म्हणून स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे; तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावावयास मोठया पहाटेस बाहेर गेला. (मत्तय २०:१)
पिकाची कापणी ही कापणी करण्यासाठी तयार होती, आणि म्हणून भूमीच्या मालकास कामकऱ्यांची गरज होती. लक्षात घ्या, तो भल्या पहाटेस जातो. जर तुम्हाला पीक उत्पन्न करावयाचे आहे, तर येथे नेह्माची किंमत हो मोजावी लागेल.
भूमी मालक ५ वेळा बाहेर गेला की कामकरी शोधावे:
त्याच्या द्राक्षमळ्यासाठी कामकरी कामावर
ठेवण्यासाठी भल्या पहाटे तो तिसऱ्या तासाला (सकाळी ९ वाजता) गेला
तो पुन्हा सहाव्या तासाला (१२ वाजता)
व नवव्या तासाला (दुपारी ३ वाजता) गेला
आणि अकराव्या तासाला (संध्याकाळी ५ वाजता)
मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास लाविले होते ते आल्यावर त्यांना रुपया रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले. तरी त्यांनाही रुपया रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरूकुर करीत म्हटले, ह्या शेवटल्यांनी एकच तास काम केले, आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हांस व त्यांस आपण सारखे लेखिले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझा अन्याय करीत नाही; तूं माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? (मत्तय २०:८-१३)
भूमीच्या मालकाने त्याच्या कामकऱ्यांस कसे वेतन दिले ज्यांना त्याने त्याच्या द्राक्षमळ्यात कामावर लावले होते त्यास आपण कशी प्रतिक्रिया देतो ते आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. आपण अशी प्रतिक्रिया देऊ शकलो असतो, "ओह! काय उदार मालक आहे!" किंवा आपण म्हणू शकलो असतो, "काय ते खूपच चुकीचे नाही काय?"
ते दुसऱ्याच्या लाभास त्यांचे नुकसान असे भाषांतर करीत होते. याने त्यांना उघड केले की त्यांच्या हृदयात काय होते-द्वेष.
ह्या दाखल्याचा संदर्भ आपल्याला शिकवितो की, हा कृपे वर एक धडा आहे. आपल्या कार्यक्षमतेचा विचार न करता, आपल्या सर्वाना देवाच्या कृपेची गरज आहे कारण आपण सर्व जण देवाच्या प्रमाणापेक्षा कमी पडत आहोत. (रोम ३:२३)
प्रभु येशू यावर जोर देत होता की देवाच्या राज्याचे लाभ हे सर्वांसाठी सारखेच आहे जे त्याच्या राजाच्या अधीन आहेत; मग याची पर्वा नाही की त्यांनी काय केलेले आहे.
येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हांस समजत नाही. (मत्तय २०:२२)
यावरून, हे स्पष्ट आहे की, कधी कधी आपल्याला ठाऊक नसते की आपण काय मागत आहोत. आपले मागणे हे देवाच्या वचनानुसार असले पाहिजे.
जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हांला पिता येईल काय? आणि त्या बाप्तिस्म्याने बाप्तिस्मा घ्यावा ज्याने माझा बाप्तिस्मा झाला आहे?" ते त्याला म्हणाले, आम्ही समर्थ आहोत. (मत्तय २०:२२)
त्याप्रमाणे, याकोब व योहान त्याच्या दु:खाचे वाटेकरी मृत्युपर्यंत सुद्धा झाले परंतु उद्धारित अर्थाने नाही. याकोब हा पहिला प्रेषित होता जो हुतात्मा झाला (प्रेषित १२:२), आणि योहानाने अनेक वर्षे छळ व तुरुंगवास भोगला. (प्रकटीकरण १:९)
तसे तुमच्यामध्ये नाही झाले पाहिजे; तर जो कोणी तुम्हांमध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाला पाहिजे. (मत्तय २०:२६ ऐम्पलीफाईड)
मोठे होण्यासाठी मार्ग हा विश्वासुपणे सेवा करणे होय. मी अनेकदा पुरुष व स्त्रियांच्या कथा ज्या सांगितल्या गेल्या आहेत त्या ऐकल्या आहेत, ज्यांनी कंपनी मध्ये एक सामान्य स्टाफ अशी सुरुवात केली होती परंतु शेवटी व्यवस्थापक पदी आरूढ झाले कारण हा त्यांचा विश्वासूपणा व समर्पण होते. तुमच्या मार्गावर अत्युच्च ठिकाणी पोहोचण्यासाठी सेवा करण्यास सुरुवात करा.
मग ते यरीहोहून जात असतांना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला. तेव्हा पाहा, वाटेवर बसलेले दोन आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, हे प्रभो, "दावीदाचे पुत्र, आम्हांवर दया करा." (मत्तय २०:२९-३०)
दोन आंधळे पुरुष ज्यांनी ऐकले की येशू तेथून जात आहे. जीवनभराचा आंधळेपणा असताना सुद्धा, त्यांनी कदाचित विचार केला असेन, आपल्याला असेच राहावयाचे नाही. येथे उत्तम भविष्यासाठी आशा आहे. म्हणून ते ओरडू लागले, हे प्रभो, "दावीदाचे पुत्र, आम्हांवर दया करा."
त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांस धमकाविले; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभो, दावीदाचे पुत्र, आम्हांवर दया करा. (मत्तय २०:३१)
ह्या दोन पुरुषांनी परमेश्वराकडे सर्वात प्रभावी याचना केली- त्याच्या दयेची याचना.
येशूने उभे राहून, त्यांना बोलावून म्हटले, मी तुम्हांसाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे? (मत्तय २०:३२)
हे एक चांगले स्मरण देणे आहे की तुम्ही तुमच्या प्रार्थने व याचने मध्ये विशेष असे राहिले पाहिजे. केवळ ही प्रार्थना करू नका, "हे प्रभो, मला आशीर्वाद दे!" विशेष असे व्हा. येशूला नेमके पाहिजे होते की हे पुरुष देवावर कशासाठी विश्वास ठेवीत होते.
Chapters