यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्त्रीकार केला आहे हे यहूदा प्रांतातील प्रेषितांनी व बंधुंनी ऐकले (प्रेषितांची कृत्ये ११:१)
परराष्ट्रीयांचे धर्मांतर, ज्यास, यहूदी, तसेच विश्वास ठेवणाऱ्या यहूद्यांनी त्यांना त्यांच्या संगतीमध्ये राहण्यासाठी अशुद्ध व अयोग्य असे गणले, ती खरेच एक मोठी बातमी होती. म्हणून ती फार वेगाने पसरली, एकतर चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी. परंतु ती यरुशलेम येथील मंडळीमध्ये (प्रेषित व बंधुजनात) त्वरित पसरली. हे आश्चर्यकारक नाही; कैसरीया, जेथे ही घटना घडली, ते यरुशलेमेच्या जवळ आहे.
लक्षात घ्या की बातमी जी परराष्ट्रीयांनी प्राप्त केली ती "देवाचे वचन" होती. केवळ देवाच्या वचनाचा भाग नाही तर सुवार्ता होती, ज्यामध्ये देवाच्या वचनांचा सारांश होता. तसेच याकडे देखील लक्ष दया की देवाच्या वचनास फक्त संदेशापेक्षा अधिक, परंतु ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व असे संबोधले गेले आहे.
या बातमीने कशाला अधिक असामान्य असे केले याचा विचार करा. परराष्ट्रीयांबरोबर संभाषण करणे हे यहूद्यांसाठी नियमाचे उल्लंघन करणे असे समजले जात असे, परंतु आता ख्रिस्ताची पवित्र सुवार्ता, जी केवळ यहूद्यांसाठीच आहे असा विचार केला जात होता, ती त्यांच्यापर्यंत पोहचली होती. स्पष्टपणे, शिष्य हे पूर्णपणे समजले नव्हते की ख्रिस्ताच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे जेव्हा त्याने संपूर्ण जगाला सुवार्ता प्रचार करण्यास सांगितले होते.
२पण जेव्हा पेत्र यरुशलेमला आला, तेव्हा काही यहूदी विश्वासणाऱ्यांनी त्याच्याशी वाद घातला.३ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व यहूदीतर आहेत अशा लोकांच्या घरी तुम्ही गेला, एकढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले!” (प्रेषितांची कृत्ये ११:२-३)
येथे आपण पाहतो की विश्वास ठेवणारे यहूदी परराष्ट्रीयांबद्दल या महान बातमी द्वारे अपमानित झाले होते. त्यांना "सुंता झालेले" असे संबोधले जात होते, कारण ते ख्रिस्ती यहूदी होते जे अजूनही सुंतेला मोठा मान देत असत. म्हणून त्यांनी पेत्राचे परराष्ट्रीयांबरोबरच्या (सुंता न झालेले) संबंधाला अपराध असे पाहिले. म्हणून परराष्ट्रीयांबरोबर खाणे व पिणे करण्याबद्दल त्यांनी त्यास दोष लावला आणि तो दूषित झाला आहे असे मानले. यहूद्यांनी पेत्राला प्रश्न केला, हा विश्वास ठेवून की त्याने प्रेषित म्हणून त्याच्या प्रतिष्ठेचा अनादर केला आहे आणि त्याची मंडळीच्या शिस्तबद्धतेच्या नियमाअंतर्गत कारवाई केली पाहिजे.
हे दाखविते की विश्वासाची मक्तेदारी करण्याद्वारे आणि ते जे देवाच्या कृपेपासून त्यांच्याहून भिन्न आहेत त्यांना वगळण्याद्वारे विश्वासणाऱ्यांनी कशा चुका केल्या आहेत. तसेच, वरील वचनावरून, आपण हे शिकलो की सुवार्तेचे प्रचारक हे कानउघाडणी करण्याच्या वरचढ नसावे. त्यांनी यास सामान्य गोष्ट असे पाहिले पाहिजे ज्यास आव्हाहन दिले जाऊ शकते, केवळ तेव्हाच नाही की जेव्हा ते चुका करतात. परंतु देवाची आज्ञा प्रामाणिकपणे मनापासून पाळण्यामध्ये देखील असावे.
४म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना स्पष्ट करुन सांगितल्या.५ पेत्र म्हणाला, “मी यापो शहरात होतो. प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टान्त घडला. मी दृष्टान्तामध्ये आकाशातून काही तरी खाली येताना पाहिले. ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते. व त्याचे चारही कोपरे धरुन ते खाली सोडले जात होते. ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले. (प्रेषितांची कृत्ये११: ४-५)
ही वचने पेत्राच्या वृत्तांताची सुरुवात दाखवितात की परराष्ट्रीयांबरोबर त्याने संबंध का केले आणि त्यांनी देवाचे वचन का प्राप्त केले. हे लक्षात घ्या की त्याने वादविवाद किंवा क्षमा मागण्याचा, किंवा त्यांना खुश करावे किंवा स्वतःला न्यायी ठरविण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी, त्याने संपूर्ण विषयाला सुरुवातीपासून सांगण्याचा प्रयत्न केला जशा घटना घडत गेल्या म्हणजे ते स्वतःच स्वतःचा न्याय करू शकतील जर त्याने काही चूक केली असेन.
लक्षात घ्या की पेत्राने यहूद्यांच्या मताविषयी काळजी केली, त्यामुळे मुख्य प्रेषित म्हणून वर्चस्व दाखविण्याऐवजी तो त्यांच्या अधीन झाला. तो स्वतःच न्यायी आहे असा तो दावा करू शकला असता कारण त्याने देवाची आज्ञा पाळली होती. तथापि, त्याची इच्छा होती की यहूद्यांनी त्याच्या कृत्यास खऱ्या प्रकाशात पाहावे आणि हे समजावे की परराष्ट्रीयांसंबंधी त्यास ही नवीन आशा का होती आणि त्याने त्याच्या पूर्वीच्या विश्वासाला का सोडले होते.
त्याच्या समर्थनात, तो हे प्रगट करीत सुरु करतो की त्याचे कृत्य हे देवाकडील सूचनेमुळे झाले आहे ज्याने त्यास एक दृष्टांत दिला होता. मोठी चादर जी स्वर्गातून खाली आली आणि पेत्राकडे आली होती हे दाखविते की हे गौरवी प्रदर्शन स्वर्गाकडून होते आणि त्याने पेत्राला व्यक्तिगतरित्या उपदेश दिला होता.
६मी त्याच्या आतमध्ये पाहिले. मी त्यात पाळीव आणि जंगली प्राणी पाहीले. सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी मी त्यात पाहिले. ७ एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. ‘पेत्रा, ऊठ, यातील कोणताही प्राणी मार व खा!’ ८“पण मी म्हणालो, ‘प्रभु, मी असे कधीही करणार नाही. मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.’ (प्रेषितांची कृत्ये ११ : ६- ८)
आपण पाहतो की जेव्हा मोठी चादर खाली आली होती, "पेत्राने त्याजकडे निरखून पाहिले आणि त्यावर विचार केला होता. अशा प्रकारे, जेव्हा देव दैवी ज्ञान आपल्यासाठी उघड करतो, तेव्हा आपण आपल्या मनाने प्रकटीकरणाच्या सविस्तर गोष्टींवर केंद्रित होणे व त्यावर मनन केले पाहिजे. पेत्र त्या मोठया चादरीमध्ये असलेल्या गोष्टींबद्दल आणि पक्षपात न करता सर्व प्रकारचे मांस खावे याची आज्ञा जी त्याने प्राप्त केली आहे त्याबद्दल प्रगट करतो. त्याने त्यास दिलेले स्वातंत्र्य नाकारल्याचेही बोलतो कारण तो सुद्धा यहूद्यांसारखा तोच विश्वास धरत होता. परराष्ट्रीयांबरोबर संगती करणे आणि ते जे खातात ते खाण्याच्या विचारांना त्याने घृणित मानले होते.
९"मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, 'देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. १०"आणि असे तीनदा झाले आणि मग सर्व काही आकाशात वर घेतले गेले.
या वचनात, पेत्र याचे स्मरण करतो की स्वर्गातून वाणीने त्यास कसा आदेश दिला की येथे आता नवीन व्यवस्था आहे. त्याने आतापासून परराष्ट्रीयांना व त्यांच्या मांसाच्या भोजनास असामान्य व त्यांच्या संगतीला अयोग्य असे बोलू नये कारण देवाने लोकांना व गोष्टींना शुद्ध केले आहे जे कधी काळी दुषित होते. म्हणून, त्याने त्यांना त्याच्या मतामधील बदलाचे कारण दाखविले; देवाने वस्तूंच्या व्यवस्थेमध्ये बदल केला आहे.
वचन १० मध्ये, पेत्र त्या प्रकटीकरणास सांगतो (आज्ञा की मारावे आणि खावे, आणि या स्वातंत्र्यासाठी कारण, की त्या गोष्टी देवाने शुद्ध केल्या आहेत ज्या कधी काळी दूषित होत्या.) जे दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी बोलले गेले होते. त्याने त्यांना हे देखील सांगितले की ती मोठी चादर व त्यातील वस्तू अदृश्य झाल्या नाहीत परंतु, पुन्हा एकदा "वर आकाशात घेतल्या गेल्या", जे निश्चित करते की तो दृष्टांत हा स्वर्गातून होता.(प्रेषितांची कृत्ये ११:९-१०)
११तेवढयात तीन माणसे मी ज्या घरामध्ये राहत होतो, तेथे आली. कैसरीया शहरातून या तीन माणसांना माझ्याकडे पाठविण्यात आले होते. १२आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले. हे सहा बंधु (विश्वासणारे) जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते. आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो. (प्रेषितांची कृत्ये ११:११-१२)
या वचनांमध्ये, तो यहूद्यांना हे प्रगट करतो की त्यास देवाच्या आत्म्याने आज्ञा दिली आहे की कर्नेल्याने पाठविलेल्या संदेशवाहकांबरोबर जावे. संदेशवाहक आल्याच्या वेळेकडे तो त्यांचे लक्ष वेधतो की त्यांना दाखवावे की दृष्टांत हा त्यास तयार करण्याचा देवाचा मार्ग होता की त्यांच्याबरोबर जावे. तो हे सुद्धा उघड करतो की पवित्र आत्म्याच्या सांगण्यावर शंका घेऊ नये. का? कारण तो ज्या मनुष्यांबरोबर गेला आणि ज्या मनुष्यांकडे गेला ते परराष्ट्रीय होते, त्यामुळे कोणत्याही प्रबळ विश्वासाशिवाय, शंका घेण्याचा मोह हा मोठा असू शकला असता. पेत्राने मग त्याच्याबरोबर सुंता झालेल्या सहा मनुष्यांना साक्षीदार म्हणून घेण्याद्वारे त्यांना त्याची सावधगिरी दाखविली. आणि पेत्राने त्याच्याबरोबर त्या मनुष्यांना यापोहून आणले होते की त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवावा.
१३कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले. देवदूत कर्नेल्याला म्हणाला, ‘काही माणसे यापोस पाठव. शिमोन पेत्राला बोलावून घे. १४तो तुझ्याशी बोलेल. तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.’ (प्रेषितांची कृत्ये ११:१३-१४)
पेत्राने त्यांना सांगितले की कर्नेल्यास देखील कसा दृष्टांत झाला होता ज्यामध्ये त्यास पेत्राला आणण्यास सुचना देण्यात आली होती. परिणामस्वरूप, पेत्राच्या दृष्टांताने कर्नेल्याच्या दृष्टांतास निश्चित केले, आणि कर्नेल्याच्या दृष्टांताने पेत्राच्या दृष्टांतास निश्चित मानले. हया उघड निश्चितीने पेत्रापेक्षा यहूद्यांना दाखविले की देवाच्या आज्ञा पाळाव्या.
या वचनांमध्ये, आपण हे पाहतो की कर्नेल्याला देवदूताच्या सूचनेचे अधिक सविस्तर वर्णन आहे. अध्याय १०:६, ३२ मध्ये, असे लिहिले होते, "पेत्राला बोलाविण्यासाठी माणसे पाठिव....तो आल्यावर तुम्हांला सांगेल की तुम्ही काय केले पाहिजे." परंतु येथे आपण पाहतो, "तो तुम्हांला ते वचन सांगेल ज्याद्वारे तू व तुझ्या घराण्याचे तारण होईल!" ह्या घटनांपूर्वी, तारण हे केवळ यहूद्यांसाठीच होते, परंतु कर्नेल्याद्वारे, तारण हे परराष्ट्रीयांपर्यंत त्याप्रमाणेच आले आहे ज्याप्रमाणे ते यहूद्यांपर्यंत पोहचले होते.
१५“त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.१६तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभु म्हणाला होता, ‘योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे. पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल!’(प्रेषितांची कृत्ये ११:१५-१६)
येथे आपण त्या घटना पाहतो जे सर्व वादविवाद आणि चर्चेला संपविते. पेत्र यहूद्यांना सांगतो की त्याच्या परराष्ट्रीय प्रेक्षकांवर पवित्र आत्मा एक प्रमाण म्हणून कसा उतरला की ही देवाची इच्छा होती की परराष्ट्रीयांना संतांच्या वारशामध्ये सामावून घ्यावे. सत्य निर्विवाद आहे; पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्यांना काय घडले होते –प्रारंभ ज्यास पेत्राने संबोधले –तेच परराष्ट्रीयांच्या बाबतीत देखील घडले.
प्रेषित १:५ मधील येशूच्या निरोपाचे शब्द त्याने कसे स्मरण केले हे पेत्राने सांगितले. हे विश्वासणाऱ्यांसाठी हे प्रतीकात्मक असे होते कारण ते यावर जोर देत होते पवित्र आत्मा हा ख्रिस्ताचे बक्षीस आहे आणि त्याने त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्णता आहे. त्यामुळे, हा तो ख्रिस्त होता ज्याने परराष्ट्रीयांना पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा दिला व भरले होते.
१७आपण येशू रिव्रस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. मग देवाचे काम मी कसा थांबवू शकत होतो?”
१८जेव्हा यहूदी विश्वासणाऱ्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांनी आपले म्हणणे थांबविले, त्यांनी देवाची स्तति केली आणि म्हणाले. “म्हणजे देव यहूदी नसलेल्यांना त्यांचे अंतःकरण बदलण्यासाठी मोकळीक देत आहे आणि आम्हांला जसे जीवन प्राप्त झाले तसे त्यांनाही देऊ इच्छीत आहे.”(प्रेषितांची कृत्ये ११:१७-१८)
येथे, पेत्र प्रगट करतो की जेव्हा त्याच्याकडे इतका अविश्वसनीय पुरावा होता की देवाची कृपा ही परराष्ट्रीयांकडे आली आहे, तेव्हा तो त्यांच्या परिवर्तनास अडथळा करू शकला नाही किंवा त्यांना पाण्याने बाप्तिस्मा घेण्यापासून रोखू शकला नाही. त्याच्या परिणामाने, त्याने विचारले, "तर परराष्ट्रीयांना रोखणारा मी कोण ज्यास देवाने त्याच्या आत्म्याने बाप्तिस्मा दिला आहे, त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा का होऊ नये?" "मी त्यांना परिवर्तनाच्या चिन्हासाठी कसा नकार करू शकतो जेव्हा जे पाण्याने बाप्तिस्मा करण्याद्वारे चिन्हित होते ते त्याजवर आले आहे?" "देवाला अडवणारा मी कोण आणि त्याच्या इच्छेच्या पूर्ण होण्यास प्रतिबंध करावे?" यावरुन, आपण शिकलो की, ते जे पुरुष व स्त्रियांना प्रभूकडे वळण्यास प्रतिबंध करतात, ते स्वतः देवाचा विरोध करतात. आणि हे की कोणत्याही मनुष्याला अधिकार नाही एखादया गटाच्या लोकांना तारणाकडून वगळावे जेव्हा देवाने सर्वांना सामावून घेतले आहे.
वचन १८ मध्ये, आपण पेत्राच्या साक्षीला यहूद्यांची प्रतिक्रिया पाहतो. ते समाधानी झाले आणि पेत्रा विरोधातील आरोप मागे घेतले आणि त्या विषयाबाबत आणखी काहीही बोलले नाही. त्यांचे कृत्य हे उदात्त होते कारण येथे अजूनही काही आहेत जे त्यांच्या चुकीच्या मतास धरून आहेत जरी जेव्हा त्यांना चूक असे साबित केले आहे.
परंतु ते का शांत झाले आणि पेत्रावर दोष लावणे का थांबले? कारण हे स्पष्ट होते की हे सर्व काही परमेश्वर होता ज्याने परराष्ट्रीयांना मंडळीच्या संगतीमध्ये सामावून घेतले होते. हे त्यांना स्पष्ट झाले होते की त्यांच्याबरोबर आशीर्वाद आणि तारणामध्ये परराष्ट्रीयांना सहभागी करून घेण्याद्वारे परमेश्वर त्यांचा अभिमान व भावना दुखावत होता.
याकडे लक्ष दया की यहूद्यांनी केवळ पौलाबरोबर त्यांचे भांडणच सोडले नाही. याशिवाय, आणखी हे की, त्यांनी संपूर्ण विषयासाठी देवाची स्तुति केली आणि त्यास गौरव दिले. होय, ते कृतज्ञ होते की पेत्राला दोष देण्यात त्यांची चूक दुरुस्त केली होती, परंतु ते धन्यवादी देखील होते की देवाने परराष्ट्रीयांवरही दया दाखविली होती.
म्हणून ते म्हणाले, "तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चातापबुद्धि दिली आहे." याचा काय अर्थ आहे? देवाने सेवा करण्याचे प्रभावी द्वार उघडण्याद्वारे त्यांना देखील पश्चातापाचा मार्ग पुरविला आहे म्हणजे देवाचे सेवक परराष्ट्रीयांना देखील सुवार्ता प्रसार करू शकतील. परंतु पश्चाताप करण्यासाठी देखील त्यांना कृपा दिली होती कारण त्यांनी पवित्र आत्मा प्राप्त केला होता जो पापाबद्दल दोष देतो, पुनर्जीवित करण्याचे कार्य करतो आणि एखादयाला ख्रिस्तामधील आनंदाचे जीवन जगण्याकडे नेतो.
"जीवनासाठी पश्चाताप" या त्यांच्या वक्तव्यावरून हे लक्षात घ्या, आपण हे पाहतो की पश्चाताप पापमय जीवनाकडून दूर करते आणि आध्यात्मिक जीवनाकडे नेते. ते जे खरेच पश्चातापयुक्त आहेत ते दैवी जीवन जगण्यास परिवर्तीत होतात जे पवित्रतेद्वारे चिन्हित होते. म्हणजे पश्चातापाद्वारे, आपण पापाला मृत होतो, आणि देवासाठी जिवंत होतो; ही खऱ्या जीवनाची सुरुवात आहे.
तसेच, यहूद्यांचे वक्तव्य हे दाखविते की पश्चाताप हे देवाचे बक्षीस आहे. त्याच्या सामर्थ्यी कृपे द्वारे, आपल्या पापापासून वळण्याच्या आपल्या इच्छेला देव स्वीकारतो. तथापि, त्यास हे ठाऊक आहे की आपण आपल्या देहाच्या शक्तीने पश्चातापाची आवश्यकता पूर्ण करू शकत नाही, म्हणून तो आपल्यामध्ये पश्चातापाचे कार्य पूर्ण करतो. पुन्हा, जीवनासाठी पश्चातापाचा अर्थ म्हणजे देवाने जीवन देण्याअगोदर, तो पश्चाताप देतो.
१९स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वासणारे पांगले. यतील काही दूरच्या ठिकाणी, उदा. फेनीके, कुप्र व अंत्युखियापर्यंत गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांनाच सुवार्ता सांगितली.(प्रेषितांची कृत्ये ११:१९)
या वचनात, आपण पाहतो की शिष्यांना काय झाले जे यरुशलेम सोडून पळून गेले कारण तेथे मंडळीच्या विरोधात मोठा छळ झाला होता. हा तोच कालावधी होता जेव्हा स्तेफन मारला गेला होता. जेव्हा ते पळाले, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत राहिले, आणि ते जात असताना त्यांनी सुवार्ता सांगितली.
आता, हे लक्षात घ्या की देवाने त्यांना छळ सोसावयास लावले म्हणजे ते परदेशात विखरून जाऊ शकतील आणि सुवार्ता पसरवितील. या प्रकारे, चर्चच्या शत्रूने जी योजना आखली होती की त्यांचे नुकसान व्हावे, तेव्हा त्यांस त्यापासून लाभ झाला. तसेच हे लक्षात घ्या की शिष्य अतोनात छळामुळे पळाले, तरी ते सुवार्ता सांगण्यापासून पळाले नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा छळ उत्पन्न झाला ते पळाले, परंतु नेहमीच त्यांचा विश्वास बरोबर घेऊन गेले आणि ते इतरांना सांगितले.
याकडे लक्ष दया, यावेळी, त्यांनी परराष्ट्रीयांना सुवार्ता प्रचार केला नाही परंतु जे यहूदी त्यांना आढळले त्यांनाच केवळ सांगितले. का? कारण त्यांना तोपर्यंत परराष्ट्रीयांना तारणाचे वारसदार करण्याची देवाची इच्छा व कार्य समजावयाचे होते. उघडपणे, ह्या यहूद्यांचे स्वतःचे सभागृह होते, म्हणून शिष्य त्यांना भेटत राहिले की सुवार्ता प्रचार करावा.
२०यातील काही विश्वासणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा ते ग्रीक लोकांशीही बोलले. त्यांनी या ग्रीक लोकांना येशूविषयीची सुवार्ता सांगितली. २१प्रभु विश्वासणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभुला अनुसरु लागले(प्रेषितांची कृत्ये ११:२०-२१)
मागील वचने दाखवितात की विखुरलेले शिष्य फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथे आले. परंतु या वचनात, आपण अंत्युखिया येथे चर्चच्या प्रारंभाविषयी पाहतो. अधिकतर शिष्य हे यहूदा व यरुशलेम येथून विखरले होते. तथापि, ज्यांनी अंत्युखिया येथे प्रचार केला होता ते, बर्णबासारखे, कुप्री व कुरेनेकर होते.
हेल्लेणी लोक कोण होते?
हेल्लेणी हे यहूद्यांचा एक गट होते जे रोमन साम्राज्याच्या काळात राहणारे होते आणि ते ग्रीक संस्कृतीमुळे फारच प्रभावित झालेले होते. हा प्रभाव झालेला असताना देखील, त्यांनी त्यांच्या यहूदी पद्धतींचे पालन केले होते त्याचवेळेस दैनंदिन संवादाचे साधन म्हणून ग्रीक भाषा पत्करली होती. यहूदी धर्मशास्त्राचे त्यांचे आकलन सुलभ करण्यासाठी, जे मूळतः इब्री भाषेमध्ये लिहिलेले होते, ख्रिस्त पूर्व काळाच्या तिसऱ्या शतकापासून त्याचे भाषांतर ग्रीक भाषेमध्ये केले होते.
आणि कारण की ते ग्रीक यहूदी (हेल्लेणी) होते, त्यांनी त्यांच्या प्रचाराचे लक्ष्य या गटावर केले होते. तर मग त्यांच्या संदेशाचा विषय काय होता? त्यांनी प्रभु येशू, वधस्तंभावरील ख्रिस्त, आणि गौरवी ख्रिस्ताचा प्रचार केला.
जेव्हा त्यांनी प्रचार केला तेव्हा त्यांच्या प्रचंड यशाचा विचार करा. त्यांनी पुराव्यावाचून, केवळ संदेश प्रचार केला नाही, परंतु देवाचा हात त्यांच्यावर होता. देवाच्या हाताचा संबोध म्हणजे देवाचे सामर्थ्य आहे. याचा अर्थ त्यांच्या सेवाकार्यामध्ये देवाचे सामर्थ्य होते. देवाच्या कृपेने त्यांचे श्रवण करणाऱ्या श्रोत्यांच्या हृदयात कार्य केले, आणि विविध चमत्कार हे केले गेले. आणि त्यांचा प्रचार अनेक आत्म्याचे परिवर्तन होण्यामध्ये झाले.
"असंख्य लोकांनी विश्वास ठेवला" हे वाक्य सुचविते की त्यांच्या परिस्थितीचा विचार करता, त्यांनी अपेक्षा केली होती त्यापेक्षा मोठे परिणाम प्राप्त केले. ख्रिस्ताविषयी त्यांच्या संदेशाला स्वीकार करणाऱ्यांना विश्वास झाला होता की सुवार्ता ही खरी आहे, आणि त्यांनी त्याचे सदस्यत्व घेतले. जरी हे लोक यहूदी होते म्हणून ते मुर्तीपूजेपासून वळले नव्हते, तरीही ते नियमशास्त्राच्या धार्मिकतेपासून वळले होते की ख्रिस्ताच्या धार्मिकतेवर निर्भर राहावे.
२२याविषयीची बातमी यरुशलेम येथील विश्वासणाऱ्या मंडळीच्या कानावर आली. म्हणून यरुशलेम येथील विश्वासणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठविले.(प्रेषितांची कृत्ये ११:२२)
जेव्हा यरुशलेम येथील चर्चने अंत्युखिया येथील परिवर्तनाच्या सुवार्तेबद्दल ऐकले, तेव्हा त्यांनी या नवीन चर्चकडे बर्णबाला पाठविले की येथील विश्वासणाऱ्यांना सत्यामध्ये आणखी स्थिर आणि दृढ करावे. हे शक्य आहे की प्रेषितांनी त्या राष्ट्रांमध्ये सुवार्तेच्या यशाबद्दल सातत्याने चौकशी केली होती जेथे शिष्यांनी प्रचार केला होता. अशा प्रकारे, असंख्य लोक ख्रिस्ताकडे वळले आहेत ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहचली होती.
हे लक्षात घ्या की शिष्यांनी ही हर्षभरित बातमी जी प्राप्त केली होती त्यावरून केवळ आनंद केला नाही, तर त्यांनी कार्य केले. बर्णबाला चर्चचा प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले की त्यांचे अभिनंदन करावे व त्यांना प्रोत्साहन दयावे.
"अंत्युखियापर्यंत जाणे" या वाक्याचा काय अर्थ आहे याचा विचार करा. निश्चितच, हे सुचविते की अंत्युखिया हे यरुशलेमेपासून फार दूरवर होते, जेथून त्यांनी बर्णबाला पाठविले होते. परंतु ते हे देखील सूचित करते की बर्णबाला अशा दूरवरच्या देशातील प्रकल्प हाती घेण्याचे दान होते. कदाचित, त्यावेळी, तो त्या कार्यासाठी अगदी उत्तम असा होता. तर शरीरामध्ये प्रत्येकाकडे त्यांच्या कार्याची कुशलता आहे जेव्हा त्यांना देवाच्या अतुलनीय कृपेद्वारे समर्थ केले जाते.
२३"तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, २४'दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.' तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले." (प्रेषित ११:२३-२४)
अंत्युखियात आल्यावर, तेथे शिष्यांच्या जीवनात देवाचे अद्भुत कार्य पाहून बर्णबा आनंदित झाला. खात्रीने, तो प्रसन्न झाला होता की त्याच्या शहरातील लोक हे साधन झाले होते की ज्यांद्वारे देवाने असे प्रचंड यश घडवून आणले होते. बर्णबाने पाहिले की देवाची कृपा ही स्पष्ट दिसत आहे, केवळ त्यांच्या सांघिक उपासनेमध्ये नाही, तर त्यांचे संभाषण, आचरण व कौटुंबिक जीवनात देखील. त्यामुळे, जेव्हा आपण पाहतो की देवाचे कार्य होत आहे, तेव्हा आपण ते स्वीकारले पाहिजे, त्यामध्ये समाधान प्राप्त करावे, आणि त्याच्या नावा करिता त्यामध्ये आनंद करावा.
"प्रोत्साहन" हा शब्द ग्रीक भाषेमध्ये "पैराकालेई" असा आहे याचा अर्थ उत्तेजन देणे. प्रतीकात्मकदृष्टया, बर्णबाच्या नावाचा अर्थ उत्तेजन देणारा पुत्र आणि ते त्याच्या प्रोत्साहन देण्याचे जन्मजात दानाकडे इशारा करते. आणि म्हणून त्याने तसे केले, त्यांना विनंती केली की प्रभूमध्ये स्थिर राहा आणि प्रभूला बिलगून राहा.
बर्णबाने त्यांना प्रोत्साहन दिले की प्रभूमध्ये सातत्याने चाला, प्रभूमध्ये सातत्याने चाला याचा अर्थ ख्रिस्तावर निर्भर राहा आणि त्याशी समर्पित असा. आपले पतन होण्यापासून राखण्यास त्याच्या कृपेवर निर्भर राहा आणि त्याच्या अधिकारात राहण्यास समर्पित होणे हे दोन्हीही म्हणजे, आपले सर्व काही त्यास समर्पित करणे आहे. "अंत:करणाच्या उद्देशासह" हे शब्द जाणूनबुजून केलेला निर्णय की न डगमगता तारणाच्या पायामध्ये मुळावलेले आणि स्थिर राहण्यास दाखविते. याचा अर्थ हा निश्चय करावा की घनिष्ठतेत आणि संबंधात ख्रिस्ताबरोबर जुळलेले राहावे.
आता, बर्णबाचे बोलणे हे त्याचा स्वभाव व चारित्र्याचा पुरावा होता. त्यांनी त्यास चांगल्या स्वभावाचा आणि प्रसन्नचित्त व्यक्ति असे दाखविले. बर्णबा हा केवळ नीतिमान नव्हता तर कृत्यांमध्ये देखील चांगला होता. प्रेषित ४:३७ मध्ये असणारा हा तोच बर्णबा होता, ज्याने आपली मालमत्ता विकली होती आणि ज्यांना गरज होती त्यांना दिले होते. म्हणजे तो उदार व दानधर्म करणारा मनुष्य होता. सुवार्तेचे असे प्रचारक ते जी सुवार्ता प्रसार करतात त्यास चांगली प्रतिष्ठा देतात.
वरील वचने याचे देखील वर्णन करतात की बर्णबा, "पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता." हे दाखविते की त्याच्याकडे केवळ चांगुलपणाचे स्वाभाविक गुणच नव्हते. खात्रीने, सेवा जी करण्यामध्ये तो व्यस्त होता त्यासाठी केवळ याच गुणाने त्याला पात्र ठरविलेले नव्हते. परंतु तो पवित्र आत्म्याची कृपा व वरदानांनी पूर्ण होता. बर्णबा हा ख्रिस्ती विश्वास, कृपा, फळ, कार्यांद्वारे आणि प्रीति ज्याद्वारे येते त्याने पूर्ण होता. याशिवाय, विश्वासाने पूर्ण असे त्यास संबोधले गेले आहे हे दाखविते की तो स्थिर व भक्कम होता. अशा प्रकारे, त्याने त्यांना उत्तेजन दिले की तो जसा होता तसे त्यांनी व्हावे.
वचन २४ च्या शेवटच्या शब्दांमध्ये, आपण पाहतो की बर्णबाची उपस्थिती व चांगल्या कृत्यांमुळे, अंत्युखिया मधील चर्च वाढत गेले. त्यामुळे, जे काम त्याला दिले गेले होते त्यामध्ये त्याने उत्कृष्ट असे केले आणि यश मिळविले.
२५जेव्हा बर्णबा तार्सस शहरी गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता. २६जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना “ख्रिस्ती” हे नाव पहिल्यांदा मिळाले.(प्रेषितांची कृत्ये ११:२५-२६)
येथे आपण पाहतो की बर्णबाने शौलाचा तार्स येथे शोध घेतला आणि अंत्युखियामधील सेवाकार्यात त्याच्याबरोबर सहभागी होण्यास सांगितले. हे तेव्हा घडले होते जेव्हा शौल यरुशलेम येथून पळून गेला होता कारण लोक त्याचा घात करण्यास पाहत होते आणि म्हणून तो तार्स येथे जाऊन राहिला होता.
म्हणून बर्णबा ख्रिस्तामधील त्याच्या बंधूच्या खुशालीची चौकशी करण्यासाठी तेथे गेला की प्रचार करण्याचे प्रभावी द्वार जे अंत्युखियामध्ये उघडले गेले आहे ते सांगावे, आणि त्याची मदत घ्यावी. ह्या वचनांमध्ये, बर्णबाच्या चांगुलपणाचे कार्य कसे सिद्धीस गेले ते पाहा.
प्रथम, त्याने हे स्वतःच ठरविले की याची खात्री करावी की शौल त्याचे दान व कृपेचा वापर अत्यंत फलदायक मार्गांनी करत आहे. दुसरे, त्याने शौलाला अंत्युखिया येथे नेले, हे ओळखून की, शौल हा अत्यंत कुशल व प्रमुख प्रचारक आहे, जो त्याच्यापेक्षा महान कार्य करील. तरीही, त्याने सुवार्ता पसरविण्याकडे आणि आत्म्याच्या परिवर्तनाकडे लक्ष दिले.
ह्या वचनांमध्ये, आपण पाहतो की अंत्युखिया येथील चर्च मध्ये काय घडले जेव्हा शौल व बर्णबा यांनी एकत्र मिळून काम केले. दोघेही अंत्युखियामध्ये एक वर्ष राहिले, शिष्यांना एकत्र करीत व त्यांना शिकवीत होते. हे लक्षात घ्या की शिष्यांनी ही सवय केली होती की एकत्र मिळावे आणि ह्या सभांचे अध्यक्षपण शौल व बर्णबाने केले होते. तसेच, ह्या एकत्र येण्यामध्ये एक महत्वाची गोष्ट केली होती त्याकडे लक्ष दया; दोघांनीही एकत्र झालेल्या शिष्यांना ख्रिस्ताचे ज्ञान शिकविले. हे आपल्याला हे समजण्याकडे नेते की प्रचाराचा उद्देश हा पाप्यांना दोष लावणे आणि परिवर्तन करण्यापलीकडील आहे. हे विश्वासणाऱ्यांना उपदेश देणे व उन्नति करण्याचे देखील आहे.
बर्णबा व शौलाच्या महान कार्यामुळे, त्या भागात ख्रिस्ताचा प्रचार आणि विश्वासणाऱ्यांना एकत्र आणणे हे इतके प्रसिद्ध झाले की त्यांना ख्रिस्ती असे संबोधण्यात आले. या मार्गाने, यहूदी व परराष्ट्रीयांमधील फरकावर उपाय झाला होता. दोन्हीही गट, जे ख्रिस्ताकडे वळले होते, यहूदी किंवा परराष्ट्रीय असो,-आता त्यांना सारखेच नाव व ओळख होती.
आणि जसे त्यांचे नाव सुचविते, त्यांनी स्वतःला नम्र केले की त्यांच्या प्रभूच्या मार्गाचे अध्ययन करावे, आणि सार्वजनिकपणे घोषित करावे की ते त्याशी संबंधित आहेत. ज्याप्रमाणे विद्वानांचे विद्यार्थी त्यांचे नाव घेतात, ते ख्रिस्ताचे नाव घेतात.
२७याच काळात काही संदेष्टे यरुशलेमहून अंत्युखियास आले.२८ यांच्यापैकी एकाचे नाव अगाब होते. अत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, “फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे. लोकांना खायला अन्न मिळणार नाही.” (क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.)(प्रेषितांची कृत्ये ११:२७-२८)
ही वचने दाखवितात की यरुशलेमेकडून संदेष्ट्ये अंत्युखियामध्ये आले, आणि मोठी भविष्यवाणी दिली गेली. आता, बायबल त्यांची सख्या किती होती किंवा ते संदेष्ट्ये होते काय हे सांगत नाही, जे आपणांस प्रेषित १३ मध्ये सापडते. हे शक्य आहे की छळामुळे ते यरुशलेमेतून पळाले होते. कारण संदेष्ट्यांना मारणारे म्हणून हे नगर प्रसिद्ध होते. परंतु त्यांनी सुवार्तेच्या यशाबद्दल, आणि अंत्युखियामध्ये चर्चच्या वाढीबद्दल ऐकले असेन.
अंत्युखियामध्ये चर्चची कशी स्थापना केली गेली याकडे लक्ष दया. बर्णबास त्यांना दृढ करण्यास व प्रोत्साहन देण्यास पाठविले गेले होते, काही काळासाठी शौल त्यांना येऊन मिळाला होता की त्यांना शिकवावे, आणि आता संदेष्ट्ये त्यांच्याकडे आले होते की भविष्याबद्दल त्यांच्या संबंधात भविष्यवाणी करावी.
वचन २८ मध्ये, अगब नावाच्या एक संदेष्ट्याने काही काळ मोठा दुष्काळ पडणार आहे याबद्दल भाकीत केलेले आपण पाहतो.
त्याची भविष्यवाणी कोठून आली हे लक्षात घ्या:
"अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की, सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे." हे त्याच्या कल्पनेमधून उत्पन्न झालेले नव्हते किंवा वेळ व ऋतूंचे निरीक्षण करून केलेले नव्हते. त्याचे भाकीत हे पवित्र आत्म्याकडून होते.
त्याच्या भविष्यवाणीची व्याप्ती हे संपूर्ण जग होते. तुटवडा आणि भुकेची वेळ जवळ येत होती. आणि त्याच वचनात, आपण पाहतो की ही भविष्यवाणी क्लौद्याच्या वेळेस पूर्ण झाली होती. नेमकपणे, ही भविष्यवाणी त्याच्या राज्यकारभारात सुरु होऊन दोन वर्षे झाली होती आणि ती चवथ्या वर्षापर्यंत राहिली होती.
२९"तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्चय केल की, यहूदीयात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे; त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्यांच्या हाती वडीलवर्गाकडे पाठवून दिले." (प्रेषित ११:२९-३०)
ह्या वचनांमध्ये, आपण पाहतो की शिष्यांनी परिस्थितीनुसार भविष्यवाणीची चेतावणी कशी लागू केली. त्याप्रमाणे नाही, जेव्हा मिसरी लोकांनी कसे धान्य जपून ठेवले होते जेव्हा त्यांना येणाऱ्या दुष्काळाविषयी सुचना मिळाली होती, तर इतर ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या बंधुजनांना मदत करण्याची गरज आहे असे त्यांना वाटले. म्हणून यहूदा येथील बंधुजनांना मदत पाठविण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
या मोठया उदारपणासाठी यहूदाची निवड केली होती याचे कारण कदाचित इतर नगरांपेक्षा यहूदा प्रदेशात अधिक गरीब लोक आहेत हे कारण होते.
या भविष्यवाणीच्या समयसूचकतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही कारण ख्रिस्ती विश्वासावर त्याचा परिणाम हा फार मोठा झाला असता जर देवाच्या लोकांना नकळत मारले गेले आणि बरेच विश्वासणारे मरण पावले असते. लक्षात घ्या की शिष्यांनी एखादा विशेष कर देण्याचा दबाव केला नाही की ते जे इतके संपन्न नव्हते त्यांना त्रासात आणावे. परंतु प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेप्रमाणे देण्यास विनंती केली होती.
अंत्युखिया येथील शिष्यांनी हा निधि यहूदा येथील चर्चचे वडील किंवा पुढाऱ्यांकडे पाठविला. ही मदत शौल व बर्णबा द्वारे पाठविण्यात आली, जे या कामावर जाण्यास इच्छूक होते. हे शक्य असेल की त्यांनी स्वतःहून यरुशलेमेस भेट देण्याची इच्छा केली असेन.
Chapters