अहाब राजाने घडलेली सर्व हकीकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले. (1 राजे 19:1)
आत्म्यांचा एक वर्ग आहे जे देवाच्या लोकांवर सतत लक्ष ठेवून असतात. हया दुष्ट आत्म्यांना "निरीक्षक आत्मे" असे म्हणतात. या प्रकरणात, अहाबाने ईजबेलला एलीया संदेष्ट्याने जे केले होते ते सर्वकाही सांगितले.
2 तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार आहे. यात मला यश आले नाही तर देवतांनीच मला मारावे.” 3 एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैरशेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून (1 राजे 19:2-3)
कर्मेल डोंगरावर बालाचे मौन व याव्हेकडून अग्निने ईजबेलला पश्चाताप करावयास लावले नाही. विनाशासाठी येथे काही चिन्ह आहेत. "आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असतांना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठया सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले, तर काय?" (रोम. ९:२२)
विश्वास वार्तेने येतो (रोम १०:१७), आणि हेच तर सत्य आहे. परंतु दु:खद विडंबना ही आहे की, दुष्टाची वाणी ऐकण्याद्वारे भय देखील होते. जेव्हा एलीयाने ईजबेलकडून धमकी विषयी ऐकले, तेव्हा त्यास भीति वाटली आणि मग तो उठला आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी पळाला.
त्या सेनापतीचा स्वामी, अश्शूराचा राजा याने त्याला आपल्या जिवंत देवाची निंदा करायला पाठवले होते. कदाचित् हे सर्व आपल्या परमेश्वर देवाच्या कानावर जाईल. शत्रूचा अंदाज चुकीचा आहे हे तो दाखवूनही देईल. तेव्हा अजून जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना कर.’” (2 राजे 19:4)
एलीयाने मृत्यू यावा म्हणून प्रार्थना केली परंतु वास्तविकता ही आहे की जर त्यास खरेच मृत्यू हवा होता, तर मग तो ईजबेलपासून का पळून गेला? त्याच्या मुखाने एक गोष्ट बोलली, आणि त्याच्या अंत:करणाने दुसरी. मी देवाचा धन्यवाद करतो की तो केवळ आपल्या मुखातील शब्द ऐकत नाही परंतु आपल्या अंत:करणातील मूक रडण्यास देखील ऐकतो.
हे तसेच सिद्ध करते की अनेक वेळेला देवाकडून उत्तर म्हणून नकार मिळविणे हे होकार मिळविण्यापेक्षा उत्तम असू शकते.
5 एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करुन म्हणाला, “उठ खाऊन घे.” 6 एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली गोड भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
7 आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.” (1 राजे 19:5-7)
यावेळी देवाने एलीयाला ओहोळाकडे पाठविले नाही की कावळ्याद्वारे भोजन पुरवावे, ना ही त्याने त्यास एका विधवेकडे पाठविले. बायबलचे अनेक विद्वान म्हणतात की "देवाचा दूत" ही संज्ञा हे देहधारणेपूर्वी ख्रिस्ताच्या प्रकट होण्याचा सरळपणे संदर्भ आहे.
एलीया संदेष्ट्याने प्रत्यक्ष देवाच्या हातून सरळपणे भोजन घेतले होते. काय ही कृपा! त्याविषयी विचार करा, येथे एक मनुष्य आहे जो देवाचा धावा करणे सोडून देत आहे, तरीही देव त्याजवरील आपली कृपा काढून टाकीत नाही! तो आपल्या निराश संदेष्ट्यास भोजनाने तृप्त करतो.
तुम्ही जर योहान २१:१-१४ वाचले, तर जेव्हा येशूला अटक केली, आणि शिष्यांनी त्यास एकटेच सोडून दिले होते आणि त्याच्या मृत्यूनंतर, ते त्यांच्या पूर्वीच्या व्यवसायाकडे परत गेले होते. ते पूर्णपणे निराश व दु:खी झाले होते. परंतु येशूने त्यांना तशाच अवस्थेमध्ये सोडले नाही. त्याने स्वतः गालील समुद्राच्या किनाऱ्यावर स्वतः त्यांच्यासाठी नाश्ता तयार केला आणि त्यांना तृप्त केले. याच ठिकाणी पेत्राला देखील पुनर्स्थापित केले गेले.
अश्शूराचा राजा लाखीश सोडून गेल्याचे सेनापतीने ऐकले. यहूदातील एक नगर लिब्ना याच्याविरुध्द तो लढत असल्याचे त्या सेनापतीला आढळले. (2 राजे 19:8)
बैर-शेबा ते होरेब हे अंतर मोठे होते. बैर-शेबा व होरेब डोंगरामधील अंतर हे जवळ जवळ ४२० किमी आहे. एलीयाने ४० दिवस व ४० रात्री उपास केला.
अलीशाने मग आपल्या आईवडीलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली. त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले त्यावर बैलांचे मांस शिजवले. सर्व लोकांना जेवायला बोलावले. मग अलीशा एलीयाच्या पाठोपाठ गेला. एलीयाच्या तो मदतनीस झाला. (1 राजे 19:21)
अलीशाने त्याच्या मागच्या सर्व पुलांना जाळून टाकिले जेणेकरून तो त्याच्या जुन्या व्यवसायाकडे परत जाऊ शकणार नाही. दुसरीकडे, प्रभु येशूच्या मृत्युनंतर प्रेषित त्यांच्या पूर्वीच्या व्यवसायाकडे परत गेले. तथापि, जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात आला, तेव्हा ते कधीही माघारी गेले नाहीत.
आत्म्यांचा एक वर्ग आहे जे देवाच्या लोकांवर सतत लक्ष ठेवून असतात. हया दुष्ट आत्म्यांना "निरीक्षक आत्मे" असे म्हणतात. या प्रकरणात, अहाबाने ईजबेलला एलीया संदेष्ट्याने जे केले होते ते सर्वकाही सांगितले.
2 तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार आहे. यात मला यश आले नाही तर देवतांनीच मला मारावे.” 3 एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैरशेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून (1 राजे 19:2-3)
कर्मेल डोंगरावर बालाचे मौन व याव्हेकडून अग्निने ईजबेलला पश्चाताप करावयास लावले नाही. विनाशासाठी येथे काही चिन्ह आहेत. "आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असतांना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठया सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले, तर काय?" (रोम. ९:२२)
विश्वास वार्तेने येतो (रोम १०:१७), आणि हेच तर सत्य आहे. परंतु दु:खद विडंबना ही आहे की, दुष्टाची वाणी ऐकण्याद्वारे भय देखील होते. जेव्हा एलीयाने ईजबेलकडून धमकी विषयी ऐकले, तेव्हा त्यास भीति वाटली आणि मग तो उठला आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी पळाला.
त्या सेनापतीचा स्वामी, अश्शूराचा राजा याने त्याला आपल्या जिवंत देवाची निंदा करायला पाठवले होते. कदाचित् हे सर्व आपल्या परमेश्वर देवाच्या कानावर जाईल. शत्रूचा अंदाज चुकीचा आहे हे तो दाखवूनही देईल. तेव्हा अजून जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना कर.’” (2 राजे 19:4)
एलीयाने मृत्यू यावा म्हणून प्रार्थना केली परंतु वास्तविकता ही आहे की जर त्यास खरेच मृत्यू हवा होता, तर मग तो ईजबेलपासून का पळून गेला? त्याच्या मुखाने एक गोष्ट बोलली, आणि त्याच्या अंत:करणाने दुसरी. मी देवाचा धन्यवाद करतो की तो केवळ आपल्या मुखातील शब्द ऐकत नाही परंतु आपल्या अंत:करणातील मूक रडण्यास देखील ऐकतो.
हे तसेच सिद्ध करते की अनेक वेळेला देवाकडून उत्तर म्हणून नकार मिळविणे हे होकार मिळविण्यापेक्षा उत्तम असू शकते.
5 एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करुन म्हणाला, “उठ खाऊन घे.” 6 एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली गोड भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
7 आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.” (1 राजे 19:5-7)
यावेळी देवाने एलीयाला ओहोळाकडे पाठविले नाही की कावळ्याद्वारे भोजन पुरवावे, ना ही त्याने त्यास एका विधवेकडे पाठविले. बायबलचे अनेक विद्वान म्हणतात की "देवाचा दूत" ही संज्ञा हे देहधारणेपूर्वी ख्रिस्ताच्या प्रकट होण्याचा सरळपणे संदर्भ आहे.
एलीया संदेष्ट्याने प्रत्यक्ष देवाच्या हातून सरळपणे भोजन घेतले होते. काय ही कृपा! त्याविषयी विचार करा, येथे एक मनुष्य आहे जो देवाचा धावा करणे सोडून देत आहे, तरीही देव त्याजवरील आपली कृपा काढून टाकीत नाही! तो आपल्या निराश संदेष्ट्यास भोजनाने तृप्त करतो.
तुम्ही जर योहान २१:१-१४ वाचले, तर जेव्हा येशूला अटक केली, आणि शिष्यांनी त्यास एकटेच सोडून दिले होते आणि त्याच्या मृत्यूनंतर, ते त्यांच्या पूर्वीच्या व्यवसायाकडे परत गेले होते. ते पूर्णपणे निराश व दु:खी झाले होते. परंतु येशूने त्यांना तशाच अवस्थेमध्ये सोडले नाही. त्याने स्वतः गालील समुद्राच्या किनाऱ्यावर स्वतः त्यांच्यासाठी नाश्ता तयार केला आणि त्यांना तृप्त केले. याच ठिकाणी पेत्राला देखील पुनर्स्थापित केले गेले.
अश्शूराचा राजा लाखीश सोडून गेल्याचे सेनापतीने ऐकले. यहूदातील एक नगर लिब्ना याच्याविरुध्द तो लढत असल्याचे त्या सेनापतीला आढळले. (2 राजे 19:8)
बैर-शेबा ते होरेब हे अंतर मोठे होते. बैर-शेबा व होरेब डोंगरामधील अंतर हे जवळ जवळ ४२० किमी आहे. एलीयाने ४० दिवस व ४० रात्री उपास केला.
अलीशाने मग आपल्या आईवडीलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली. त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले त्यावर बैलांचे मांस शिजवले. सर्व लोकांना जेवायला बोलावले. मग अलीशा एलीयाच्या पाठोपाठ गेला. एलीयाच्या तो मदतनीस झाला. (1 राजे 19:21)
अलीशाने त्याच्या मागच्या सर्व पुलांना जाळून टाकिले जेणेकरून तो त्याच्या जुन्या व्यवसायाकडे परत जाऊ शकणार नाही. दुसरीकडे, प्रभु येशूच्या मृत्युनंतर प्रेषित त्यांच्या पूर्वीच्या व्यवसायाकडे परत गेले. तथापि, जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात आला, तेव्हा ते कधीही माघारी गेले नाहीत.
Chapters