केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?
केव्हा शांत राहावे किंवा बोलावे हे जाणण्यास ज्ञान व पारख ची गरज असते.
केव्हा शांत राहणे हे सोनेरी आहे?
शांत राहणेहे क्रोधाच्या क्षणी उत्तम आहे जेव्हा आपल्याला माहीत आहे की अशा क्षणी आपण काय बोलतो ते निश्चितच देवाच्या वचनानुसार नसते. याकोब १:१९ आपल्यालासुचना देते: "माझ्या प्रिय बंधुनो, तुम्हांस हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा."
त्याचप्रमाणे, "जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे." (१ पेत्र ३: १०)
पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की शांत राहणे हे आपल्याला पाप करण्यापासून वाचविण्यास सहाय्य करू शकते (नीतिसूत्रे १०:१९), सन्मान प्राप्त करावा (नीतिसूत्रे ११:१२), आणि ज्ञानी व बुद्धिमान असे दिसावे (नीतिसूत्रे १७:२८). दुसऱ्या शब्दात तुम्ही तुमची जीभ ताब्यात ठेवण्याद्वारे आशीर्वादित होता.
कधी कधी बोलण्यापेक्षा ऐकणे हा उत्तम भाग होतो. तथापि, ऐकणे हे अनेकांना कठीण होते कारण यास नम्र राहणे व चुकीचे समजले किंवा गैरसमजूत होण्याचा धोका पत्करावा लागतो. मानवी स्वभाव स्वतःचे संरक्षण करण्याकडे वळते, परंतु ख्रिस्ता समान स्वभाव आपल्या स्वतःचा नकार करण्याकडे नेते. (मार्क ८:३४)
शांत राहणे केव्हा सोनेरी नाही
मग तो त्यांना म्हणाला, शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते सशास्त्र आहे? पण ते उगेच राहिले. (मार्क ३:४)
येथेअशी वेळ आहे जेव्हा शांत राहणे निश्चितच सोनेरी नाही.
फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. (उपदेशक ३:७)
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की येथे अशी वेळ येते जेव्हा शांत राहायचे असते परंतुमग येथे ती वेळ सुद्धा येते जेव्हा बोलायचे असते. जर कोणी बोलत नाही जेव्हा त्याने/तिने बोलले पाहिजे असते, तेव्हा मग ते धोकादायक आहे.
शुभवर्तमान सांगण्यामध्ये आपल्याला शांत नाही राहिले पाहिजे. शुभवर्तमान सांगणे हे दर्शविते की आपण वधस्तंभाविषयी लाजत नाही. ख्रिस्ताची शेवटची आज्ञा जी त्याने शिष्यांस दिली की"सर्व राष्ट्रांत जाऊन लोकांस माझे शिष्य करा" (मत्तय २८:१९).
केवळ ही कल्पना करा की येशूचे शिष्य व इतर शिष्यांनी ही आज्ञा न पाळण्याचे निवडले असते? तुम्ही आणि मी निश्चितच परमेश्वराला ओळखले नसते.
तसेच, जर तुम्ही पाहता की चर्च मध्ये काहीही चुकीचे घडत आहे, हुशारीने ते योग्य अधिकाऱ्यांना सांगा. शांत राहण्याने अनेकांना किंमत चुकवावी लागू शकते.
तर मग आपण कसे बोलावे?
१ पेत्र ३:१५ आपल्याला सुचना देते की, "तर ख्रिस्ताला 'प्रभु' म्हणून आपल्या अंत:करणात 'पवित्र माना'; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने दया."
कलस्सै ४:६ आपल्यालासुचना देते: "तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे." आपला उद्देश हा, "सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे".
मार्टिन निमोलर (१८९२-१९८४) हे एक प्रसिद्ध पाळक होते, जेअॅडॉल्फ हिटलरचे सार्वजनिकपणे विरोध करणारे शत्रू असे दिसून आले आणि नाझी काळातील शेवटची सात वर्षे छळास तोंड दिले.
निमोलर यांना ह्या संदर्भा साठी उत्तम रित्या ओळखले जाते:
पहिल्यांदा ते समाजवादी साठी आले, आणि मी बोलले नाही-
कारण मी समाजवादी नव्हतो.
मग ते कामगार-संघटने साठी आले, आणि मी बोलले नाही-
कारण मी कामगार-संघटनेचा नव्हतो.
मग ते यहूद्यांसाठी आले, आणि मो बोलले नाही-
कारण मी यहूदी नव्हतो.
मग ते माझ्यासाठी आले-आणि मग तेथे कोणीच उरले नाही की माझ्यासाठी बोलावे.
मग परुशी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा ह्याविषयी लागलीच हेरोदियांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत [काही मार्ग काढावा] करीत बसले. (मार्क ३:६)
दुष्ट एकतेचे हे उदाहरण आहे.
हेरोदियन लोकांकडे राजकीय सत्ता होती आणि अधिक विज्ञानी हा विश्वास ठेवतात की ते एक राजकीय पक्ष होते ज्यांनी राजा हेरोद अंतीपास ला सहकार्य दिले होते, जोयहुद्यांच्या अधिकतर भूमि वर ख्रिस्तपूर्व ४ ते इसवीसन ३९ दरम्यान रोमन साम्राज्याचा शासक होता. हेरोदियनलोकांना हेरोद च्या अधीन राहणे, आणि म्हणून रोम बरोबर राजकीय स्वार्था साठी अधीनराहणे पसंत होते. हेरोद ला असे साहाय्य करण्यात परुशी लोकांच्या मनात यहूदी स्वतंत्रतेची तडजोड केलीहोती, ज्यामुळे हेरोदियन व परुशी लोकांना कोणत्याही बाबतीत एक होणे व सहमत होण्यास कठीण केले होते.
परंतु एका गोष्टीने त्यांना एक केले होते-येशूचा विरोध करणे.
हेरोद ला स्वतःला येशू मरावा हे पाहिजे होते (लूक १३:३१), आणि परुशी लोकांनी अगोदरच त्याच्याविरुद्ध कट योजिला होता (योहान ११:५३), म्हणून त्यांनी त्यांचे प्रयत्न एक केले की ध्येय प्राप्त करावे.
तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली; अशासाठीकी, त्यांनी त्याच्याबरोबर असावे व त्याने त्यांस उपदेश करावयास पाठवावे. (मार्क ३: १४)
प्रभूने बारा जणांची नेमणूक केली याचे मुख्य कारण म्हणजे ते त्याच्याबरोबर असतील. यानंतरइतर सर्व काही येते.
परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमानाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. (मार्क ३:२९)
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे पवित्र आत्म्याला चुकीचे सादर करण्याच्याधोक्याविषयीसांगते
जो कोणी माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो, तेचमाझे भाऊ, बहिण व आई आहेत (मार्क ३:३५).
परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे हे तुम्हाला परमेश्वराबरोबरील संबंधात वाढणे व त्याच्याबरोबर ते संबंध गाढ करण्यास साहाय्य करेल.
Chapters