त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणऱ्यांचा छळ करु लागला (प्रेषितांची कृत्ये १२:१)
हेरोद अग्रिप्पा हा त्यावेळी यरुशलेमेवर राजा होता जेव्हा शौल व बर्णबा यरुशलेमेस जाण्याची तयारी करीत होते. ही ती वेळ देखील होती की यरुशलेम सोडून इतर देशात मोठा दुष्काळ होता. म्हणून शौल व बर्णबा हे यरुशलेम येथील विश्वासाणाऱ्यांनी जो काही निधि गोळा केला होता ते घेण्यासाठी गेले होते की इतर मंडळ्यांना दयावे. यरुशलेमेचे इतर क्षेत्रांवर इतके वर्चस्व होते की लहान राज्ये अस्तित्वात राहण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून राहत होती. यापूर्वी, यरुशलेमेत कोणीही राजा नव्हता, ज्याचे यहूदावर शासन होते. हेरोद हा प्रथमच होता, आणि शक्यतो शेवटाचा. आणि मग, त्यावेळी, हेरोदाला चर्चच्या कार्यांबद्दल इतका द्वेष होता की, त्याने त्यांचा छळ करण्यासाठी त्यांच्यावर हात टाकला.
२हेरोदाने याकोबाला तलवारीने मारण्याची आज्ञा केली, याकोब हा योहानाचा भाऊ होता.३हेरोदाने पाहिले की, यहूदी लोकांना हे आवडले आहे. म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरविले. (हे वल्हांडण सणाच्या काळात घडले.) (प्रेषितांची कृत्ये १२:२-३)
दुर्दैवाने, याकोब, योहानाचा भाऊ, हा हेरोदाच्या क्रोधास बळी पडला. याकोबाला तरवारीने भोसकण्याद्वारे मारण्यात आले. विद्वान, सामान्यपणे यास एक ऐतिहासिक घटना असे स्वीकारतात जी सहसा हेरोद अग्रिप्पा I च्या काळात घडली असेन, ज्याने ४१-४४ इसवी मध्ये शासन केले होते.
यहूद्यांच्या प्रतिक्रियेने हेरोदाला प्रोत्साहन दिले की असेच मारत राहावे, आणि त्याने पेत्राला अटक केली. हे ते पुरुष होते ज्यांनी ख्रिस्ताचे परिश्रमपूर्वक अनुसरण केले होते, आणि त्याचे राज्य वाढवीत गेले होते. त्यांना मारण्यात आले याकारणासाठी नाही की ते अपराधी होते परंतु सुवार्तेच्या कारणामुळे त्यांना मारण्यात आले होते. हा याकोब होता, जो जब्दीचा पुत्र होता जो देखील योहानाचा भाऊ होता, ज्यास प्रभूने गर्जनेचा पुत्र असे टोपण नाव दिले होते.
४हेरोदाने पेत्राला अटक करुन तुरुंगात टाकले. सोळा शिपाई पेत्राभोवती पहारा देत होते. हेरोदाला वल्हांडण होईपर्यंत थांबायचे होते. मग त्याने पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना केली (प्रेषितांची कृत्ये १२:४)
म्हणून, हेरोदाने, अत्यंत क्रोधाने पेत्राला अटक केली. त्याने केवळ त्यास तुरुंगातच टाकले नाही; त्याने त्यास चार सैनिकांच्या तुकडीकडे त्यास सोपविले की त्यावर नजर ठेवावी म्हणजे इस्टर सण झाल्यावर तो त्याचा उपहास करण्यासाठी बाहेर आणू शकेल. जरी पेत्राने त्याच्या जीवनाचा अधिकतर भाग प्रभूच्या सेवेमध्ये घालविला होता, हेरोद हे समजू शकला नाही. हेरोदाला याची काही पर्वा नव्हती की हा तोच माणूस होता ज्याने एकदा बोलले होते, आणि तीन हजार लोकांचे तारण झाले होते. पेत्राचे कार्य हे पुरेसे नव्हते की त्यास हेरोदाच्या क्रोधापासून वाचवावे. वास्तवात, त्यांनी पेत्राचा अधिक छळ करण्यात योगदान दिले होते. कारण की प्रथम विश्वासणाऱ्यांचा छळ करण्यात आला कारण त्यांनी त्या गोष्टी केल्या होत्या ज्या देशाच्या कायद्याच्या विरोधात होत्या.
येशू प्रमाणे, कायद्याने म्हटले होते की शब्बाथ दिवशी कोणताही चमत्कार करू नये, परंतु त्याने कोणाला तरी पाहिले ज्यास बरे होण्याची गरज होती आणि तो ते करण्यास मागे हटला नाही; यामुळे लोकांना त्याच्या विरोधात राग आला होता. दानीएल साठी, फर्मान होते की कोणत्याही देवाची उपासना करू नये, परंतु दानीएलाने ती आज्ञा पाळली नाही. हेरोद सुवार्ता पसरविण्याच्या विरोधात होता, आणि ते थांबविण्याची त्याची इच्छा होती, त्यामुळेच त्याने विश्वासणाऱ्यांना अत्यंत छळ करण्याद्वारे त्यांजवर हल्ला केला होता.
५म्हणून पेत्राला तुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.(प्रेषितांची कृत्ये १२:५)
जेव्हा पेत्र तुरुंगात होता, मंडळीने त्याच्यासाठी प्रार्थना करणे थांबविले नव्हते. हा तो काळ होता जेव्हा चर्चने मोठा छळ भोगला होता. परंतु तरी देखील, ते एकत्र जमले होते की पेत्रासाठी प्रार्थना करावी. ख्रिस्ताच्या शरीरात, जे एखाद्यावर परिणाम करते, ते सर्वांवर परिणाम करते. प्रारंभीच्या चर्चने हे समजले होते, त्यामुळेच त्याच्या स्वतःच्या कामात व्यस्त राहण्याऐवजी ते एकत्र जमले होते की पेत्रासाठी प्रार्थना करावी.
देवाच्या राज्याचे कार्य हे कोणाही माणसासाठी नाही, आणि तरीही, ते प्रत्येक माणसासाठी आहे. हे असेच आहे, परमेश्वर त्याच्या राज्याच्या वाढीसाठी कोणत्याही माणसावर अवलंबून राहिला नाही, आणि तरीही, तो प्रत्येक माणसावर अवलंबून आहे. प्रत्येक माणूस देवासाठी कार्य करू शकतो परंतु कोणताही माणूस देवासाठी कार्य करू शकत नाही. याचा अर्थ हा आहे की सुवार्ता वाढत जाण्याची जितकी गरज आहे, तसे देव ते कोणत्याही माणसासह करू शकत नाही; तो केवळ त्याच्याबरोबरच कार्य करू शकतो जो उपलब्ध आहे.
६पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. (प्रेषितांची कृत्ये १२:६)
ज्यादिवशी हेरोदाने पेत्राचा उपहास करण्याची योजना केली होती, तो केवळ तेथे दोन बलदंड सैनिकांच्या मध्ये झोपलेला होता आणि तो साखळ्यांनी बांधलेला होता आणि द्वारांवर देखील सैनिकांनी पहारा ठेवला होता. हेरोदाने असे केले होते कारण त्याने विचार केला होता की प्रारंभीचे ख्रिस्ती लोक हे धूर्त आणि हुशार आहेत आणि ते रात्रीचे पेत्राची सुटका करू शकतील. त्याने स्पष्टपणे येशूविषयी ऐकले होते, की परुश्यांनी कशी बातमी आणली होती की येशूचे शरीर कबरेतून चोरून नेले होते. म्हणून, विश्वासणाऱ्यांना तुरुंग तोडून पेत्राला सोडवून घेण्यास रोखण्यासाठी, त्याने जेथे पेत्राला ठेवले होते त्या ठिकाणी योग्यपणे आणि कठोरपणे पहारा ठेवला होता.
पेत्र दोन सैनिकांच्या मध्ये बाळासारखा झोपला होता; त्याचे काय होणार आहे यासाठी तो घाबरला नव्हता, आणि सुवार्तेसाठी तो कार्य करीत होता यासाठी त्याने खेद देखील व्यक्त केला नाही; तो केवळ तेथे पडून होता आणि झोपी गेला होता. पेत्रासाठी, सुवार्तेच्या संबंधात त्याचे जीवन काहीही नव्हते, म्हणून तो मरण पावला किंवा नाही, कोणत्याही गोष्टीने त्यास त्याच्या विश्वासावर ठाम राहण्यास अडवले नाही.
७अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करुन त्याला उठविले. देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. (प्रेषितांची कृत्ये १२:७)
तुरुंगात असताना, आणि इतकी सुरक्षा असताना देखील, पेत्राला तरीही दैवी साहाय्य मिळाले. चर्चची प्रार्थना व्यर्थ झाली नाही. आता, हे लक्षात घ्या की दूताच्या उपस्थितीने पहारेकऱ्यांना उठविले नाही; त्यांनी केवळ पेत्राला उठविले. दूताने बोलले देखील, आणि केवळ पेत्राने त्याचा आवाज ऐकला, आणि ते देखील दोन सैनिकांच्या मध्ये असताना. जेव्हा देवाला माणसाला सोडवावयाचे असते, तेव्हा तो त्यांना संकटांमधून सोडवितो, त्यांच्या संकटाच्या बाहेरून नाही. दानीएल प्रमाणे, देवाने सिंहाच्या गुहेमध्ये हस्तक्षेप केला होता. शद्रख, मेशख व अबेदनगो, देवाने अग्नीच्या मध्य हस्तक्षेप केला होता. याची पर्वा नाही की परिस्थिती किती कठीण अशी दिसते, देव तरीही माणसाला तशा परिस्थतीतून सोडवू शकतो.
८देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल.” मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये!” (प्रेषितांची कृत्ये १२:८)
हे स्पष्टच आहे, की पेत्राचे वस्त्र काढून टाकले होते, म्हणून त्याने वेळ घेतला की त्याचे वस्त्र नेसावे, आणि तरीही त्यावेळी पहारेकऱ्यांना जाग आली नव्हती. आणखी एक गोष्ट जी लक्षात ठेवण्यास योग्य आहे की पेत्राने त्यास दूताने दिलेल्या प्रत्येक सुचनेचे कसे पालन केले होते; त्याने कधीही आक्षेप घेतला नाही. परमेश्वर आपले उत्तमरित्या साहाय्य करू शकतो, जर आपण त्याजवर पूर्णपणे भरवसा ठेवला. पेत्राने कोणतेही प्रश्न विचारले नाही; तो कदाचित मनापासून फारच घाबरला असेन, केवळ झोपेतून जागा होऊन आणि दूताला त्याच्या तुरुंगाच्या खोलीत पाहून. परंतु मग, त्यामुळे त्यास आज्ञा पाळण्यास किंवा शांत राहण्यास त्यागोष्टीने अडवले नाही. परमेश्वर त्याच्या लेकरांना संकटातून काढण्यास तयार आहे, परंतु तो मागणी करतो की तुम्ही त्याजवर भरवसा ठेवावा आणि त्यास जसे पाहिजे तसे त्यास तुम्हाला साहाय्य करू दयावे.
९मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की, देवदूत हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टान्त पाहत आहोत.” (प्रेषितांची कृत्ये १२:९)
पहिल्या प्रथम, काय घडत होते ते पेत्राला खरेच वाटले नाही; त्यास वाटले कदाचित त्यास संभ्रम झाला आहे. माझा म्हणण्याचा अर्थ, की कसे कोणी शेकडो पहारेकऱ्यांमधून चालू शकतो आणि तुरुंगाच्या खोलीत तेथे देखील दोन व्यक्तिगत पहारेकरी आहेत आणि एका माणसाला मुक्त करू शकतात? हे ते काहीतरी नाही जे सामान्य मानवी मन विचार करू शकते? देवाचे आपल्याबरोबर कार्य हे अशा प्रमाणेच आहे; कधी कधी, आपण त्यास समजू शकत नाही आणि आपल्याला हे देखील समजत नाही की तो आपल्याला काही निश्चित गोष्टी करण्यास का सांगत आहे. आपल्याला हे देखील समजत नाही की आपण कोठे जात आहोत जेव्हा तो आपल्याला जाण्यास सांगतो. परंतु मग, जेव्हा देव आपल्याबरोबर कार्य करत आहे, आणि ते विचित्र असे दिसते, तेव्हा त्याचा शेवट हा स्पष्ट होईल, आणि मग आपल्याला हे समजेल की आपण ज्या मार्गाने गेलो त्याद्वारे त्याने आपल्याला का नेले.
१०पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोंचले. शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते. ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. ११पेत्राला मग कळले की नेमके काय घडले. आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत माइयाकडे पाठविला. व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहूदी लोकांना वाटले की, माझा छळ होईल. पण प्रभूने मला या सर्वांतून सोडविले आहे.” (प्रेषितांची कृत्ये १२:१०-११)
म्हणून, मग प्रक्रिया ही पूर्ण झाली, आणि ही ती वेळ होती की त्या प्रक्रियेचा उद्देश पेत्राने समजावा- तो त्यातून का गेला. त्यास एक दृष्टांत म्हणून जे घडले ते आता खरे होते देवाचा हेतू पूर्ण झाला होता. जेव्हा ते दरवाजाजवळ आले, तेव्हा त्यांना द्वारपाळकडून परवानगीची गरज नव्हती की त्यांना तेथून जाऊ दयावे. दरवाजा आपोआप उघडला गेला. पेत्राने निश्चित जाणले की देवाने त्याचा दूत पाठविला की त्यास सोडवावे.
फक्त पेत्राचे ते चित्र काढण्याचा प्रयत्न करा जो देवदूताला प्रश्न विचारत आहे की तो काय करत आहे आणि ते कोठे जात आहेत; तेव्हा सुटण्याचा विचार जो तो करत होता ते त्यास मिळाले नसते. तरीही, जरी जेव्हा तो ते समजू शकला नाही; त्याने केवळ अनुसरण केले, आणि प्रवासाच्या शेवटी, त्याने जाणले की त्याने अनुसरण व्यर्थ केले नाही.
Join our WhatsApp Channel
Chapters