तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारीसारखे होईल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. (मत्तय २५:१)
१. ते सर्व कुमारी होत्या-दहा कुमारी
लक्षात घ्या, प्रभु येशू पाच मेंढरे व पाच बकरी बरोबर तुलना करीत नाही! तो गव्हाच्या पाच पेंढ्या व निदनाच्या पाच पेंढ्या बरोबर तुलना करीत नाही. नाही. येशू पाच कुमारींची पाच कुमारी बरोबर तुलना करीत आहे- दहा क्षमा केले गेलेले-रक्ताने धुतलेले ख्रिस्ती लोक. येशू त्यांच्या बद्दल बोलत आहे जे त्यांस जाणतात, ते ज्यांस ठाऊक आहे तो वर आहे आणि हे की तो त्याच्या वधू साठी परत येत आहे.
२. त्यांचा सारखाच उद्देश होता: की वराला भेटावे
सर्व कुमारींकडे दिवे होते जे पेटलेले होते. त्या सर्वांनी येशूला त्यांचा तारणारा म्हणून स्वीकारले होते; त्या सर्वांचा "नवीन-जन्म" झाला होता. येशू प्रकाश आहे-जगाचा प्रकाश! ते त्यांचे दिवे घेऊन वराला भेटण्यास गेले-देवाचे वचन.
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा,
व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. (स्तोत्र ११९:१०५)
हे मला सांगते की जर तुम्हाला देवाचा सामना करावयाचा (भेट करावयाची) आहे, तर तुम्हाला तुमच्या आतमध्ये वचन घेऊन चालावयाचे आहे. तुम्हाला वचन वाचण्याची व त्यावर मनन करण्याची गरज आहे. येथे अनेक ख्रिस्ती लोक आहेत ज्यानी बायबल उत्पत्ति ते प्रकटीकरण असे अजून वाचलेले नाही.
त्यात पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपणाबरोबर तेल घेतले नाही; शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांडयात तेलही घेतले. (मत्तय २५:२-४)
शहाणे व मूर्खता मधील फरक हे तेल होते. मुर्खांजवळ त्यांच्या दिव्यात तेल होते परंतु शहाण्यांनी तेलाचे भांडे घेतले होते- जे पवित्र आत्म्याच्या भरण्याला दर्शविते.
मुर्खांजवळ कोणतेही तेल नव्हते जे स्वतःला शरण जाण्याकडून येते. त्यांनी धार्मिकतेसाठी भुकेले व तान्हेले होण्याद्वारे पवित्र आत्म्याच्या तेलाने स्वतःला भरलेले नव्हते. त्यांनी आपल्या प्रभूच्या तारणाच्या तेलास सोडले होते-त्याचे सार्वकालिक जीवनाचे बक्षीस- "कोमट" निखाऱ्या सारखे कमी होणे. त्यांनी त्यांच्या "नवीन-जन्माच्या" अनुभवास सहज असे घेतले होते.
पण तूं तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. (प्रकटीकरण ३:१६)
तुम्हाला उठले पाहिजे! तुम्ही ह्या जीवनाचा आरामदायकपणा, सुखविलास आणि कष्ट सुद्धा याद्वारे खऱ्या जीवनास, आध्यात्मिक जीवनास मृत, नाही करू दिले पाहिजे- जे जीवन आपल्याला "आत्म्या द्वारे-जन्माच्या" वेळी दिले गेले. येशूच्या आश्वासनावर खंबीर राहा: "जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील." (मत्तय ५:६)
मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हांक आली की, पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या. (मत्तय २५:५-६)
लक्षात घ्या, मध्यरात्री हाक आली- यास फारच भविष्यात्मक महत्त्व आहे. अनेक यहूदी गुरु विश्वास ठेवतात की मशीहा मध्यरात्री प्रगट होईल. दहा कुमारींचा दाखला सुद्धा दर्शवितो की हाक ही मध्यरात्री आली.
हा केवळ आनंदी योगायोग नाही-ते भविष्यात्मक आहे. अर्थातच, येथे काही आळशी लोक असतील, जे सिद्धांत बनवितील जे त्यांच्या आळशी जीवनशैलीशी सुसंगत होतील. रात्री प्रार्थना करणे हे तुम्हाला लोकांतरण साठी तयार करेल.
मध्यरात्रीची हाक कोण देतो?
जर पवित्रशास्त्र सांगते, "ते सर्व निद्रेत व मरण पावलेले आहेत" तर मग कोणी हाक दिली-मी विश्वास ठेवतो की ती हाक देवदुताकडून होती. (१ थेस्सलनी ४:१६)
मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या. (मत्तय २५:७)
सर्व निवडलेले हाक ऐकतात. वचन सात मध्ये, जेव्हा हाक दिली गेली की वर येत आहे, "सर्व कुमारी उठल्या व त्यांचे दिवे पेटवू लागल्या." लक्षात घ्या, ते सर्व जण उठले; त्या सर्वांनी त्या परिस्थितीची गंभीरता खरेच ओळखली आणि येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी तयारी सुरु केली. हे प्रोत्साहनपर आहे कारण हे दाखविते की येशू ख्रिस्त याची खात्री करेल की ते जे सर्व परमेश्वर पिता द्वारे तारणासाठी बोलाविले गेलेले आहेत त्या सर्वाना उठण्यासाठी हाक दिली जाईल.
त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आंत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभुजी, आम्हांसाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांस खचित सांगतो, मी तुम्हांस ओळखीत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांस तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. (मत्तय २५:१०-१३)
तुम्हाल ठाऊक आहे काय चर्च चे ५०% लोक हे लोकांतरण मध्ये मागे सोडले जातील? तुम्ही हे विचाराल, "तुम्हाला हे कसे ठाऊक आहे?"
येथे किती कुमारी होत्या? १०
किती जणांना घेण्यात आले? ५
किती जणांना मागे ठेवण्यात आले? ५-म्हणजे ते ५०% बरोबर.
असंख्य नामधारी ख्रिस्ती लोकांना मागे सोडण्यात येईल. नामधारी ख्रिस्ती- ते चर्च ला येतात की वचन ऐकावे, ते असे जगतात जसे त्यांना आवडते-देवाच्या पुत्राच्या रक्ताला तुडवितात.
जेव्हा नोहा ने तारवात प्रवेश केला व दार बंद करण्यात आले, नोहाचे कुटुंब जलप्रलय पासून सुरक्षित होते आणि ते जे बाहेर होते ते तारवात प्रवेश करण्यास असमर्थ होते. जेव्हा स्वर्गाचे द्वार उघडे होते, नवीन-जन्म झालेले अंतराळात वर घेतले जातील की प्रभूला भेटावे (१ थेस्सलनी ४:१६, १७). ते जे तयार नाहीत ते मागेच राहतील.
कोणीही पूर्वीच्या प्राप्ती वर भरंवसा नाही ठेवला पाहिजे
१. लक्षात घ्या, मूर्ख कुमारींजवळ "काही" तेल अवश्य होते-मत्तय २५:८
२. म्हणून मग त्यांनी काही तयारी केली, परंतु त्यांनी जे भूतकाळात केले होते त्यावर मुर्खपणाने भरवसा ठेवला.
३. ना ही आपण आपल्या "प्रतिष्ठेवर" अवलंबून राहिले पाहिजे, परंतु पौला सारखे आचरण असले पाहिजे-फिलिप्पै ३:१२-१५
तुम्ही मूर्खपणाने जे तुम्ही मागे भूतकाळात केले आहे त्यावर अवलंबून आहात काय?
तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आंत जाण्याचा नेटाने यत्न करा; कारण मी तुम्हांस सांगतो, पुष्कळ लोक आंत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभुजी आम्हांसाठी दार उघडा; तेव्हा तो तुम्हांस उत्तर देईल, तुम्ही कोठले आहा, हे मला माहीत नाही. (लूक १३:२४, २५)
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेऊन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. (योहान १४:२-३)
वधू ला सर्व वेळेला तयार राहावयाचे होते. तिचे वस्त्र हे स्वच्छ व दाग किंवा सुरुकुत्या वीणा असावे. तिला तो दिवस किंवा घटका ठाऊक नव्हती की तीचा तरुण पुरुष हा परत येणार आहे. वराच्या पित्याने हे निश्चित केले की जेव्हा सर्व काही त्याच्या पुत्रासाठी तयार असेल की गुप्तपणे तिच्या वधूला प्राप्त करावे आणि तिला त्या खोलीत आणावे जे त्याच्या पुत्राने बांधले आहे. ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना त्याचे जाणे व त्याचे त्यांच्यासाठी पुन्हा येण्यासंबंधी केलेल्या वक्तव्या मध्ये हीच कल्पना पाहू शकता:
- ख्रिस्त त्यांना सोडून जात होता की त्यांच्यासाठी जागा तयार करावी (योहान १४:१-२).
- ख्रिस्ताला तो दिवस किंवा येण्याच्या घटके विषयी ठाऊक नाही (मत्तय २४:३६).
- केवळ पित्याला तो दिवस व ख्रिस्ताच्या येण्याच्या घटके विषयी ठाऊक आहे (मत्तय २४:३६).
- ख्रिस्त कोणत्या दिवशी किंवा घटकेला येणार याची त्यांना कल्पना नाही (मत्तय २४:४४)
- त्यांनी जागृत व प्रार्थना करीत राहावे, झोप घेत असलेले होऊ नये (लूक २१:३६)
- त्यांनी त्यांची वस्त्रे नेहमीच शुभ्र ठेवावी (प्रकटीकरण १६:१५)
- त्यांनी आपले दिवे नीट व पेटलेले असे ठेवावे (मत्तय २५:७)
नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहा; जेथे तुम्ही पेरिले नाही तेथे कापणी करिता व जेथे पसरून ठेविले नाही तेथून गोळा करिता. (मात्या २५:२४)
सेवकाने अक्षरशः आपल्या स्वामी ला दोष दिला की तो कठोर माणूस आहे. दुसऱ्या शब्दात, तो हे म्हणत होता की त्याचा स्वामी हा वैचारिक नाही, जे सत्य नव्हते.
आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दांतखाणे चालेल. (मत्तय २५:३०)
हे आपल्याला स्पष्टपणे सांगते की अत्युच्च परमेश्वराचे सेवक, आपल्याला नफा हा मिळवावा लागेल. आपल्याला फलदायक असावे लागेल.
सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे त्यात जा. (मत्तय २५:४१)
नरक हा मनुष्यासाठी कधीही तयार केलेला नाही परंतु सैतान व त्याच्या दुतांसाठी.
Chapters