योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? (मत्तय ११:२-३)
योहानाने बंदिशाळेत जेव्हा ऐकले....
गालील च्या हेरोद अन्तीपास ने रोम नगरातील त्याच्या बंधूला भेट दिली. त्या भेटी दरम्यान, त्याने त्याच्या भावाच्या पत्नीला मोहात पाडले. तो पुन्हा त्याच्या घरी आला, त्याने त्याच्या पत्नीला काढून टाकले, आणि त्याच्या भावाच्या पत्नीबरोबर विवाह केला ज्याने तिला मोहात पाडून तिच्या पतीकडून दूर केले होते. योहानाने सार्वजनिकपणे व कडक भाषेत हेरोद ला झिडकारले होते.
परंतु मांडलिक हेरोद ला त्याचा भाऊ फिलीप्प ची पत्नी हेरोदिया संबंधी झिडकारल्यामुळे, आणि सर्व दुष्टपणा जो हेरोदाने केला होता तो सुद्धा त्यात होता, त्यामुळे हेरोदाने योहानास तुरुंगात टाकले. (लूक ३: १९-२०)
व्यक्ति जो राजकीय सत्ते मध्ये आहे त्यास झिडकारणे हे कधीही सुरक्षित नव्हते, आणि हेरोदाने त्याचा बदला घेतला; योहानास मृत समुद्राजवळ डोंगरात माकारीयास च्या किल्ल्याच्या अंधारकोठडीत टाकले होते.
यहूदी इतिहासकार योसेफस नुसार, हे माकारीयासच्या किल्ल्याचे ठिकाण होते जेथे योहानाचा शिरच्छेद करण्यात आला. (बेलम VII.6.1-2).
त्याने त्याच्या दोन शिष्यांना पाठविले, आणि त्याला विचारले, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? (मत्तय ११:३)
योहान तुरुंगात नाही. जमाव जो योहानाच्या मागे उत्साहाने चालत होता तो निघून गेला होता. "अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी" शांत करण्यात आली होती.
योहान त्याच्या दोन शिष्यांना पाठवीत आहे हे तपासण्यासाठी की येशू हा खरेच मशीहा आहे काय. हे विचित्र आहे कारण दोनदा योहानाने तोच येणारा मशीहा आहे असे मान्य केले होते.
दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. (योहान १:२९-३०)
त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा असता, येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पाहा, देवाचा कोकरा! (योहान १:३५-३६)
योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहींच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठविलेला आहे असे मी म्हणालो होतो, ह्या विषयी तुम्हीच माझे साक्षी आहा. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वरचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धि व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे; जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो; जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे; जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो; आणि त्याची साक्ष कोणी मानीत नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टींवर शिक्कामोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने बोलतो; कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीति करितो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. (योहान ३:२७-३६)
योहानाने मशीहा विषयी त्याच्या शिष्यांना हे सुद्धा सांगितले, "त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील. (मत्तय ३:१२)
तसेच त्यावेळी इस्राएल मध्ये, मशीहा येण्याविषयी एक विश्वास प्रचलित होता की तो त्यांना रोमन लोकांच्या अत्याचारित राज्यातून मुक्त करीन व त्याचे राज्य स्थापन करीन. येशू ज्याप्रकारे त्याच्या सेवाकार्यात कार्य करीत होता ते निश्चितच योहानाची आशा पूर्ण करणारे नव्हते. म्हणूनच, तोच येणारा मशीहा आहे हे अगोदर मान्य केलेले असताना सुद्धा ते योहानाला शंका निर्माण करीत होते की वास्तवात येशू हा खरेच येणारा मशीहा आहे. स्पष्ट आहे, तो दु:खी झाला होता.
प्रतिकात्मकरित्या म्हटले तर, बाप्तिस्मा देणारा सुद्धा आध्यात्मिक बंधनात होता कारण त्याने त्याच्या अंत:करणात पापा ला जपले होते. येशूने योहानाला संदेश पाठविला, "जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय." (मत्तय ११:६)
येशूने त्यांस उत्तर दिले, "जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा." (मत्तय ११:४)
जा व योहानाला सांगा. का?
विश्वास ऐकण्याने येतो. (रोम १०:१७)
जेव्हा विश्वास येईल, तेव्हा तुम्ही तुमच्या तुरुंगातून बाहेर याल.
"परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते." (मत्तय ११:१९)
दुसऱ्या शब्दात, ज्ञान हे ते जे आचरणात आणतात त्यांच्या योग्य कृती द्वारे सिद्ध केले जाते.
हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बैथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली तो सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणताट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. (मत्तय ११:२१)
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या कार्या द्वारे, दुष्ट नगर जसे सदोम सुद्धा वाचविले जाईल. (मत्तय ११:२३)
ह्या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारांत बसून आपल्या सोबत्यांना हांक मारून म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पांवा वाजविला, तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत. त्यांच्यासारखी ही पिढी आहे. कारण योहान खातपीत आला नाही, तर त्याला भूत लागले असे म्हणतात. मनुष्याचा पुत्र खातपीत आला; तर त्याच्याविषयी म्हणतात, पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र! परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते. (मत्तय ११:१६-१९)
कधीकधी याची गरज सुद्धा नाही की तुमच्यावर कशाची टीका केली गेली आहे. तुम्हीही काहीही केले तरी काहीही बदलणार नाही. समस्या ही तुम्ही जे करीत आहात ते नाही. समस्या ही टीका करणाऱ्याकडे आहे. सैतानाचा मुख्य हेतू हा की तुम्हाला चांगले काम करण्यापासून थांबवावे.
त्यावेळी येशू असे बोलू लागला: हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस पंगत केल्या. (मत्तय ११:२५)
लक्षात घ्या पित्याने गुप्त व रहस्यमय गोष्टी बालकांस प्रगट केल्या आहेत. बालक हे सौम्य हृदयाचे असतात, वयस्कर सारखे नाही. याचा अर्थ, प्रकटीकरण प्राप्त करण्यासाठी, आपली आत्मे ही सौम्य अंत:करणाची असली पाहिजेत.
अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल. कारण माझे जूं सोयीचे व माझे ओझे हलके आहे. (मत्तय ११:२८-३०)
तणाव व थकवा –आपण सर्वांनी वेगवेगळ्या मार्गांनी व अनेक कारणांमुळे अनुभविला आहे.
उपाय जो येशू देत आहे ते फारच सोपे व सरळ आहे- माझ्याकडे या.
लक्षात घ्या, ते "इत्यादी कडे जा" तर नाही, “माझ्याकडे या”
येशू कडे येण्याचा काय अर्थ आहे?
"तुमच्या सर्व चिंता मजवर टाका आणि मी तुमची काळजी करतो" (१ पेत्र ५:७). "तूं आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको" (नीतिसूत्रे ३:५). तो म्हणतो, "तुम्ही तुमच्या जीवा साठी विसावा प्राप्त कराल."
माझे जूं आपणावर घ्या व माझ्यापासून शिका
ओझे हे जनावराच्या पाठीवर लादले जाते की काही काम करावे. येशू आपल्याला काम किंवा विसावा देत आहे काय?
आपण त्याच्यासाठी कोणते काम करावे की ते आपल्याला विसावा देईल.?
योहान ६:२९ मध्ये येशूने ह्या प्रश्नाला उत्तर दिले आहे: "देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा." आणि त्याने योहान १५:५ मध्ये उत्तर दिले: "माझ्यामध्ये राहा". (जसे फाटा वेलात). विश्वास ठेवा व मजमध्ये राहा: खरेच केवळ तेवढेच परमेश्वर आपल्याकडून मागतो. विश्वास (विश्वास ठेवणे व त्याजमध्ये राहणे) हे देवाच्या आशामय आश्वासणावर अवलंबून राहणे. हेच ओझे येशू आपल्याला घेण्यास सांगत आहे.
Chapters