मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवीत होते. पिलाताने त्याला पुन्हा विचारिले, काय? तूं काही उत्तर देत नाहीस? पाहा, ते तुझ्यावर किती तरी आरोप ठेवीत आहेत. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही; ह्यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. (मार्क १५: ३-५)
शेवटच्या समयात शत्रू सर्वात मोठे शस्त्र जे ख्रिस्ती लोकांच्या विरोधात वापरणार आहे ते 'खोटे आरोप' आहे.
जर असे खोटे आरोप बाहेरच्या लोकांकडून येतात तर ते समजण्यासारखे आहे परंतु हे जेव्हा 'तथाकथित विश्वासणाऱ्यांकडून येतात,हे खरेच दु:खकारक असे असते.
सैतान हा ख्रिस्ती लोकांचा उपयोग करणार आहे-त्यामध्ये आत्म्याने भरलेले लोक सुद्धा असतील-शेवटच्या समयात देवाच्या पुरुष व स्त्री विरोधात बोलणे-दोन्ही ठिकाणी पूलपीट व मंडळी मध्ये.
शत्रूने हे पाहिले आहे कीबाह्यरित्या छळ आपल्या शस्त्रसामग्री मध्ये तडा निर्माण करू शकत नाही. चर्च ची नेहमीच वाढ झाली आहे जेव्हा तीचा छळ करण्यात आला आहे.
उदाहरणार्थ, इस्राएली लोक संख्येने खूप वाढले जेव्हा त्यांचा छळ केला गेला. जेव्हा प्रारंभीच्या चर्च चा छळ केला गेला, संपूर्ण रोम ख्रिस्ती झाले. सैतानाला एकता आवडत नाही, परंतु विस्फोट पासून विनाश.
त्यामुळे, चर्च मधील पुढारी किंवा चर्च मधील प्रतिष्ठित लोक तक्रार व दोष देण्यास सुरुवात करतात, तेव्हा साप त्याच्या तोंडाद्वारे पाणी फवारत असतोकी पूर आणावा. (प्रकटीकरण)
केवळ याची खात्री करा की सैतान तुम्हाला त्याचे साधन म्हणून वापर करीत नाही की खोटे व दोष देण्याचे त्याचे विष पसरवित नाही.
दावीदाने याचा अनुभव केलाजेव्हा"दावीदाचे घराणे" व"शौलाचेघराणे" यामधीलयुद्ध हे लांबत गेले. दावीद फारच बेजार झाला होता, व त्याने आक्रोश केला, "मी ह्या दिवसात फारच कमकुवत आहे जरी मी राजा आहे!" अत्यंत अभिषिक्त लोक सुद्धा संघर्षामुळे बेजार होऊन जातात जेव्हा घराण्यातील युद्ध हे कधी न संपणारे होते.
"आपसांत फुट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फुट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही." (मत्तय १२:२५)
सर्वत्र तुम्ही पाहा लोक ख्रिस्ती सेवकाचे जीवनउघडे करीत असतात-हे मुस्लीम मौलवी बद्दल नाही किंवा तशा विषयाबाबत इतर धर्मा संबंधित नाही (त्यांच्या विरोधात काही नाही). का मग हे नेहमीच ख्रिस्ती सेवका बद्दल असले पाहिजे?
तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.यहूद्यांचा राजा असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लाविला होता. (मार्क १५:२५-२६)
प्रभु येशूने तुमचे सर्व दोषारोप वधस्तंभावर वाहिले.
मत्तयाचे शुभवर्तमान म्हणते की सैनिकांनी त्याच्या "अंगात किरमिजी झगा" घातला (मत्तय २७: २७-२८), मार्क चे शुभवर्तमान म्हणते की त्यांनी त्यास "जांभळी वस्त्रे घातली" (मार्क १५:१६-१७), आणि योहानाचे शुभवर्तमान स्पष्ट करते की सैनिकांनी त्यास "जांभळे वस्त्र पांघरविले." (योहान १९:१-२)
येथे काही विसंगती नाही शुभवर्तमान लेखकांनी किरमिजी व जांभळा ह्यासंज्ञा केवळ आलटूनपालटून वापरले आहे.
तेव्हा शिमोन नांवाचा कोणी एक कुरेनेकर, म्हणजे आलेक्सांद्र व रुफ ह्यांचा बाप हा, रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरिले. (मार्क १५:२१)
मध्यस्थी चे हे भविष्यात्मक चित्र आहे. शिमोन ने प्रभु येशू चा वधस्तंभउचलून नेला. त्याने अक्षरशः प्रभूचे ओझे वाहिले.
त्याचप्रमाणे मध्यस्थी करणारा प्रभूचे ओझे वाहतो. ते त्याचे ओझे नाही परंतु तरीही तो ते वाहून नेतो.
नवव्या तासाला येशू मोठयाने आरोळी मारून बोलला, 'एलोई, एलोई, लमा, सबखथनी?' म्हणजे'माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केला?' तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, पाहा, तो एलीयाला हांक मारतो आहे!" (मार्क १५:३४-३५)
विविध साईट, ज्यात विकीपेडिया सुद्धा आहे, त्यांच्यानुसार, म्हणणे, ''एली, एली, लमा, सबखथनी?' (किंवामार्क चा भाषांतरात,'एलोई, एलोई, लमा, सबखथनी?') जेमूळतः अरामी भाषे मध्ये होते.
इतिहास आपल्याला सांगतेकी त्यादिवसांत यहूदी इब्री व अरामी ह्या दोन्ही भाषा (त्याचबरोबर काही ग्रीक)बोलत असत, तर येशू काय बोलत आहे हे त्यांनाका समजले नाही?
वधस्तंभावर असताना येशूला दोनदा द्राक्षारस देण्यात आला.
त्याने पहिल्यांदा नाकारले, परंतु दुसरे घेतले. असे का?
पहिली वेळ, मार्क १५:२३ मध्ये आली, "त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही."
जुन्या परंपरेनुसार,ज्या व्यक्तींना मरणदंड दिला आहे त्यांना यरुशलेम मधील प्रतिष्ठित स्त्रियांच्या हस्तेनशेचे द्रव्य देत असत जेणेकरून त्यांच्या वेदनामय त्रासाला कमी करावे ....जेव्हा येशू गुलगुथा येथे आला त्यास ते देण्यात आले.....बोळ मिश्रित द्राक्षारस परंतु त्याने तो घेतला नाही, त्यासज्या वेदना भोगावयाच्या होत्या त्या त्याने शुद्धीवर राहून सहन करण्याचे निवडले. (मार्क चे शुभवर्तमान, पान ५६४)
पहिला द्राक्षारस वेदना कमी करण्यासाठी दिला जात असे. परंतु येशूने त्यास नाकारले, आणि असे करण्याने, "ज्या वेदना भोगावयाच्या होत्या त्या त्याने शुद्धीवर राहून सहन करण्याचे निवडले."
दुसरी वेळ ही मार्क १५:३५ मध्ये येते, तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैंकी कित्येक जणांस वाटले की तो एलीयाला हाक मारीत आहे, त्यानंतर, "कोणीएकाने धावत जाऊन स्पंज 'आंबेने' भरीला आणि बोरुच्या टोकावर ठेवून त्याला 'चाखावयास दिला,' आणि म्हटले, असू दया, एलीया ह्याला खाली उतरावयास येतो की काय हे पाहू."
बायबल विज्ञानी याचा सुद्धा उल्लेख करतात की जुन्या करारात आंबलेले कडू द्राक्षारस हे एक ताजेतवाने करणारे पेय म्हणून केले आहे (गणना ६:१३; रुथ २:१४). ग्रीक व रोमन साहित्यामध्ये सुद्धा हे एक सामान्य पेय होते जे कामगार व शिपायांना आवडत होते कारण ते पाण्यापेक्षा तहान फार चांगली भागवत असे आणि ते स्वस्त सुद्धा होते.
"एलीया ह्याला खाली उतरावयास येतो की काय हे पाहू" हे वाक्य शंकात्मक अपेक्षा व्यक्त करते, द्राक्षारसाचा घोट देण्याचा हेतू येशूला जितके जास्त वेळ शक्य होईल तितका वेळ शुद्धीवर ठेवावे हा होता.
म्हणून पहिला द्राक्षारस हा (बोळ मिश्रित) हा बनविला गेला होता की येशूच्या वेदना कमी कराव्या, की संपूर्ण शुद्धीवर राहून वधस्तंभावरील सर्व वेदना सहन करण्यापासून त्यास वाचवावे. हा द्राक्षारस त्याने नाकारला.
दुसरा(आंबट) द्राक्षारस त्यास दिला की"त्यास जास्त वेळ शुद्धीवर ठेवावे", आणि अशा प्रकारे त्याच्या वेदनेला लांबविण्याचा प्रभाव राहावा. हा द्राक्षारस येशूने घेतला.
इतर शिक्षा दिलेल्या अपराध्यांनी पहिला द्राक्षारस घेतला असेन(म्हणजेत्यांच्या वेदना कमी व्हाव्यात) आणि दुसरा घेतला नसेन (म्हणजे त्यांच्या वेदनांना लांबवू नये). परंतु येशूने आपल्या उद्धारासाठी कोणताही जवळचा मार्ग घेतला नाही.
Chapters