पुनः त्याने दुसरे दास पाठविले व त्यांस म्हटले की, आमंत्रितांस असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे; माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. (मत्तय २२:४)
लग्नाच्या मेजवानीची तयारी ही इतकी सोपी नव्हती कारण त्यामध्ये पुष्कळ तयारीची आवश्यकता असे-काम. तयारीची गंभीरता लक्षात घ्या. मी माझी मेजवानी तयार केली आहे; माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे.
तर हे मनावर न घेता आणि त्यावर विचार न करता [त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या बोलाविण्याला सहज असे मानले, त्यास अनादराने पाहिले] ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले. (मत्तय २२:५)
ज्यांना आमंत्रण दिले गेले होते त्या लोकांच्या निष्काळजी आचरणाकडे लक्ष दया.
आणि त्याने म्हटले, मित्रा, तूं येथे विवाहाचे योग्य वस्त्र न घालता कसा काय आला? आणि त्याकडे उत्तर नव्हते (अस्पष्ट, निशःशब्द). (मत्तय २२:१२ ऐम्पलीफाईड)
लक्षात घ्या राजाने त्यास मित्र म्हटले.
विवाहाचे वस्त्र, ख्रिस्ताच्या धार्मिकते बद्दल बोलते, की परमेश्वर त्याच्या महान करुणेने ते सर्वांना पुरवितो जे देवाच्या राज्यात त्याच्या आमंत्रणास स्वीकारतात (प्रकटीकरण १९:८), कारण ते चांगले व वाईट दोघांद्वारे घातले गेले पाहिजे (मत्तय २२:१०).
जेव्हा लोक परमेश्वरासमोर शेवटच्या न्यायासाठी उभे राहतील, ते निश:शब्द होतील, जसे ह्या दाखल्या मधील मनुष्याप्रमाणे.
त्याच दिवशी, सदुकी म्हणाले की पुनरुत्थान नाही. (मत्तय २२:२३)
प्रेषित पौलाने १ करिंथ १५:१२-१७ मध्ये म्हटले आहे, जर येथे पुनरुत्थान नाही, तर मग आपला विश्वास हा व्यर्थ आहे, आणि आपण अजूनही आपल्या पापातच आहोत. येशूचे पुनरुत्थित जीवनच जे आपल्यामध्ये आध्यात्मिक जीवन आणते.
तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती. (मत्तय २२:२८)
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की सदुकी लोक पनरुत्थानावर विश्वास ठेवीत नव्हते आणि तरीसुद्धा त्यांनी पुनरुत्थाना संबंधी प्रश्न विचारला. ते सत्य शिकण्याविषयी रुची ठेवीत नव्हते परंतु अधिक वादविवाद करणे व येशूला कोंडीत पकडण्यात रुची ठेवीत होते.
येशूने त्यांस उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमांत पडला आहां. (मत्तय २२:२९)
प्रभु येशूने चुकाचे मूळ कारण आपल्याला दाखविले आहे. कोणताही व्यक्ति किंवा चर्च चे ठिकाण जे देवाच्या सामर्थ्या मध्ये कार्य करीत नाही, ज्यांच्याकडे देवाचे वचन नाही ते चुक आहेत. (मत्तय २२:२९ ऐम्पलीफाईड)
दिवा व तेल – दोघांची गरज आहे.
"गुरुजी, नियमशास्त्रात सर्वात मोठी आज्ञा काय आहे?" (मत्तय २२: ३६)
धार्मिक पुढारी हे इतके काटेकोर होते की नियमशास्त्रातील प्रत्येक लहान गोष्टींचे सुद्धा पालन करावे की त्यांनी त्याचे अंतिम उद्देश गमाविले होते. परमेश्वर किंवा त्यांचे सहकारी लोकांवर सुद्धा ते प्रीति ठेवत नव्हते, तरीसुद्धा त्यांनी विचार केला के नियमशास्त्र पाळत आहेत.
Chapters