परमेश्वरा बरोबर घनिष्ठ संबंध कसे ठेवावे
तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांनाअशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. (मत्तय १०:१)
जेव्हात्याने त्याच्या बारा शिष्यांना त्याच्याकडे बोलाविले..
१. परमेश्वराबरोबर घनिष्ठतेमुळे त्यातून सामर्थ्य प्रवाहित होते
२. प्रकटीकरण व समज ही घनिष्ठतेमुळे त्यातून प्रवाहित होते.
तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीति होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता; म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो "तो कोण आहे" हे आम्हांस सांग, असे शिमोन पेत्राने त्याला खुणावून म्हटले. (योहान १३:२३-२४)
३. तुम्ही तुमच्या भोवतालच्या लोकांसाठी एक महान आशीर्वाद असे व्हाल.
तुमच्यामुळे लोक हे परमेश्वरा द्वारे आशीर्वादित होतील.
४. घनिष्ठता ही धैर्यवान होण्याची किल्ली आहे.
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासांत होते हेही त्यांनी ओळखले. (प्रेषित ४:१३)
धैर्यवान असणे हे चमत्कार होण्याची किल्ली आहे. कोणी जो एक संतुलित जीवन व्यतीत करतो तो कोणी स्वस्थ व्हावे यासाठी पाऊल उचलण्याचे स्वप्न देखीलपाहणेआणि त्यासाठी प्रार्थना करणार नाही, परंतुकोणीतरी ज्यास धैर्य आहे जे पवित्र आत्मा देतो तो पाऊल उचलेल व स्वस्थ होण्यासाठी प्रार्थना करेल. किंवा पाण्यावर चालण्यासाठी धैर्य. जर तुम्ही पाऊल उचलणार नाही आणि धोका पत्करणार नाही तर तेथे यशासाठी काही संधी नाही. सुरक्षित राहण्याचे सोडा, पाऊल उचला आणि विश्वासाच्या स्तरात जगा.
५. खरी घनिष्ठता ही संबंधात्मक आहे.
तुम्ही एका व्यक्तीच्या अगदी बाजूला बसलेला असाल आणि तरीही तुम्हाला फार दूर आहोत असे वाटेन आणि आपण एखादया व्यक्तीच्या अगदी जवळ आहोत असे वाटू शकते जो हजारो मैल आपल्यापासून दूर असतो. चला मला ते तुमच्यासाठी स्पष्ट करू दया. तुम्ही येथे चर्च मध्ये बसला असाल परंतु देवापासून हजारो मैल दूर असू शकता.खरी घनिष्ठता ही संबंधात्मक आहे.
परमेश्वराबरोबर घनिष्ठता कशी विकसित करावी?
जेव्हा असे म्हटले आहे: "आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका." (इब्री३:१५)
अ) परमेश्वरासमोर आपण आपले हृदय सौम्य ठेवण्यास शिकले पाहिजे.
आपण ते कसे करावे?
जेव्हा आपण देवाचे वचन वाचतो, जेव्हा आपण देवाचे वचन ऐकतो, आपण त्या वचनानुसार चालले पाहिजे. आपण ते वचन आचरणात आणले पाहिजे,
हृदय कठीण करणे हे परमेश्वरा विरोधात बंड करणे असे वर्णन केले आहे आणि आपण त्याविरोधात आपल्या स्वतःचे रक्षण केले पाहिजे.
तर आता, हे परमेश्वरा, तूं आमचा पिता आहेस; आम्ही माती आहो, तूं आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृति आहो (यशया ६४:८). कठीण माती बरोबर परमेश्वर कार्य करू शकत नाही आणि करणार नाही.
ब) घनिष्ठतेच्या हृदयाजवळ भरंवसा आहे.
जितके अधिक आपण कोणावर भरंवसा ठेवतो, तितके अधिक आपण त्यास आपल्या जवळ येऊ देतो. संबंधामध्ये जितक्या अंशी भरवंस्याबरोबर तडजोड केली जाते हा तो अंश आहे तितके घनिष्ठता विरून जाते.
आपण आपला सर्व भरंवसा "त्याच्या बहुमुल्य व महान आश्वासनांवर" ठेवतो जे ख्रिस्ता मध्ये त्याचे उत्तर होयअसे देते (२ पेत्र १:४; २ करिंथ १:२०), नीतिसूत्रे ३:५.
त्या बारा प्रेषितांची नांवे अशी आहेत: पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन (मत्तय १०:२)
एके दिवशी शिष्यांना पाहिजे होते की त्यांच्यामध्ये पहिला कोण आहे. पेंटेकॉस्ट नंतर, पवित्र आत्म्याने त्यांना दाखविले कोण कोठे आहे
परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. (मत्तय १०: ५)
हे मनोरंजक आहे की येशूने त्यांना परराष्ट्रीय व शोमरोनी लोकांच्या नगरात जाऊ नका असे म्हटले परंतु तो स्वतः त्या दोन्ही कडे गेला.
मुद्दा हा आहे आपण जे शिष्यांनी केले तसे करू नये तर जे येशूने केले. येशू शिवाय आपला कोणीही उत्तम उदाहरण असा नाही.
प्रभु येशूने शिष्यांना सांगितले की परराष्ट्रीयांकडेजाऊ नका परंतु तो स्वतः परराष्ट्रीयांकडे गेला (मत्तय ४:१५; योहान ४:९).
मला वाटते ही त्याची महान करुणा होती ज्याने त्यास प्रेरणा दिली त्याच्या मार्गाच्या बाहेर जावे.
येशूचा अर्थ काय होता जेव्हा त्याने १२ शिष्यांना म्हटले की तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा जेव्हा त्याने त्यांना महान आज्ञा पाळण्यास पाठविले? (मत्तय १०:१६)
हे एक संतुलित कार्य असे दिसते, होकी नाही?
एक साप हा चतुर आहे, तीक्ष्ण डोळे आणि शिकण्यास जलद. एक कबुतर हा निरुपद्रवी, दीन व सौम्य. जेव्हा पवित्र आत्मा प्रगट झाला, तो एका कबुतरा प्रमाणे दिसला.
येशूने ह्या संतुलित कृती मध्ये एक आवश्यकता पाहिली, कारण, जसे तो म्हणतो, 'तो त्यांना लांडग्यामध्ये मेंढरे असे पाठवीत आहे.
विरोध हा त्यांच्याकडून येईल...
१. आयोजित धर्म (मत्तय १०:१७)
२. सरकार(मत्तय १०:१८ आणि
२. कुटुंबसुद्धा(मत्तय १०:२१)
वचन प्रचार करण्याअगोदर पापकबुली
कारणहे मी बोलत नाही तर माझ्या पित्याचा आत्मा जो माझ्या द्वारेबोलतो. येशूच्या नांवात.
प्रार्थना: माझ्या पित्याच्या आत्म्या, माझ्याद्वारे बोल येशूच्या नांवात. (मत्तय १०:२०)
छळा बरोबरकसा व्यवहार करावा
"जेव्हा एका गांवात तुमचा छळ करितील तेव्हा दुसऱ्यात पळून जा; मी तुम्हांस खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गांवे तुमच्याने फिरून होणार नाहीत." (मत्तय १०:२३)
आपण काय प्रचार केला पाहिजे?
जे मी तुम्हांस अंधारात सांगतो ते उजेडांत बोलाआणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून घोषित करा. (मत्तय १०:२७)
१.जे मी तुम्हांस अंधारात सांगतो
२.जे तुम्ही ऐकता
येशू खरेच तरवार आणण्यासाठी आला आहे काय?
मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो आहे. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फुट पाडण्यास मी आलो आहे, आणि मनुष्यांच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. (मत्तय १०:३४-३६)
ह्या उताऱ्याच्या खूपच गैरसमजुती मध्ये,संदेष्टा मीखा (७:६)चा संदर्भ येशू देत आहे. तसेच, तरवार, ज्याचा उल्लेख येशू करतो, ते अक्षरशः नाही तर प्रतीकात्मक असे आहे.
तुम्ही पाहा, गेथसेमाने बागे मध्ये येशूचे समर्थन करण्यासाठी जेव्हा पेत्राने तरवार उचलली आणि मुख्य याजकाच्याएका सेवकाचा कान कापून टाकला, तेव्हा येशूने त्यास धमकाविले, आणि त्याची तरवार टाकून देण्यास सांगूनम्हटले, "कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील" (मत्तय २६:५२).मग तो स्वतःहून त्याचे जीवन देतो आणि संपूर्ण जगाच्या पापासाठी मरण पत्करतो.
अनेक जणांनी मला प्रश्न विचारला, "तर मग, येशूने असे का म्हटले, "मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालावयास आलो आहे." कोणत्या प्रकारची तरवार येशू ने आणली आहे?
येशू ख्रिस्ताचे एक नाव हे 'शांतीचा राजकुमार' असे आहे (यशया ९:६)
योहान १४:२७ मध्ये, येशूने म्हटले, "मी तुम्हांस शांति देऊन ठेवतो; मी आपली शांति तुम्हांस देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये."
वरील वचन आणि बायबल मध्ये अशी अनेक वचने, स्पष्ट करतात की, येशूशांति आणण्यासाठी आला-मनुष्य आणि परमेश्वरा बरोबर शांति.
येशूने स्पष्टपणे उल्लेखले आहे, "मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही." ते जे परमेश्वराचा आणि उद्धारासाठी एकच मार्ग येशूचा अस्वीकार करतात तेस्वतःलासततपरमेश्वरा विरोधात संघर्षात पाहतात. परंतु ते जे त्याच्याकडे पश्चातापात येतात ते स्वतःला परमेश्वराच्या शांति मध्ये पाहतील.
ह्या शेवटच्या समया दरम्यान, येथे चांगले आणि वाईट, ख्रिस्त आणि ख्रिस्त-विरोधी, ते ज्यांनी ख्रिस्ताला त्यांचा एकमेव तारणारा म्हणून स्वीकारले आहे आणि ते ज्यांनी स्वीकारलेले नाहीयांच्यामध्ये संघर्ष होईल. अनेक वेळेला असे गट कुटुंबामध्येच असतात, जेथे काही विश्वास ठेवणारे असतात तर काही हे अविश्वासू असतात.
मत्तय १०:३४-३६ मध्ये येशूने म्हटले आहे तो ह्या पृथ्वीवर शांति आणण्यासाठी आला नाही परंतु तरवार, एक शस्त्र जे विभागते. ह्या पृथ्वीला त्याच्या भेटीमुळे, काही मुले ही त्यांच्या आई-वडिलांविरुद्ध होतील आणि मनुष्यांचे शत्रू हे त्यांच्या घरचेच लोक होतील.
हे ह्या कारणासाठी की अनेक जे ख्रिस्ताच्या मागे चालण्याचे निवडतात त्यांसत्यांच्या स्वतःच्याच कुटुंबाद्वारे नेहमी द्वेष केला जातो.प्रभूच्या मागे खरेच चालण्याची ही किंमत आहे. प्रभु येशूने हे स्पष्टपणे उल्लेखले आहे की आपल्या कुटुंबा प्रती आपली प्रीति ही त्यावर असणाऱ्या प्रीति पेक्षा मोठी नसावी. (मत्तय १०:३७)
संपूर्ण इतिहासात हिंसेला न्यायपूर्वक ठरविण्यासाठी ते ज्यांनी ह्या उताऱ्याचा संदर्भ दिला आहे ते त्यांच्या हिंसात्मक आकांक्षेसाठी ह्यास मरगळत आहेत.
आणि तो जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही. (मत्तय १०: ३८)
१. येथे काही आहेत जे प्रभूच्या मागे चालतात ह्या कारणांसाठी....
२. आणि येथे काही आहेत जे काहीही झाले तरी प्रभूच्या मागे चालतात.
Chapters