शौल यरुशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकांकडे गेला. 2 शौलाने त्याला दिमिष्क येथील सभास्थानातील यहूदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले. शौलाला प्रमुख याजकाकडून दिमिष्क येथील ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता. जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले असते तर त्याने त्यांना अटक करुन यरुशलेमला आणले असते. (प्रेषितांचीं कृत्यें 9:1-2)
ख्रिस्ती म्हणून परिवर्तीत होण्याअगोदर शौल एक दुष्ट व क्रूर व्यक्ति होता. ख्रिस्ती धर्माचा तो द्वेष करीत होता आणि जे कोणी ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारे होते त्यांचा त्याने छळ केला होता. होय, तो एक नैतिक मनुष्य होता आणि त्याने मोशेचे नियमशास्त्र पाळले होते. परंतु ख्रिस्ती लोकांचा व देवाची निंदा करणाऱ्यांचा तो छळ करणारा होता. तरीही, त्याने हे सर्व काही केले हा विश्वास ठेवून की तो देवाची सेवा करीत आहे.
प्रारंभीची मंडळी जी विखरली होती तिच्या छळाच्या पहिल्या लाटेमध्ये तो मुख्य भूमिका बजाविणारा होता. विश्वासणाऱ्यांचा विश्वासाने भरलेल्या जीवनास ठेचून काढण्यासाठी व त्यांना त्यांच्या विश्वासाचा नकार करण्यासाठी त्याने धमकी देण्याचा वापर केला. त्या घटनेमध्ये जेथे हा दृष्टीकोन प्रभावी ठरला नाही, शौलाने त्यांना जिवंत मारले. अशा प्रकारे, वरील वचन म्हणते, "मग शौलाने, अजूनही धमक्या देणे व त्यांचा घात करणे चालू ठेवले होते."
त्याच्या मिशनची क्रूरता इतकी तीव्र होती की स्त्रियांना सुद्धा सोडले नव्हते. त्यांना पुरुषांप्रमाणे वागणूक दिली गेली होती. त्याचे परिवर्तन होण्याची वेळ व स्थळाकडे पाहा. सभास्थान, मंदिर किंवा मंडळीच्या सभेमध्ये तो नव्हता. प्रसंग हे दाखवितो की पापी लोकांचे परिवर्तन हे मंडळी परीसरापुरते मर्यादित नाही. ते कोठेही घडू शकते की जेथे परमेश्वर स्वतःला पापी व्यक्तीला ओळख दाखवू इच्छितो. तसेच, याचा देखील विचार करा की तो दमास्कस येथे जवळजवळ पोहचला होता, जेव्हा तो ख्रिस्ताला भेटला.
मग शौल दिमिष्काला गेला. जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला. 4 शौल जमिनीवर पडला, एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?” (प्रेषितांचीं कृत्यें 9:3-4)
शौलाची भेट ही केवळ त्याच्या एकट्याच्या लाभासाठी नव्हती. दमास्कस येथील शिष्यांसाठी तो प्रत्यक्ष एक मोठा धोका होता. म्हणून ख्रिस्ताची मध्यस्थी मंडळीसाठी त्याचा दयाळूपणा व विश्वासूपणा होता, ज्यांस शक्यतो ठाऊक होते की शौल त्यांचा छळ करण्यासाठी येत आहे. तसेच, ही शौलासाठी देखील दया होती, जर त्याने त्याची योजना पूर्ण केली, तर तो त्याच्या स्वतःवर देवाचा क्रोध ओढून घेणार होता. त्याच्यासाठी ख्रिस्ताचे शब्द हे, "शौला, माझा छळ तू का करितोस?" हे दाखविते की स्वर्गाने पाहिले की शौलाचे कृत्य हे एक मोठे पाप होते.
आता, लक्षात घ्या की, हा प्रकाश जो दाखविला गेला तो अद्भुत होता. सूर्य जेव्हा प्रकाशत आहे तेव्हा पाहणे हे पुरेसे दृश्य होते. हा प्रकाश केवळ शौलाच्या मुखावरच चमकला नाही परंतु ते सर्व त्याच्याभोवती होते त्यांच्यावरही चमकला, हे सुचविते की त्याच्या समजेमध्ये प्रकाश पडला.
तसेच, याकडे लक्ष दया की तो जमिनीवर पडला. शौल दमास्कसला त्याच्या मिशनच्या तातडीसाठी पायी जात नसेल, लांबचा प्रवास व मोठी दलाली त्याने अगोदरच प्राप्त केली होती. म्हणून तो त्याच्या घोड्यावर होता जेव्हा स्वर्गातून प्रकाशाने जनावरास बिथरविले आणि शौलाला पाडण्यात आले. या अनुभवाने शौलाला नम्र केले आणि ते प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी प्रतीकात्मक असे आहे. ख्रिस्ताचे प्रकट होणे नम्र करणारे आहे, ते आपल्याला आपली कमकुवत अवस्था व अपात्रतेवर मनन करावयास लावते, जे मग शरण जाणे व अधीन होण्याकडे नेते.
ख्रिस्त शौलाला प्रेषित पदावर उच्च करणार होता, म्हणून त्यास प्रथम त्यास निकृष्ट करणे अवश्य होते. त्या प्रत्येकाला ज्यास ख्रिस्त उच्च करतो त्यास प्रथम नीच केले गेले पाहिजे की त्यांनी त्यांचा अशक्तपणा व अपात्रपणा ओळखावा.
हे मनोरंजक आहे याची नोंद घेणे की राजा शौलासारखेच त्याचे नाव होते, ज्याने दाविदाचा छळ केला होता. आणि आता, दाविदाच्या पुत्राचा छळ करणाऱ्याचे देखील तेच नाव होते. तसेच, त्याच्या नावाचा उल्लेख हे अगदी स्पष्ट करते की येशू कोणाला संबोधत होता आणि त्याने त्याच्या सद्सद्विवेकबुद्धिवर त्याची तीव्रतेने छाप पाडली. जेव्हाकेव्हा देव बोलतो, आणि आपण त्याचे वचन आपल्या स्वतःला लागू करतो, तेव्हा त्यास अधिक सकारात्मक प्रभाव असते व ते परिवर्तन निर्माण करते.
शौल लोकांचा छळ करीत होता तरीही ख्रिस्ताने म्हटले, "तू माझा छळ का करितोस?" ख्रिस्ताचे त्याच्या लोकांसोबत गहन संबंध हे दाखविते. जे काही तुम्ही त्याच्या लोकांप्रती करता, चांगले किंवा वाईट, ते तुम्ही प्रभूप्रती देखील करता.
शौल म्हणाला, “प्रभु तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे (प्रेषितांचीं कृत्यें 9:5)
या वचनामध्ये याकडे लक्ष दया की शौलाने ख्रिस्ताच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही, त्याच्या अंत:करणात अपराधीपणाची जाणीव झाली होती. पापाच्या कबुलीकडे नेहमी सामर्थ्य आहे की दु:ख देणाऱ्या व्यक्तीला निःशब्द करावे व त्यांना कोणताही बहाणा करू देऊ नये.
तथापि, छळ करणाऱ्याला त्याचा न्याय करणाऱ्याची ओळख करावयाची होती. परंतु तो येथे आदराचे शीर्षक जोडतो, हे ओळखून की व्यक्ति ज्याच्याबरोबर तो बोलत आहे त्याच्याकडे मोठा अधिकार आहे. शौलाने ख्रिस्ताला विचारले तो कोण आहे, हे दाखविते की ते अगोदर भेटले नव्हते. तरीही, ख्रिस्ताशी त्याचे संबंध असण्याची त्याची तयारी हे दाखविते.
दयाळूपणे, ख्रिस्त त्याच्या प्रश्नाला उत्तर देतो. खरोखर, तो इच्छूक आहे त्यांच्या प्रशांना उत्तर दयावे जे त्यांच्या संपूर्ण अंत:करणाने त्यास ओळखण्याची इच्छा करतात. होय, शौलाला नाव ठाऊक होते परंतु त्याला हे ठाऊक नव्हते की ते स्वर्गातील देवाच्या पुत्राचे आहे. येथे, पाप हे देवा विरुद्ध सरळपणे अपराध असे प्रकट केले गेले होते आणि सर्व अपराधांसाठी खऱ्या विश्वासणाऱ्यांची ही विचारसरणी असली पाहिजे, केवळ छळ नाही.
ख्रिस्त त्याच्या परिचयामध्ये ताकीद देण्याचा संदेश जोडत आहे (पराणीवर लाथ मारणे तुला कठीण), शौल जो भीतीदायक आहे त्यास बदलणे आणि स्वयं-विनाश जो त्याच्यासमोर होता जर मंडळीचा छळ करणे त्याने तसेच चालू ठेवले असते.
पराणीवर लाथ मारण्याचे उदाहरण ख्रिस्ताने का वापरले? पराणी हे टोकदार लाकूड आहे जे जनावरांना हाकण्यात वापरण्यात येते. म्हणून अशी धोकादायक वस्तू पाहणे हे कोणासाठी मूर्खपणाचे चित्र आहे आणि त्यांचे शरीर अशा टोकदार लाकडाकडे उघडे करणे. त्याप्रमाणेच, ते जे देवाच्या वचनाविरुद्ध बंडखोरी करतात आणि त्याच्या सेवकांचा व त्याच्या लोकांचा छळ करतात हे केवळ त्यांच्या स्वतःलाच दु:ख देत आहेत.
आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, हे तुला तेथे कोणी तरी सांगेल.” (प्रेषितांचीं कृत्यें 9:6)
नवीन वास्तविकता जिचा त्याने कट्टरपणे विरोध केला होता त्यामध्ये शौलाला सहज प्रवेश दिला गेला. तो इतका पूर्णपणे आश्चर्याने भरला गेला होता की त्यास हे विचारण्यास भाग पडले, "प्रभु, मी आता काय करावे असे तुला वाटते?" शौलाने स्वीकारले की तो चुकीमध्ये होता आणि योग्य मार्ग जाणण्याची इच्छा केली की त्यानुसार चालावे. अशा प्रकारे त्यास मोठी इच्छा होती की त्याच्या नवीन प्रभु द्वारे मार्गदर्शित केले जावे. नितीमत्वाच्या मार्गामध्ये मार्गदर्शनासाठी जेव्हा शौलाला ही इच्छा होती, तेव्हा तारणाच्या कार्याचा ते पुरावा आहे.
हे एक कारण आहे की नियमितपणे आपण परमेश्वराबरोबर चांगला वेळ का घालविला पाहिजे आणि त्यास आपल्याला सरळपणे बोलू दिले पाहिजे. अधिकतर वेळा, आपले अंत:करण आपल्याला एक गोष्ट सांगेल, परंतु परमेश्वर आपल्या अंत:करणाला पटवून देईल की त्याच्या नितीमत्वाच्या मार्गावर त्याचे अनुसरण करावे.
ख्रिस्ताची इच्छा व अधिकारास त्याचे शरण जाणे हे शौलाच्या शब्दाने दाखविले आणि आध्यात्मिक जीवनात वाटचाल करण्याच्या सुरुवातीस चिन्हित करते. मुख्य याजक किंवा यहूदी पुढाऱ्यांना काय पाहिजे याची त्याने पर्वा केली नाही, परंतु त्याची प्राथमिकता ही परमेश्वराची इच्छा होती. पापी व्यक्तीच्या इच्छेवर परिवर्तनाचे रुपांतरीत कार्य हे दाखविते.
देवाच्या योजनेमध्ये दोन महत्वाचे गुणधर्म आहेत
१. ती व्यक्तिगत योजना आहे.
प्रेषित ९:६ मध्ये व्यक्तिवाचक सर्वनामकडे लक्ष दया. "मी काय करावे हे तुला पाहिजे?"
जगामध्ये येथे तुमच्यासारखा इतर कोणी नाही-तुमच्यासाठी देवाची योजना ही एकमेव आहे. त्याच्याकडे उद्देश आहे की तुमच्या जीवनात व त्याद्वारे ते पूर्ण करावे जे इतर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात पूर्ण केले जाऊ शकत नाही.
२. ती एक परिपूर्ण योजना आहे
आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. (रोमकरांस 12:2)
आपल्याला सांगितले गेले आहे की त्याच्या लेकरांच्या जीवनात देवाची इच्छा किंवा देवाची योजना आणि उद्देश हे चांगले, स्विकारणीय व परिपूर्ण आहेत. ह्या तीन शब्दांबद्दल चिंतन करा कारण ते महत्वपूर्ण आहेत.
लक्षात घ्या शौलाला त्या सुचना दिल्या गेल्या नाही ज्याचा तो पाठपुरावा करीत होता. तरीही, त्यास पुढील सूचनांचे आश्वासन देण्यात आले होते. ख्रिस्ताला पाहिजे होते की शौलाला पुरेसा वेळ मिळावा की जे त्याच्या जीवनात झाले आहे त्यावर मनन करावे. कदाचित आणखी एक कारण असेन की शौलाने ज्याची इच्छा केली होती त्यासाठी ताबडतोब सुचना प्राप्त केल्या नाहीत हे यासाठी की त्याची वर्तमान मन:स्थिती हे कारण होती. भेटीद्वारे तो अगोदरच गोंधळाला गेला होता आणि ख्रिस्ताला पाहिजे होते त्याने त्या सुचना अशा प्रकारे प्राप्त कराव्यात ज्याद्वारे तो त्यास प्रकट करेल; एका मनुष्याद्वारे.
तुम्ही कदाचित त्यातील एक असाल ज्यांनी हा प्रश्न तुमच्या स्वतःच्या जीवनासाठी कधीही विचारलेला नसेल, "प्रभु, मी काय करावे असे तुला पाहिजे?" कदाचित तुम्ही काही वेळ बाजूला काढून ठेवाल की त्याची समक्ष भेट घ्यावी. त्यास हा प्रश्न विचारा. आणि जे काही तो तुम्हाला सांगत आहे त्यासह त्याच्या उत्तराची वाट पाहा, मग ते सध्यासाठी असो किंवा भविष्यासाठी असो.
परमेश्वर त्याच्या योजना आपल्याला पायरी पायरीने प्रकट करीत असतो. पवित्र शास्त्र सांगते,, परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो.परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो. (स्तोत्रसंहिता 37:23).
मग प्रभूने त्यास म्हटले, तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल."
शौलाला काय करावे हे त्याचवेळेस का सांगण्यात आले नाही?
येथे एक सिद्धांत आहे. हे मग तेव्हाचे जेव्हा आपण प्रभूची सध्याची वाणी अनुसरतो, तेव्हा आपण भविष्याच्या सुचना प्राप्त करू. जर पौल त्या नगरात गेला नसता तर काय झाले असते? प्रभूकडून पुढील सुचना प्राप्त करणे त्याने गमाविले असते. तो नगरात जाऊन सर्वाना हे सांगू शकला असता की देवाची वाणी त्याने ऐकली आहे, आणि हे तेवढेच राहिले असते. देवाकडून तो अधिक ऐकू शकला नसता.
जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली. त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही. (प्रेषितांचीं कृत्यें 9:7)
आता, जरी शौल त्या भेटीने फारच प्रभावित झाला होता, तरी मनुष्ये जी त्याच्याबरोबर होती ती अंधारातच होती. होय, ते देखील त्यांच्या घोड्यांवरून कदाचित खाली पडले असतील परंतु ते पुन्हा त्यांच्या पायांवर उभे राहिले. परंतु ते केवळ निसःशब्द होते आणि गोंधळात होते, परंतु त्यांच्यामध्ये काहीही बदल झाला नव्हता.
जरी त्यांनी प्रकाश पाहिला होता आणि शौलाप्रमाणे जमिनीवर पाडले गेले होते, तरी त्यांचे परिवर्तन झाले नव्हते. हे दाखविते की देवाच्या आत्म्याशिवाय आणि देवाच्या कृपेच्या प्रकटीकरणाशिवाय, बाह्य प्रकटीकरणे तारणाची फळे निर्माण करू शकत नाहीत. ह्या मनुष्यांनी वाणी ऐकली जी शौलाला बोलत होती परंतु जे बोलले गेले होते ते समजू शकले नाहीत. मंडळीचा मोठा छळ करणाऱ्यावर देवाच्या सामर्थ्याच्या उद्रेकाचे ते केवळ साक्षीदार होते.
शौल जमिनीवरुन उठला. त्याने डोळे उघडले, पण त्याला काहीच दिसेना. म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते, त्यांनी त्याचा हात धरुन त्याला दिमिष्क शहरात नेले. 9 तीन दिवसांपर्तंत शौलाला काहीच दिसत नव्हते. त्याने काहीच खाल्ले किंवा प्यायले नाही.(प्रेषितांचीं कृत्यें 9:8-9)
ही वचने ख्रिस्ताबरोबरच्या भेटी नंतरची शौलाची अवस्था दाखवितात. त्याच्या सहकाऱ्यांसारखे नाही, ख्रिस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे तो उठला. परंतु हे शक्य आहे त्यास त्याच्या पायावर उभे करावयास साहाय्य करावे लागले कारण त्या भेटीने त्यास भयभीत व हताश असे केले होते. त्याने जेव्हा त्याचे डोळे उघडले, त्याला समजले की तो आंधळा झाला आहे. तथापि, हा तो प्रखर प्रकाश नव्हता ज्याने हे आंधळेपण आणले होते कारण त्याच्या बरोबरच्या माणसांनी देखील तोच प्रकाश पाहिला होता पण तरीही त्यांना दृष्टी होती. त्याऐवजी, हे याकारणासाठी की त्याच्या डोळ्यांनी ख्रिस्ताला पाहिले होते.
शौलाला आंधळे केले गेले याचे काय महत्त्व आहे?
ख्रिस्ताने शौलाचे डोळे इतर गोष्टींवरून बाजूला केले होते म्हणजे तो त्याच्याकडे पाहू शकेन. त्याचप्रमाणे, जेव्हा परमेश्वर स्वतःला आम्हांस प्रकट करतो, ही भेट आपले लक्ष्य या जगाच्या गोष्टींकडून काढून घेते की वरील गोष्टींकडे पाहावे व त्यावर लक्ष केंद्रित करावे.
पुढे, याकडे लक्ष दया की शौलाला दमास्कसला कसे नेण्यात आले. तो जो पूर्वी मंडळी विरोधात धमक्या देत होता व त्यांचा छळ करीत होता तो आता अशक्त व असहाय्य झाला होता. तो ज्याने अगोदर इच्छा केली होती की इतरांना यरुशलेमेत धरून आणावे तो आता दमास्कस मध्ये, ख्रिस्ताचा कैदी म्हणून बंदिवान असा नेण्यात आला होता.
शौल तीन दिवस आंधळा होता आणि त्याने काहीही खाल्ले नाही. शक्यतो, तो अपराधीपणाची भावना व भयग्रस्त असा होता त्याच्या घोर पापांच्या कारणामुळे, आणि त्याचा परिणाम म्हणून, त्यास भूक नव्हती.
दिमष्कमध्ये येशूचा एक अनुयायी होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभु त्याच्याशी एका दृष्टान्तात बोलला: तो म्हणाला, “हनन्या!” हनन्याने उत्तर दिले, “मी आहे, प्रभु!” (प्रेषितांचीं कृत्यें 9:10)
"इकडे दिमिष्कात हनन्या नांवाचा कोणीएक शिष्य होता; त्याला प्रभु दृष्टांतात म्हणाला, हनन्या! त्याने म्हटले, काय, प्रभू?"
येथे आपण पाहतो की ख्रिस्त हनन्याला आज्ञा देतो, जो दमास्कसचा नागरिक होता की त्याने शौलाला साहाय्य करावे आणि त्यास अभिवचन असलेली सुचना दयावी. हनन्याची येथे एक शिष्य म्हणून ओळख दाखविली आहे, तरी त्याने सेवाकार्याच्या पाच-पदरी कोणत्याही पदावर काम केलेले नव्हते.
लक्षात घ्या की ख्रिस्ताने हनन्याला नांवाने हाक मारली आहे आणि हे की त्याने निश्चितपणे त्यास उत्तर दिले आहे. अशा प्रकारे, हे अचूक आहे असे म्हणणे की ही ती पहिली वेळ नव्हती की ख्रिस्त हनन्याला अशा प्रकारे बोलत होता.
यशया ६:१-८ या वचनांची आपल्याला आठवण येते काय? संदेष्टा यशया मंदिरात गेला की उपासना करावी. परमेश्वराच्या उपस्थितीत असताना सराफीम वेदीवरील इंगळ घेऊन खाली आला आणि यशयाच्या ओठांस स्पर्श केला. यशयास परमेश्वराच्या शुद्धीकरणाचा अभास झाला. प्रभूने तेव्हा प्रश्न केला, "मी कोणाला पाठवू? तेव्हा यशया म्हणाला, "प्रभू, मी आहे, मला पाठीव."
परमेश्वराने आपल्यासाठी काय केले आहे याबद्धल आपण जेव्हा पूर्णपणे प्रशंसा करू लागतो, खात्रीने आपण हनन्याप्रमाणे होऊ आणि उत्सुकतेने म्हणू, "प्रभू, मी आहे, माझा उपयोग कर,"
प्रत्येकजण पौल होऊ शकत नाही, परंतु सर्व जण हनन्यासारखे होऊ शकतात.
प्रभु हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्तयावर जा. तेथे यहूदाचे [a] घर शोध व तार्ससहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तिबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे. 12 शौलाने दृष्टान्त पाहिला आहे. त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवीत आहे, असे त्याला दिसले. व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्याला दिसले.” (प्रेषितांचीं कृत्यें 9:11-12)
"प्रभु त्याला म्हणाला, उठून नीट नांवाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नांवाच्या मनुष्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करीत आहे; आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नांवाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवीत आहे असे त्याने पाहिले आहे."
ह्या वचनांत, ख्रिस्त हनन्याला एक विशेष घर व रस्त्याकडे मार्गदर्शन करीत आहे जेथे शौल राहत आहे. यावरून, आपण हे शिकतो की ख्रिस्ताला ठाऊक आहे की त्याच्या लोकांना कोठे शोधावे व समाधान दयावे मग याची पर्वा नाही की ते काय अनुभवीत आहेत. त्यांना कदाचित असे वाटत असेन की त्यांचे जीवन हे अस्तव्यस्त असे झालेले आहे आणि त्यांच्याविषयी कोणीही काळजी करीत नाही, परंतु ख्रिस्त अवश्य करतो आणि त्यांना साहाय्य पाठवील.
ख्रिस्त प्रकट करतो की शौल प्रार्थना करीत आहे, कदाचित मनस्तापात कारण देवाच्या पुत्रा विरुद्ध त्याने केलेले पाप स्पष्टपणे जाणले आहे. आणि आपण हे देखील पाहतो की ख्रिस्ताने येथे शौलाच्या दु:खामध्ये त्याचे थोडक्यात सांत्वन केले आहे त्यास दृष्टांतात खात्री देण्याद्वारे की कोणीएक येत आहे की त्यास सुचना दयावी और त्यास पुन्हा दृष्टि प्राप्त व्हावी. बऱ्याच वेळा, ख्रिस्त आपल्याला भविष्यातील गोष्टी दाखवितो की दृष्टांत किंवा स्वप्ना द्वारे आपल्याला सांत्वन व प्रोत्साहन दयावे.
शौल काय करीत आहे हे ख्रिस्ताने वर्णन करण्याद्वारे हनन्याचे लक्ष शौलाच्या परिवर्तनाच्या नवीन अवस्थेकडे प्रथम वेधले गेले. मंडळीचा पूर्वीचा छळ करणारा जो धमक्या देत व खून करीत होता तो आता प्रार्थना करीत आहे.
परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभु मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरुशलेम येथील तुइया संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे. 14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना बांधून नेण्यासाठी प्रमुख याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.” (प्रेषितांचीं कृत्यें 9:13-14)
ह्या वचनांत, आपण हनन्याची शौलाकडे जाण्याची नाराजी पाहतो. तो अवज्ञा करणारा नव्हता, केवळ नाराज होता कारण त्यास शौलाबद्दल भीति होती जो ख्रिस्ताच्या शिष्यांना पकडण्यात त्याची प्रतिष्ठा व त्याच्या कार्यात गुप्तता ठेवणारा होता. तथापि, त्याने घाबरले नाही पाहिजे होते, हे जाणून की या कामावर त्यास कोणी पाठविले आहे.
"परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतति ह्यांच्यासमोर माझे नांव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे; आणि त्याला माझ्या नांवासाठी किती दु:ख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन." (प्रेषितांची कृत्ये ९:१५-१६)
ह्या वचनांत, हनन्याच्या आक्षेपास ख्रिस्ताच्या उत्तराचा प्रकार आणि घटकावर आपण विचार करू. हे महत्वाचे आहे हे लक्षात घेणे की ख्रिस्ताने त्याच्या सेवकाला भिन्न मत ठेवण्यासाठी खडसावले नाही. त्याऐवजी, त्याचे उत्तर त्याची विनम्र होण्याची तयारी आणि आज्ञा देण्यामागील कारणे स्पष्ट दाखविते. किती अद्भुत आहे हे जाणणे की परमेश्वर ज्याचे विचार व मार्ग आपल्या मार्गा पेक्षा अत्युच्च असे आहेत, आपल्याला कारणे देण्यास त्यास आवडते.
हनन्याप्रमाणे शौलाच्या भूतकाळाच्या जीवनावर विचार करीत बसने देखील ख्रिस्ताने निवडले नाही. त्याऐवजी, त्याने हनन्याला उघड केले की शौलाचा भविष्यकाळ हा गौरवी असेल कारण सुवार्तेखातर तो एक निवडलेले पात्र आहे. होय, अयोग्य पात्र, हे निवडलेले पात्र झाले जे टाकून दिले जाऊ शकत नाही परंतु स्वर्गीय खजिन्याने भरले जाते आणि मोठया उद्देशासाठी जबाबदार ठरविले जाते. ख्रिस्ताने हे उघड केले की शौलाला पवित्र सेवा आणि मोठया यातनेसाठी घडविले गेले आहे. तो जो छळ करणारा होता त्यास स्वतःला सुवार्तेखातर छळण्यात येईल.
ते ज्यांस ख्रिस्ताचा प्रचार करण्यास पाचारण केले आहे त्यांनी त्यांचा वधस्तंभ उचलून घेऊन चालण्यास तयार राहिले पाहिजे आणि त्याच्या यातनेमध्ये भाग घ्यावा. खात्रीने, अशा धोक्याची वार्ता ही नवीन विश्वासणाऱ्याला ऐकण्यास फारच कठीण आहे परंतु युद्धासाठी सैनिकाच्या अंत:करणास धैर्य देण्यासाठी आवश्यक आहे, कारण आपण खरोखर ख्रिस्ताचे सैनिक आहोत.
हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभु येशूने मला पाठविले. ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले, येशूने मला पाठविले यासाठी की, तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास.” (प्रेषितांचीं कृत्यें 9:17)
येथे आपण पाहतो की ख्रिस्ताने त्याच्या मतभिन्नतेवर उत्तर दिल्यावर, हनन्या त्यास नियुक्त केलेल्या कामावर निघून गेला. त्याचे हात ठेवणे हे दोन मार्गांनी फारच प्रतीकात्मक असे आहे. प्रथम, हे ख्रिस्ताच्या आश्वासनाची पूर्तता दाखविते की विश्वासणारे हे आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते स्वस्थ होतील. दुसरे, ते हे देखील दाखविते की देवाच्या राज्यात, वाईटाचा बदला हा वाईटाने नव्हे तर चांगल्या द्वारे दिला जातो. शौल, जो विश्वासणाऱ्यांवर मृत्यू व बंदी बनविण्याचा हात ठेवण्यास आला होता त्यास मुक्तता व स्वास्थ्याचा हाताने स्पर्श केला गेला होता.
हनन्याचे शौलाला बोलण्यावर लक्ष दया. त्याने त्यास "भाऊ" म्हटले, हे स्वीकारले की शौल हा आता देवाचे लेकरू आणि देवाच्या विपुल कृपेचा भागीदार झाला होता. तो त्यास सांगतो की तोच येशू ज्याने त्यास घाव केले तो आता त्यास बरे करण्यास आला आहे. तो ज्याने शिक्षा दिली त्याने सात्वन केले आहे. परंतु शौलाला त्याच्या दृष्टीपेक्षा बरेच अधिक प्राप्त करावयाचे होते. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होण्याद्वारे त्यास ताबडतोब प्रेषित म्हणून आज्ञा देण्यात येणार होती.
लागलीच खपल्यासारखे काही तरी शौलाच्या डोळ्यांवरुन खाली पडले, आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. 19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला. शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला. (प्रेषितांचीं कृत्यें 9:18-19)
येथे आपण, शौलाला पुन्हा देण्यात आलेली दृष्टी, त्याचे महत्त्व व प्रभाव पाहतो. हनन्याने जेव्हा शब्द म्हटले, तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे कांही पडले, हे दाखविते की अंधाराचे सामर्थ्य जे सुवार्ता स्वीकारण्यापासून त्यास रोखत होते ते मोडले गेले आहे. शौलाचे डोळे चमत्कारिकरित्या उघडले गेले, हे अंधारापासून त्याच्या मुक्तीचे सूचक आहे आणि त्यास आज्ञा की आंधळ्यांना डोळस करावे आणि जे बंदिवासात आहेत त्यांच्यासाठी तुरुंगाचे दरवाजे उघडावे.
ख्रिस्तासाठी प्रभु म्हणून त्याचे समर्पित होणे दाखविण्यासाठी, शौलाचा बाप्तिस्मा केला गेला, स्वतःला ख्रिस्ताच्या कृपेवर टाकून दिले आणि स्वतः त्याच्याबरोबर येऊन मिळाला.
या गोष्टींचा परिणाम काय होता?
१. शौलाला संभ्रम व आंतंक करण्याच्या त्याच्या अवस्थेपासून मुक्त केले गेले होते, ज्याने भुकेपासून त्यास हिरावून ठेवले होते. त्यामुळे, त्याची भूक परत आली आणि म्हणून त्याची शक्ती देखील.
२. ख्रिस्ताच्या कुटुंबात स्वीकार झाल्यानंतर, तो दमास्कस मध्ये शिष्यांबरोबर वार्तालाप करू लागला होता. त्याचे धमकी देणे व खून करणे हे आता बंधुप्रेम व जिव्हाळा झाले होते.
Chapters