्रचारक व शिक्षकांद्वारे प्रचार केले जाते ते सर्व देवापासून नाहीत. प्रभु येशूने त्याच्या शिष्यांना इशारा दिला होता की, परुशी आणि सदूकी ह्यांच्या सिद्धांताविषयी सावध असावे.
पेंटेकॉस्ट च्या दिवशी परिवर्तीत झालेले लोक (प्रेषित २:४१-४२), हे प्रेषितांचे सिद्धांत, संगती, प्रार्थना आणि भाकर मोडणे, ह्यामध्ये सतत स्थिर राहिले, परंतु त्यामध्ये सिद्धांत सर्वोच्च होते.
एक थोडासा खमीर संपूर्ण गोळ्याला फुगवितो (गलती ५:९). खमिराची तुलना सिद्धांताशी केली आहे. म्हणून आपल्याला सावधान असले पाहिजे की योग्य सिद्धांतांचे पालन करावे.
ह्यासाठीकी, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरुपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. (इफिस ४:१४)
विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्याकडून आचरणाऱ्यास लाभ नाही अशा खाद्याने नव्हे, तर कृपेने अंत:करण स्थिर केलेले असणे चांगले. (इब्री १३:९)
जेव्हा येशू फिलिप्पाच्या कैसरीयाक्षेत्रात आला, त्याने त्याच्या शिष्यांना हे म्हणत विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? शिमोन पेत्राने उत्तर दिले आणि म्हटले, "आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा." येशूने उत्तर दिले, आणि त्यास म्हटले, शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. (मत्तय १६:१६-१७)
कोणी मानवी समज मधून काही बोलू शकतो आणि कोणी प्रकटीकरणा द्वारे काही बोलू शकतो.
Chapters