तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. (मत्तय ४:१)
हे केवळ प्रभु येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्या नंतर घडले. मला विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला यार्देनच्या अनुभवा नंतर रानातील अनुभवासाठी नेले जाईल.
येशूला आत्म्याद्वारे अरण्यात नेण्यात आले. याचा अर्थ हा, ही परीक्षा देवाकडून होती. पित्याला पाहिजे होते की येशू तेथे असावा-एका कठीण ठिकाणी. ती काही चूक किंवा घटनेचे चुकीचे वळण नव्हते. तेच आपल्या जीवनात सुद्धा खरे आहे.
हा देवाबरोबरचा वेळच केवळ येशूच्या सेवाकार्यासाठी पाया स्थित करेल.
परीक्षेच्या वेळी, जेव्हा असे दिसते की प्रत्येकाने तुम्हाला सोडले आहे आणि देवाबरोबर तुम्ही एकटेच आहात हे नेहमीच त्यासाठी पाया होते जेथे काहीतरी मोठे निर्माण होणार आहे.
मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला, त्यानंतर त्याला भूक लागली. (मत्तय ४:२)
प्रभु येशूने पाणी प्याले काय?
पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते की, "त्याला भूक लागली." याचा अर्थ प्रभु येशूने त्या चाळीस दिवसा दरम्यान काहीही खाल्ले नाही. 'पूर्ण उपास" चे हे एक उदाहरण आहे.
वैद्यकीय ज्ञानी हे स्पष्ट सांगतात की विशेष पुरुष किंवा स्त्री पाण्या शिवाय दहा दिवसापेक्षा अधिक दिवस जगू शकत नाही; तथापि, काही व्यक्ति पाण्या विना २१ दिवस जगले आहेत.
"तूं देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंडयाच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर." (मत्तय ४:३)
"तूं देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक." (मत्तय ४:६)
सैतानाच्या प्रत्येक परीक्षेला, प्रभु येशूने "असे लिहिले आहे" यासह प्रत्युत्तर दिले. हे दाखविते प्रभु येशूचे लिहिलेल्या वचनावर प्रभुत्व होते. आपल्यासाठी त्याचे अनुकरण करण्यास हे सिद्ध उदाहरण सुद्धा आहे. देवाचे वचन बोलण्याद्वारे सैतानाच्या प्रत्येक खोटेपणाचा आपण विरोध केला पाहिजे.
तुमच्या आत्म्याचे पोषण करा
तुम्ही कदाचित "तुम्ही जे आहात ते तुम्ही खाता" हा वाक्प्रचार अगोदर ऐकला असेन, आणि हे सामान्यपणे एक वाक्य आहे जे अन्नाच्या संदर्भात केले आहे. तथापि, ते त्या गोष्टींना सुद्धा लागू केले जाऊ शकते जे आपण दररोज आपल्या आत्म्याला "भरवितो".
कलस्सै ३:१६ मध्ये बायबल म्हणते, "ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो". प्रेषित पौल आपल्याला सांगत आहे की देवाचे वचन आपल्या जीवनात भरपूर, सुदृढ व जीवन-देणाऱ्या मार्गाने भरून निवास करो.
मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला, त्यानंतर त्याला भूक लागली. मग परीक्षक त्याच्याजवळ आला. (मत्तय ४:२-३)
सर्वात मोठी परीक्षा ही तुम्हाला मिळालेल्या मोठया वाटचाली नंतर लगेचच येते. परीक्षक लगेचच आला जेव्हा प्रभु येशूने चाळीस दिवस उपास पूर्ण केले होता.
प्रभु येशूने तोंड दिलेली विभिन्न संकटे
१. भूक
२. आरोग्य
३. ओळख
आपण सुद्धा जीवनात अनेक कठीण परिस्थितींना तोंड देतो. एकच मार्ग ज्याद्वारे आपण विजयी होऊ शकतो तो प्रत्येक संकटाच्या मध्ये वचन बोलण्याद्वारेच आहे. कारण प्रभु येशूला संकटाच्या मध्य वचन बोलणे हे केवळ 'मोठे वक्तृत्व' नव्हते, तर ती त्याची जीवनशैली होती.
मग त्याने त्यांना म्हटले, "माझ्या मागे या, व मी तुम्हाला माणसे धरणारे करीन." (मत्तय ४:१९)
प्रभु येशूने म्हटले, माझ्या मागे या, आणि मी तुम्हाला बनवीन...
बनविण्याची प्रक्रिया ही मागे चालण्यात आहे.
जर व्यक्ति हा खरेच येशूच्या मागे चालतो, तेव्हा मग तो किंवा ती खात्रीने पुरुष व स्त्रियांना धरणारे होतील.
येशूच्या मागे प्रामाणिकपणे चालणे हे किंमत मोजल्याशिवाय नाही.
"लागलेच ते जाळी सोडून देऊन त्यला अनुसरले." (मत्तय ४:२०)
"मग लागलेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले." (मत्तय ४:२२)
१. ज्या संपत्तीला आपण अधिक प्रिय मानतो ते आपल्याला सोडावे लागू शकते.
२. ज्या लोकांना आपण अधिक प्रिय मानतो त्यांना आपल्याला सोडावे लागू शकते.
Chapters