"कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता." (प्रेषित १०:१)
हे वचन स्पष्ट करते की कर्नेल्य कोण होता. पलटण हा सेनेचा एक गट आहे, या गटाला इटलीच्या लोकांनी कैसरीयास पाठविले, आणि कर्नेल्य हा त्या पलटणीचा शताधिपती होता. हा माणूस कैसरीयामध्ये फारच सम्माननीय होता ज्याचे शक्यतो सम्माननीय पुरुष व सरकारी अधिकाऱ्यांबरोबर संबंध होते.
"तो नीतिमान व आपल्या घराण्यांतील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता." (प्रेषित १०:२)
तो असा नावलौकिक असताना देखील, कर्नेल्य हा परमेश्वर व त्याच्या उपासनेशी समर्पित होता. तो स्वतः व त्याचे संपूर्ण घराणे देवाचे भय धरणारे होते. हे मला खात्री देते की तो एक चांगला पुढारी असेन. देवाचे भय बाळगणाऱ्या अशा नावलौकिक असलेल्या माणसाची केवळ कल्पना करा, आणि कैसरीया शहर भौतिक व आध्यात्मिक अशा दोन्हीही दृष्टीने त्याच्या हातात फारच सुरक्षित असे होते.
तो प्रार्थना करणारा माणूस देखील होता. तुमच्या नावलौकिकाने तुम्हांला देवाची सेवा करण्यापासून रोखू नये. तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही काय प्राप्त केलेले आहे याकारणामुळे कधीही या मुद्द्यापर्यंत येऊ नका की आता परमेश्वर हा तुमच्यासाठी काहीही नाही. मागील अनेक वर्षांमध्ये, मी हे पाहिले आहे की असे अनेक लोकांच्या जीवनात घडले आहे ज्यांनी ते जेथे पोहचले होते त्यामुळे विचार केला की त्यांना आता देवाची गरज नाही.
कर्नेल्याने लोकांना दानधर्म केले; हा माणूस लोकांबद्दल प्रामाणिकपणे काळजी करीत होता. तो स्वतःमध्ये गर्वाने भरलेला नव्हता की लोकांची त्यास पर्वा नव्हती. काही लोक गरीब लोकांबद्दल बोलतात परंतु त्यांच्यासाठी व्यवहारिक असे काहीही करीत नाहीत. तुम्ही अधिक लोकांवर प्रभाव पाडू शकतात जेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा प्रतिष्ठित आहात. कमी दर्जाचे हे उच्च दर्जा असणाऱ्यांद्वारे आशीर्वादित केले जातात. आपण आशीर्वादित केले गेले आहोत की आशीर्वाद असे व्हावे.
"त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या, अशी आपणास हाक मारीत आहे." (प्रेषित १०:३)
अगोदरच उल्लेख केलेल्या वचन २ मध्ये सांगितले आहे की तो माणूस दररोज प्रार्थना करीत असे, सहसा त्याचे व्यस्त कार्यक्रम असताना देखील, तरीही त्याचे देवाबरोबर निरंतर संबंध होते. तो इतका आध्यात्मिक होता की तो दृष्टांत स्पष्ट पाहू शकला. आज, जर आपल्याकडे आत्म्याने भरलेले पुढारी असले- तर नेतृत्वाची पद्धत ही अधिक उत्तम अशी होईल, आणि जग देखील एक उत्तम ठिकाण असे होईल. कर्नेल्याचा दृष्टांत एक दूतास प्रगट करतो ज्याने देवाकडून त्यास एक संदेश आणला होता. देवाचे दूत हे त्याचे संदेशवाहक आहेत त्यांना त्या समयासाठी लोकांना देवाचा संदेश सांगण्यास पाठविलेले असते. प्रत्येक विश्वासणाऱ्यांस दूतांची भेट होणार नाही परंतु देव आपल्यामधील त्याचा आत्मा व त्याच्या वचनाने साक्षी द्वारे आपल्यांशी संभाषण करतो.
"तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय, महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत." (प्रेषित १०:४)
भयभीत होण्याद्वारे, कर्नेल्यास माहीत करावयाचे होते की देवाचा दूत त्यास भेटण्यास का आला आहे? त्यास सांगण्यात आले की त्याचे प्रार्थनेचे जीवन व त्याच्या दानधर्मासाठी देवाने त्याचे स्मरण केले आहे कारण ते देवासमोर स्मरणार्थ वर केले गेले आहे (दानधर्म स्मरण करणे). आपली कृत्ये निश्चितच बरेच काही बोलतात, मग ते सध्याचे असो किंवा भविष्यातील असो.
"तर आतां यापोस माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात. तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यास आहे." (प्रेषित १०:५-६)
कर्नेल्यास सांगण्यात आले की पेत्राकडे त्याची माणसे पाठवावी. आता, सुचना ही स्पष्ट होती; हे स्वतः कर्नेल्याने तेथे जाणे नव्हते; हे त्याने तेथे माणसे पाठविणे होते. देवाची योजना ही केवळ कर्नेल्याच्या एकटयासाठी नव्हती परंतु त्याच्या घराण्यासाठी देखील होती. पेत्राची ओळख प्रगट करणे, देवाने पेत्र कोठे राहिला आहे हे त्यांना सांगण्याद्वारे त्यांचे शोध घेणे सोपे केले होते.
"जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले; आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठविले." (प्रेषित १०:७-८)
कर्नेल्य हा मोठे नावलौकिक असलेला माणूस होता, परंतु जेव्हा त्यास पेत्राला बोलाविण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्याने अजिबात संकोच केला नाही. पेत्र हा केवळ एक मासे धरणारा होता जो नंतर येशूचा एक शिष्य झाला होता. कर्नेल्य, हा शताधिपती होता, ज्यास आता पेत्र, एक मासे धरणाऱ्याद्वारे आशीर्वादित केले जाणार होते. जर देवाला तुम्हांला एका माणसाद्वारे आशीर्वादित करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही हा निर्णय करू शकत नाही की कोणत्या माणसाचा उपयोग करावा; तुम्ही केवळ आज्ञा पाळता आणि देवाला ज्या कोणत्याही पात्रा द्वारे जे करण्याची इच्छा आहे ते करू देता.
जर तो निर्णय घेतो की एखादा माणूस किंवा एका साधनाचा देखील उपयोग करावा जे तुमच्या नावलौकिकपेक्षा कमी दर्जाचे असे दिसते, तरीही तुम्ही त्याची आज्ञा पाळली पाहिजे. अलीशाने नामान, जो अरामाचा सेनापति होता त्याला सांगितले, की त्याचे कोड शुद्ध होण्यासाठी यार्देन नदीमध्ये जाऊन डुबकी मार. जर त्याने त्याच्या नावलौकिकामुळे ती आज्ञा पाळण्यास नकार दिला असता, तर त्याचे कोड हे तसेच राहिले असते. तो त्याच्या रोगामधून बरा झाला जेव्हा त्याने त्याच्या गर्वाला बाजूला केले होते आणि स्वतः यार्देन नदीमध्ये डुबकी लावली होती.
"ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत आहेत तो दोन प्रहारच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला." (प्रेषित १०:९)
येशूने त्याच्या शिष्यांना शिकविले की प्रार्थना कशी करावी. त्याने त्यांना सांगितले की निरंतर प्रार्थना करा. आणि पेत्र, हा चर्चचा अगदी सुरुवातीचा प्रमुख म्हणून, त्याने दाखविले पाहिजे होते की एका विश्वासणाऱ्याने प्रार्थना कशी करावी. जरी ते प्रवासात होते, पेत्राने दुपारी वेळ (दुसऱ्या प्रहरी) काढला की प्रार्थना करावी.
"तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यांत त्याचे देहभान सुटले." (प्रेषित १०:१०)
जरी पेत्र हा देवाचा प्रेषित होता, तो त्याचवेळी मानव होता ज्यास कोणत्याही वेळी भूक लागू शकत होती. असेही दिवस होते जेव्हा त्याने उपास केला होता. जेव्हा त्यास भूक लागली तेव्हा पेत्राला तंद्री आली आणि तो झोपी गेला. कधी कधी देव आपल्या विश्रांतीच्या वेळेचा उपयोग करतो की आपल्याशी बोलावे. आपली मने जेव्हा पूर्णपणे शांत आहेत तेव्हा आपण उत्तमरित्या ऐकू शकतो.
"तेव्हा आकाश उघडलेले व मोठया चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्याला झाला; त्यांत पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशांतील पाखरे होती." (प्रेषित १०:११-१२)
पूर्वीच्या दिवसांत, दृष्टांत हे मुख्य मार्ग होते ज्याद्वारे देव त्याच्या लोकांबरोबर बोलला होता. देवाने पेत्राशी त्याचे देहभान सुटले होते तेव्हा बोलले. तंद्रीत जाणे हे केवळ शामान आणि नवीन युगातील लोकांचे कार्यक्षेत्र नाही.
नोहा वेब्स्टरची १८२८ ची डिक्शनरी तंद्रीत जाण्याची अशी व्याख्या करते: "परमानंद, एक अवस्था ज्यामध्ये आत्मा हा शरीरातून स्वर्गीय क्षेत्रात प्रवास करताना दिसतो, किंवा दृष्टांतामध्ये रमून जाणे होय." तंद्रीत जाणे ही कोणाची अवस्था आहे जो, "स्वतःपेक्षा वेगळा" असा झालेला दिसतो, हे इस्टर्न बायबल डिक्शनरीनुसार आहे. शब्द एक्स्टसी हा हेल्लेणी शब्द "एक्स्टासीस" पासून आला आहे, ज्यावरू शब्द एक्स्टसी आला आहे.
"मग त्याने अशी वाणी ऐकली की, पेत्रा, ऊठ; मारून खा." (प्रेषित १०:१३)
आता, पेत्राने केवळ पाहिले नाही, तर त्याने ऐकले देखील. तंद्री हे सामान्यपणे समजले जात नाही जर त्यानंतर त्याचे काहीही शाब्दिक स्पष्टीकरण नाही. म्हणजे, जर पेत्राने केवळ त्या गोष्टी पाहिल्या असत्या, आणि त्या ऐकल्या नसत्या, तर हे समजणे त्याच्यासाठी कठीण झाले असते की आकाशातून अशी गोष्ट का खाली यावी. जेव्हा आपले आध्यात्मिक डोळे उघडले जातात, आणि आपण त्या गोष्टी पाहतो ज्या आपण समजत नाहीत, हे आवश्यक आहे की आपण देखील ऐकण्याच्या क्षमतेसाठी प्रार्थना केली पाहिजे. जे पाहिले ते देखील समजल्याशिवाय पाहणे हे पूर्ण झालेले नसते. पेत्राने आकाशातून या अशुद्ध गोष्टी केवळ उतरतांना पाहिल्या नाहीत; तर त्या खाण्यास देखील त्यास सांगण्यात आले, ते त्याच्यासाठी त्यावेळेस फारच कठीण होते.
"पेत्र म्हणाला, नको, नको, प्रभु; कारण निषिद्ध आणि शुद्ध असे कांही मी कधीही खाल्ले नाही." (प्रेषित १०:१४)
म्हणजे, पेत्राला या अशुद्ध गोष्टी खाण्यास सांगण्यात आले, आणि मग त्याने नकार दिला कारण त्याने कधीही काहीही अशुद्ध खाल्ले नव्हते. आता, देवाने पेत्राला त्या गोष्टी खाण्यास सांगण्याअगोदर, त्यास निश्चितपणे हे ठाऊक होते की त्या अशुद्ध आहेत. कधी कधी, देवाची इच्छा असते की आपण काहीतरी निराळे असे करावे, हे याकारणासाठी नाही की तो आपल्याला काय करण्यास सांगत आहे त्याच्या परिणामापासून तो अनभिज्ञ असा आहे, परंतु येथे काही गोष्टी आहेत ज्यापासून आपण शिकावे अशी त्याची इच्छा असते. देव तुम्हांला जे करण्याची इच्छा आहे तेच नेहमी करण्यास सांगणार नाही परंतु जे काही तो तुम्हांला करण्यास सांगतो त्याचीच तुम्हाला गरज असते. म्हणून, जेव्हा तुमची इच्छा देवाच्या इच्छेविरुद्ध जाते, तेव्हा हा सल्ला आहे की तुम्ही तुमची इच्छा सोडून दयावी आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास पाहावे हेच तर देवाचा उद्देश पूर्ण करणे आहे.
"मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की, देवाने जे शुद्ध केले आहे तें तूं निषिद्ध मानू नको." (प्रेषित १०:१५)
पेत्राने त्या गोष्टींना अशुद्ध म्हटले, परंतु याचा विचार करून की ते देवाकडून आले आहेत, त्यांना तरीही अशुद्ध म्हटले जायला पाहिजे काय? जे काही देवापासून येते ते चांगले आणि पवित्र आहे, मग याची पर्वा नाही की ते काय आहे. आणि देव आपल्याला ते देत नाही जे त्याने शुद्ध केलेले नाही. पण जरी जेव्हा तो आपल्याला अशुद्ध गोष्टी देतो, त्याची इच्छा असते की त्यास आपल्याद्वारे शुद्ध करावे. मुद्दा हा आहे: देवाबरोबर काहीही तसेच राहत नाही.
"असे तीन वेळा झाले आणि लागलेच तें पात्र आकाशांत वर घेतले गेले." (प्रेषित १०:१६)
हा दृष्टांत इतका महत्वाचा होता की ते तीन वेळा पुन्हा केले होते. देव निरनिराळे दृष्टीकोन वापरतो करतो की आपण त्याची इच्छा समजावी. पेत्राला प्रत्यक्षात ते कारण समजले पाहिजे होते की त्यास हा दृष्टांत का दाखविला गेला आहे. हे मग पुढे काय होणार आहे त्यासाठी उत्तमरीत्या तयारी करण्यास त्यास साहाय्य करील. तिसऱ्या वेळेनंतर, त्या वस्तूला परत घेण्यात आले कारण देवाची खात्री झाली होती की त्याने पेत्राला ते दाखविले होते जे त्याने पाहावे अशी त्याची इच्छा होती. पुढील कार्याचे कृत्य प्रगट करील की पेत्र हा त्याच्या स्वतःच्या विश्वासावर ठाम राहील किंवा देवाचे भय धरील आणि आज्ञा पाळील. जरी जेव्हा देव आपल्यावर त्याची इच्छा पूर्ण होण्यास जोर देतो, तरी ते कृतीत आणण्यास तो आपणांवर दबाव आणीत नाही, परंतु आपण त्याची आज्ञा पाळावी याची तो निश्चितच अपेक्षा करतो.
हे वचन स्पष्ट करते की कर्नेल्य कोण होता. पलटण हा सेनेचा एक गट आहे, या गटाला इटलीच्या लोकांनी कैसरीयास पाठविले, आणि कर्नेल्य हा त्या पलटणीचा शताधिपती होता. हा माणूस कैसरीयामध्ये फारच सम्माननीय होता ज्याचे शक्यतो सम्माननीय पुरुष व सरकारी अधिकाऱ्यांबरोबर संबंध होते.
"तो नीतिमान व आपल्या घराण्यांतील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता." (प्रेषित १०:२)
तो असा नावलौकिक असताना देखील, कर्नेल्य हा परमेश्वर व त्याच्या उपासनेशी समर्पित होता. तो स्वतः व त्याचे संपूर्ण घराणे देवाचे भय धरणारे होते. हे मला खात्री देते की तो एक चांगला पुढारी असेन. देवाचे भय बाळगणाऱ्या अशा नावलौकिक असलेल्या माणसाची केवळ कल्पना करा, आणि कैसरीया शहर भौतिक व आध्यात्मिक अशा दोन्हीही दृष्टीने त्याच्या हातात फारच सुरक्षित असे होते.
तो प्रार्थना करणारा माणूस देखील होता. तुमच्या नावलौकिकाने तुम्हांला देवाची सेवा करण्यापासून रोखू नये. तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही काय प्राप्त केलेले आहे याकारणामुळे कधीही या मुद्द्यापर्यंत येऊ नका की आता परमेश्वर हा तुमच्यासाठी काहीही नाही. मागील अनेक वर्षांमध्ये, मी हे पाहिले आहे की असे अनेक लोकांच्या जीवनात घडले आहे ज्यांनी ते जेथे पोहचले होते त्यामुळे विचार केला की त्यांना आता देवाची गरज नाही.
कर्नेल्याने लोकांना दानधर्म केले; हा माणूस लोकांबद्दल प्रामाणिकपणे काळजी करीत होता. तो स्वतःमध्ये गर्वाने भरलेला नव्हता की लोकांची त्यास पर्वा नव्हती. काही लोक गरीब लोकांबद्दल बोलतात परंतु त्यांच्यासाठी व्यवहारिक असे काहीही करीत नाहीत. तुम्ही अधिक लोकांवर प्रभाव पाडू शकतात जेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा प्रतिष्ठित आहात. कमी दर्जाचे हे उच्च दर्जा असणाऱ्यांद्वारे आशीर्वादित केले जातात. आपण आशीर्वादित केले गेले आहोत की आशीर्वाद असे व्हावे.
"त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या, अशी आपणास हाक मारीत आहे." (प्रेषित १०:३)
अगोदरच उल्लेख केलेल्या वचन २ मध्ये सांगितले आहे की तो माणूस दररोज प्रार्थना करीत असे, सहसा त्याचे व्यस्त कार्यक्रम असताना देखील, तरीही त्याचे देवाबरोबर निरंतर संबंध होते. तो इतका आध्यात्मिक होता की तो दृष्टांत स्पष्ट पाहू शकला. आज, जर आपल्याकडे आत्म्याने भरलेले पुढारी असले- तर नेतृत्वाची पद्धत ही अधिक उत्तम अशी होईल, आणि जग देखील एक उत्तम ठिकाण असे होईल. कर्नेल्याचा दृष्टांत एक दूतास प्रगट करतो ज्याने देवाकडून त्यास एक संदेश आणला होता. देवाचे दूत हे त्याचे संदेशवाहक आहेत त्यांना त्या समयासाठी लोकांना देवाचा संदेश सांगण्यास पाठविलेले असते. प्रत्येक विश्वासणाऱ्यांस दूतांची भेट होणार नाही परंतु देव आपल्यामधील त्याचा आत्मा व त्याच्या वचनाने साक्षी द्वारे आपल्यांशी संभाषण करतो.
"तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय, महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत." (प्रेषित १०:४)
भयभीत होण्याद्वारे, कर्नेल्यास माहीत करावयाचे होते की देवाचा दूत त्यास भेटण्यास का आला आहे? त्यास सांगण्यात आले की त्याचे प्रार्थनेचे जीवन व त्याच्या दानधर्मासाठी देवाने त्याचे स्मरण केले आहे कारण ते देवासमोर स्मरणार्थ वर केले गेले आहे (दानधर्म स्मरण करणे). आपली कृत्ये निश्चितच बरेच काही बोलतात, मग ते सध्याचे असो किंवा भविष्यातील असो.
"तर आतां यापोस माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात. तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यास आहे." (प्रेषित १०:५-६)
कर्नेल्यास सांगण्यात आले की पेत्राकडे त्याची माणसे पाठवावी. आता, सुचना ही स्पष्ट होती; हे स्वतः कर्नेल्याने तेथे जाणे नव्हते; हे त्याने तेथे माणसे पाठविणे होते. देवाची योजना ही केवळ कर्नेल्याच्या एकटयासाठी नव्हती परंतु त्याच्या घराण्यासाठी देखील होती. पेत्राची ओळख प्रगट करणे, देवाने पेत्र कोठे राहिला आहे हे त्यांना सांगण्याद्वारे त्यांचे शोध घेणे सोपे केले होते.
"जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले; आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठविले." (प्रेषित १०:७-८)
कर्नेल्य हा मोठे नावलौकिक असलेला माणूस होता, परंतु जेव्हा त्यास पेत्राला बोलाविण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्याने अजिबात संकोच केला नाही. पेत्र हा केवळ एक मासे धरणारा होता जो नंतर येशूचा एक शिष्य झाला होता. कर्नेल्य, हा शताधिपती होता, ज्यास आता पेत्र, एक मासे धरणाऱ्याद्वारे आशीर्वादित केले जाणार होते. जर देवाला तुम्हांला एका माणसाद्वारे आशीर्वादित करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही हा निर्णय करू शकत नाही की कोणत्या माणसाचा उपयोग करावा; तुम्ही केवळ आज्ञा पाळता आणि देवाला ज्या कोणत्याही पात्रा द्वारे जे करण्याची इच्छा आहे ते करू देता.
जर तो निर्णय घेतो की एखादा माणूस किंवा एका साधनाचा देखील उपयोग करावा जे तुमच्या नावलौकिकपेक्षा कमी दर्जाचे असे दिसते, तरीही तुम्ही त्याची आज्ञा पाळली पाहिजे. अलीशाने नामान, जो अरामाचा सेनापति होता त्याला सांगितले, की त्याचे कोड शुद्ध होण्यासाठी यार्देन नदीमध्ये जाऊन डुबकी मार. जर त्याने त्याच्या नावलौकिकामुळे ती आज्ञा पाळण्यास नकार दिला असता, तर त्याचे कोड हे तसेच राहिले असते. तो त्याच्या रोगामधून बरा झाला जेव्हा त्याने त्याच्या गर्वाला बाजूला केले होते आणि स्वतः यार्देन नदीमध्ये डुबकी लावली होती.
"ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत आहेत तो दोन प्रहारच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला." (प्रेषित १०:९)
येशूने त्याच्या शिष्यांना शिकविले की प्रार्थना कशी करावी. त्याने त्यांना सांगितले की निरंतर प्रार्थना करा. आणि पेत्र, हा चर्चचा अगदी सुरुवातीचा प्रमुख म्हणून, त्याने दाखविले पाहिजे होते की एका विश्वासणाऱ्याने प्रार्थना कशी करावी. जरी ते प्रवासात होते, पेत्राने दुपारी वेळ (दुसऱ्या प्रहरी) काढला की प्रार्थना करावी.
"तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यांत त्याचे देहभान सुटले." (प्रेषित १०:१०)
जरी पेत्र हा देवाचा प्रेषित होता, तो त्याचवेळी मानव होता ज्यास कोणत्याही वेळी भूक लागू शकत होती. असेही दिवस होते जेव्हा त्याने उपास केला होता. जेव्हा त्यास भूक लागली तेव्हा पेत्राला तंद्री आली आणि तो झोपी गेला. कधी कधी देव आपल्या विश्रांतीच्या वेळेचा उपयोग करतो की आपल्याशी बोलावे. आपली मने जेव्हा पूर्णपणे शांत आहेत तेव्हा आपण उत्तमरित्या ऐकू शकतो.
"तेव्हा आकाश उघडलेले व मोठया चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्याला झाला; त्यांत पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशांतील पाखरे होती." (प्रेषित १०:११-१२)
पूर्वीच्या दिवसांत, दृष्टांत हे मुख्य मार्ग होते ज्याद्वारे देव त्याच्या लोकांबरोबर बोलला होता. देवाने पेत्राशी त्याचे देहभान सुटले होते तेव्हा बोलले. तंद्रीत जाणे हे केवळ शामान आणि नवीन युगातील लोकांचे कार्यक्षेत्र नाही.
नोहा वेब्स्टरची १८२८ ची डिक्शनरी तंद्रीत जाण्याची अशी व्याख्या करते: "परमानंद, एक अवस्था ज्यामध्ये आत्मा हा शरीरातून स्वर्गीय क्षेत्रात प्रवास करताना दिसतो, किंवा दृष्टांतामध्ये रमून जाणे होय." तंद्रीत जाणे ही कोणाची अवस्था आहे जो, "स्वतःपेक्षा वेगळा" असा झालेला दिसतो, हे इस्टर्न बायबल डिक्शनरीनुसार आहे. शब्द एक्स्टसी हा हेल्लेणी शब्द "एक्स्टासीस" पासून आला आहे, ज्यावरू शब्द एक्स्टसी आला आहे.
"मग त्याने अशी वाणी ऐकली की, पेत्रा, ऊठ; मारून खा." (प्रेषित १०:१३)
आता, पेत्राने केवळ पाहिले नाही, तर त्याने ऐकले देखील. तंद्री हे सामान्यपणे समजले जात नाही जर त्यानंतर त्याचे काहीही शाब्दिक स्पष्टीकरण नाही. म्हणजे, जर पेत्राने केवळ त्या गोष्टी पाहिल्या असत्या, आणि त्या ऐकल्या नसत्या, तर हे समजणे त्याच्यासाठी कठीण झाले असते की आकाशातून अशी गोष्ट का खाली यावी. जेव्हा आपले आध्यात्मिक डोळे उघडले जातात, आणि आपण त्या गोष्टी पाहतो ज्या आपण समजत नाहीत, हे आवश्यक आहे की आपण देखील ऐकण्याच्या क्षमतेसाठी प्रार्थना केली पाहिजे. जे पाहिले ते देखील समजल्याशिवाय पाहणे हे पूर्ण झालेले नसते. पेत्राने आकाशातून या अशुद्ध गोष्टी केवळ उतरतांना पाहिल्या नाहीत; तर त्या खाण्यास देखील त्यास सांगण्यात आले, ते त्याच्यासाठी त्यावेळेस फारच कठीण होते.
"पेत्र म्हणाला, नको, नको, प्रभु; कारण निषिद्ध आणि शुद्ध असे कांही मी कधीही खाल्ले नाही." (प्रेषित १०:१४)
म्हणजे, पेत्राला या अशुद्ध गोष्टी खाण्यास सांगण्यात आले, आणि मग त्याने नकार दिला कारण त्याने कधीही काहीही अशुद्ध खाल्ले नव्हते. आता, देवाने पेत्राला त्या गोष्टी खाण्यास सांगण्याअगोदर, त्यास निश्चितपणे हे ठाऊक होते की त्या अशुद्ध आहेत. कधी कधी, देवाची इच्छा असते की आपण काहीतरी निराळे असे करावे, हे याकारणासाठी नाही की तो आपल्याला काय करण्यास सांगत आहे त्याच्या परिणामापासून तो अनभिज्ञ असा आहे, परंतु येथे काही गोष्टी आहेत ज्यापासून आपण शिकावे अशी त्याची इच्छा असते. देव तुम्हांला जे करण्याची इच्छा आहे तेच नेहमी करण्यास सांगणार नाही परंतु जे काही तो तुम्हांला करण्यास सांगतो त्याचीच तुम्हाला गरज असते. म्हणून, जेव्हा तुमची इच्छा देवाच्या इच्छेविरुद्ध जाते, तेव्हा हा सल्ला आहे की तुम्ही तुमची इच्छा सोडून दयावी आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास पाहावे हेच तर देवाचा उद्देश पूर्ण करणे आहे.
"मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की, देवाने जे शुद्ध केले आहे तें तूं निषिद्ध मानू नको." (प्रेषित १०:१५)
पेत्राने त्या गोष्टींना अशुद्ध म्हटले, परंतु याचा विचार करून की ते देवाकडून आले आहेत, त्यांना तरीही अशुद्ध म्हटले जायला पाहिजे काय? जे काही देवापासून येते ते चांगले आणि पवित्र आहे, मग याची पर्वा नाही की ते काय आहे. आणि देव आपल्याला ते देत नाही जे त्याने शुद्ध केलेले नाही. पण जरी जेव्हा तो आपल्याला अशुद्ध गोष्टी देतो, त्याची इच्छा असते की त्यास आपल्याद्वारे शुद्ध करावे. मुद्दा हा आहे: देवाबरोबर काहीही तसेच राहत नाही.
"असे तीन वेळा झाले आणि लागलेच तें पात्र आकाशांत वर घेतले गेले." (प्रेषित १०:१६)
हा दृष्टांत इतका महत्वाचा होता की ते तीन वेळा पुन्हा केले होते. देव निरनिराळे दृष्टीकोन वापरतो करतो की आपण त्याची इच्छा समजावी. पेत्राला प्रत्यक्षात ते कारण समजले पाहिजे होते की त्यास हा दृष्टांत का दाखविला गेला आहे. हे मग पुढे काय होणार आहे त्यासाठी उत्तमरीत्या तयारी करण्यास त्यास साहाय्य करील. तिसऱ्या वेळेनंतर, त्या वस्तूला परत घेण्यात आले कारण देवाची खात्री झाली होती की त्याने पेत्राला ते दाखविले होते जे त्याने पाहावे अशी त्याची इच्छा होती. पुढील कार्याचे कृत्य प्रगट करील की पेत्र हा त्याच्या स्वतःच्या विश्वासावर ठाम राहील किंवा देवाचे भय धरील आणि आज्ञा पाळील. जरी जेव्हा देव आपल्यावर त्याची इच्छा पूर्ण होण्यास जोर देतो, तरी ते कृतीत आणण्यास तो आपणांवर दबाव आणीत नाही, परंतु आपण त्याची आज्ञा पाळावी याची तो निश्चितच अपेक्षा करतो.
Chapters