हेरोद राजाच्या काळांत यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले. (मत्तय २:१)
हेरोद राजाच्या काळांत:
हेरोदाचा राज्य काळ हा आपल्याला कालक्रमानुसार एक चिन्हित मुद्दा सुद्धा देतो. "येशूचा जन्म हेरोद राजाच्या म्रुत्युअगोदर झाला होता, जे शक्यतो ख्रिस्तपूर्व ४ मध्ये गणले गेले आहे; येशूच्या जन्माची प्रत्यक्ष तारीख ठाऊक नाही.
पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले.
ह्या प्रवाश्यांना ज्ञानी लोक म्हटले आहे, जे प्राचीन ग्रीक भाषेत मागी असे आहे. ह्याज्ञानी लोकांविषयी चुकीची समजूत आणि दंथकथा. ते राजा नव्हते तर ज्ञानी लोक होते, याचा अर्थ ते खगोलशास्त्रज्ञ होते. ते केवळ तीनच नव्हते, परंतु शक्यतो मोठा जमाव होता. असे दिसते की जन्म झाल्याच्या रात्री ते आले नव्हते, परंतु शक्यतो त्यानंतर अनेक महिन्यानंतर. ह्यासाठी येथे अनेक कारणे सुचविली जातात:
१.वचन११ मध्ये आपल्याला सांगितले आहे की मागी त्या घरी आले जेथे योसेफ व मरीया राहत होते.
२. मत्तय २:९, ११ मध्ये आपल्याला सांगितले आहे की येशू हा बालक होता, लहान बाळ नाही (जसे लूक मधील मेंढपाळ म्हणतात).
३.हेरोद ने मागी लोकांना विचारले की कोणतीतीप्रथम वेळ होती जेव्हा त्यांनी तारा पाहिला होता. त्यावेळेवर आधारित त्याने नंतर बेथलेहेम मधील २ वर्षा खालील सर्व लेकराची कत्तल केली. म्हणून येशू चे वय त्यावेळी २ वर्षाच्या आतअसेन.
चर्च रूढीपरंपरा त्यांची नावे सुद्धा आपल्याला सांगतात-शक्यतोमेलीचीओर, बालाथोर व कास्पर. तुम्ही त्यांच्या सहसा कवट्या ह्या कोलोग्न, जर्मनीयेथील मोठया चर्च मध्ये पाहू शकता.
यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो. (मत्तय २:२)
आम्ही त्याचा तारा पाहिला आहे
जेव्हाप्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा स्वर्गात चिन्ह होते. म्हणून, त्याच्या येण्याच्यावेळी सुद्धा-येथे स्वर्गात चिन्ह असतील.
नंतर ते त्या घरांत गेले. तेव्हा तो बाळक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून 'सोने, ऊद' व गंधरस' ही दाने त्याला अर्पिली. (मत्तय २:११)
काळजीपूर्वक लक्षात घ्या, त्यांनी पाया पडून येशूला नमन केले आणि मरीये ला नाही.
त्यांनी बक्षिसे त्यास अर्पिली, मरीये ला नाही
मरीयेची भक्ती केली अशीयेथे काही नोंद नाही
स्वप्ने: आपल्या स्वप्नाला आपण ऐकावे किंवा त्याकडे लक्ष दिले पाहिजे?
परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करितो; माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. (स्तोत्रसंहिता १६:७)
१. योसेफ ला स्वप्नात दूता द्वारे सुचना दिली की मरीयेला त्याची पत्नी म्हणून स्वीकार. (मत्तय १:२०)
२. मागी लोकांना स्वप्नात चेतावणी दिली की त्यांनी पुन्हा हेरोद कडे जाऊ नये. (मत्तय २:१२)
३. योसेफ ला अनेक वेळेला स्वप्नात चेतावणी आणि मार्गदर्शन दिले गेले.(मत्तय २:१३, २:१९, २:२२)
हेरोद राजाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो गडबडला. (मत्तय २:३)
हेरोद हा असुरक्षित पुढारी होता आणि नेहमीच घाबरत असे.
जर मागी लोक बेथलेहम च्या मेंढपाळ सोबत असते, तरयरुशलेम येथील धार्मिक पुढाऱ्यांपेक्षा त्यांना योग्य माहिती मिळाली असती.
मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नांत सुचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशांस निघून गेले. (मत्तय २:१२)
खरी उपासना ही नेहमीच दैवी प्रकटीकरण द्वारे सुरु होते.
पूर्वे मधील तारा हे प्रगट चिन्ह होते त्याने मागी लोकांना एक लांबचा प्रवास करण्यास लावले की प्रभु येशूची उपासना करावी. (मत्तय २:२)
उपासना ही देवाबरोबर एक बौद्धिक करार किंवा सरळ एक बौद्धिक विचार असे नाही.
खरी उपासना ही जिवंत परमेश्वराला एक आवेशी प्रत्युत्तर आहे ज्याने त्याचे अंत:करण तुम्हांला प्रगट केले आहे.
खरी उपासना ही तुम्हाला नेहमीच किंमत मोजावयास लावेल.
जर येथे थोडा पाऊस पडतो, तर काही लोक चर्च ला येत नाहीत-सर्वात उत्तम भाग हा आहे की चर्च हे केवळ रस्त्याच्या पलीकडे आहे.
मागी लोकांबरोबर असे प्रकरण नव्हते. मागी लोक पर्शिया येथील होते, जे आजचे आधुनिक ईराण आहे. त्यांच्या मार्गावर, त्यांनीवाळूच्याभयंकर वादळास तोंड दिले असेन, लुटारूज्यांनी त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला असेन, म्हणजे ते जी संपत्ति घेऊन जात आहेत ते घ्यावे. त्यासोबतच, याचा उल्लेख न केलेला बरा कीअशा लांबच्या आणि कष्टमय प्रवासाचा त्रास तर होताच.
जर हे सर्व पुरेसे नव्हते, आता त्यांना एक वेगळाच मार्ग शोधावयाचा होता की घरी परत यावे. खरी उपासना ही नेहमीच तुम्हाला किंमत मोजावयास लावेल. त्याने मागी लोकांना किंमत मोजावयास लावली, ती आपल्याला सुद्धा मोजावयास लावेल.
खरी उपासना ही स्वर्गाच्या बाबतीत आपल्याला वैचारिक असावयास लावते.
खऱ्या उपासनेच्या बाबतीत उत्तम भाग हा की ते आपल्याला स्वर्गाच्या बाबतीत विचारिक असावयास लावते. तुम्हाला देवाची वाणी ऐकावयास पाहिजे काय? तर मग तुम्ही त्याची उपासना केली पाहिजे.
मागी लोक हे खऱ्या अर्थाने विश्वास ठेवणारे नव्हते परंतु त्यांच्या उपासनेने त्यांना देवाच्या वाणी साठी संवेदनशील केले आणि त्यांना दैवी दृष्टया इशारा मिळाला.
Chapters