तुझ्या भावने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखीव; त्याने तुझे ऐकले तर तूं आपला भाऊ मिळविलास असे होईल; परंतु त्याने जर न ऐकले तर तूं आणखी एका दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, 'दोघा किंवा तिचा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा; आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळीव आणि जर त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो. (मत्तय १८:१५-१७)
हे वचन फारच कमी आचरणात आणले जाते. आत्ताच्या दिवसांत तर लोक लगेचच सामाजिक माध्यमाचा उपयोग करतात की सार्वजनिकपणे त्यांचे कार्य उघड करावे.
काही दिवसांपूर्वी मी एका मानसशास्त्रज्ञाचा लेख वाचत होतो ज्याने म्हटले, की ख्रिस्ती अधिकतर एका रात्रीच्या गोठणाऱ्या थंडीच्या वेळी साळींदर प्रमाणे आहेत. थंडी त्यांना एकत्र आणते की स्वतःला गरम असे ठेवावे परंतु जेव्हा ते एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ते त्यांच्या त्या काट्यांनी एकमेकांना टोचू लागतात आणि मग ते त्यांना दूर जाण्यास लावते; अशा प्रकारे ते नेहमीच एकत्र येतात आणि एकमेकांपासून दूर जातात जसे काही एका हळुवार नाच प्रमाणे.
मी एक कथा वाचली जी सर्व काही स्पष्ट करते ती पुढील प्रमाणे आहे:
वरील संतांसह निवास करण्यास
आपल्या सर्वाना आवडेल,
ओह, ते गौरवी असेन.
परंतु येथे खाली
संतांसह निवास करणे,
आपल्याला ते फारच चांगले ठाऊक आहे,
ती दुसरी कथा आहे.
तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय? येशू त्याला म्हणाला, सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा. (मत्तय १८:२१-२२)
आपल्या सर्वाना क्षमा मिळावी असे वाटते-आपण तशी आशा करतो, आणि ते आपल्याला पाहिजे असते. परंतु क्षमा करण्यास आपल्याला संघर्ष होतो; आपण त्याचा नकार करतो व बऱ्याच वेळा तसे करण्यास नकार देतो.
एक लहान मुलगा त्याची प्रार्थना बोलत होता. जेव्हा तो त्याच्या कुटुंबाच्या यादीवरून जात होता, देवाला मागत होता की त्यांना आशीर्वाद दयावा, त्याने त्याच्या भावाचे नाव वगळले. त्याच्या आईने त्यास म्हटले, "तूं क्लिफ साठी प्रार्थना का केली नाही?" त्याने म्हटले मी देवाला मागणार नाही की क्लिप ला आशीर्वाद दे कारण त्याने मला मारले आहे." आणि त्याच्या आईने म्हटले, "तुला हे आठवत नाही काय, येशूने म्हटले आहे तुमच्या शत्रूंना क्षमा करा?" परंतु लहान मुलाने म्हटले, "तीच केवळ समस्या आहे. तो माझा शत्रू नाही; तो माझा भाऊ आहे!"
कदाचित आपल्यापैंकी अनेकांना त्याच समस्या आहेत, जसे प्रेषित पेत्राला होती. तो सुद्धा त्याच समस्येला तोंड देत होता, त्याच्या भावाला क्षमा करण्याची समस्या.
मला नेहमी आश्चर्य वाटले आहे, जेव्हा मी हा वृत्तांत वाचतो, जर पेत्र त्याचा भाऊ आंद्रिया बद्दल अक्षरशः विचार करीत होता. पेत्र व आंद्रिया हे भाऊ होते, व एकत्र मोठे झाले होते.
रब्बी लोकांनी शिकविले होते की तुम्ही कोणाला जास्तीत जास्त फक्त तीनदा क्षमा करावयाची आहे. चवथ्या वेळेला तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता.
आमोस १:३ वचनाच्या आधारावर त्यांनी चुकीने हे सुद्धा शिकविले की देवाने असे केले आहे, "तीन काय पण चार अपराध झाले,....." (आमोस १:३ वगैरे) परमेश्वर अमुक अमुक नगराचा न्याय करणार आहे. म्हणून त्यांनी शिकविले की परमेश्वराने स्वतः तीन वेळा पेक्षा अधिक वेळा क्षमा केली नाही.
म्हणून जेव्हा पेत्राने प्रभूला म्हटले की तो त्याच्या भावाला सात वेळा क्षमा करणार काय, तो प्रत्यक्ष विचार हा मोठया मनाचा होता. परंतु तो प्रत्यक्षात अमर्याद क्षमा सुचवितो.
मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती दिले. (मत्तय १८:३४)
प्रेषित पौलाने इफिस येथील ख्रिस्ती लोकांना चेतावणी दिली की, "त्यांनी सैतानाला स्थान देऊ नये." सैतान संधी शोधत आहे की आपल्या जीवनात स्थान मिळवावे. एक मार्ग की आपण सैतानाला वाव देतो, आणि सैतानी छळास आमंत्रित करतो, हे क्षमाहीन असण्याद्वारे आहे.
छळ काय आहे?
छळास अत्यंत पीडा असे व्याख्यीत केले जाऊ शकते, शरीर व मनाचा आक्रोश, यातना किंवा छळ. हे छळ बायबल मध्ये जे वर्णन केले आहे ते सैतानी आत्मे आहेत ज्यांना हा अधिकार दिला आहे की क्षमाहीन राहण्याच्या पापामुळे व्यक्तीला छळावे.
Chapters