3 इस्राएली सैनिक आपल्या तळावर परतले तेव्हा वडीलधाऱ्यांनी त्यांना विचारले, “परमेश्वराने का बरे पलिष्ट्यांमार्फत आपला पराभव करवला? आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रू पासून आपले संरक्षण करील.” (1 शमुवेल 4:3)
युद्धामध्ये त्यांच्या पराजयानंतर, इस्राएल लोकांच्या वडिलांनी योग्य प्रश्न विचारला" "देवाने आपल्याला पराजयाचा अनुभव का होऊ दिला?" परंतु त्यांनी देवासाठी व त्याच्याकडून उत्तरासाठी वाट पाहिली नाही. त्यांना काय चांगले वाटत होते त्यानुसार त्यांनी पुढील पाऊल उचलले. हे देखील आपल्याला सांगते की त्यांना देवाबरोबर व्यक्तिगत संबंध नव्हते. देवाबरोबर व्यक्तिगत संबंध तुम्हाला त्याची वाणी ऐकण्यास कारणीभूत ठरेल.
मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते. (1 शमुवेल 4:4)
देवाचे वचन शमुवेलाबरोबर होते, परंतु या तरुण संदेष्ट्याच्या आध्यात्मिक नेतृत्वाचे अनुसरण करण्यास राष्ट्र तयार नव्हते. ते हफनी व फिनहास, यांचे वाईट मार्ग जाणून देखील त्यांच्या नेतृत्वाचे अनुसरण करीत होते.
सैन्याच्या तळावर जेव्हा परमेश्वराच्या कराराचा कोश आणला तेव्हा सर्व इस्राएल लोकांमध्ये एकच जल्लोष झाला. या जयघोषाने भूमीही दणाणली. (1 शमुवेल 4:5)
ते कोशाला एक जादुई वस्तू, ताबीज, नशीब उघडणारे मंत्र म्हणून पाहण्यास त्याज जवळ आले होते, की त्याच्या अंगभूत सामर्थ्याने, त्यांना शत्रूवर विजय मिळेल.
त्यांच्या कामासाठी त्यांना देवाचा उपयोग करण्याची इच्छा होती. दु:खदपणे, त्यांना देवाबरोबर काहीही संबंध नव्हते.
10 तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले. 11 पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला आणि हफनी आणि फिनहास या एलीच्या मुलांचा वध केला. (1 शमुवेल 4:10-11)
अनेकजण जे आध्यात्मिक युद्धाबद्दल विचार करतात त्याविषयी हे विरोधात आहे. त्यांना वाटते की ते देवाच्या घरात प्रवेश करू शकतात आणि मंडळीमध्ये स्तुतीगीते मोठयाने बोलू शकतात, तेव्हा त्यांना मोठी कामें व देवाच्या राज्याच्या महान नवीन वाटचालीची शास्वती देण्यात येईल. देवाबरोबर त्यांना व्यक्तिगत काहीही संबंध नव्हते. त्यांच्यासाठी, कोश हा केवळ एक नशिबाचे मंत्र होते की त्यांच्या कामासाठी एक माध्यम म्हणून वापरावे. देवाचा उपयोग मनुष्य करू शकत नाही.
21 करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभव) असे ठेवले. 22 पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र करार कोश हस्तगत केला म्हणून “इस्राएलचे वैभव गेले” असे ती म्हणाली. (1 शमुवेल 4:21-22)
कोश हा पलीष्ट्याद्वारे हस्तगत केला गेला होता हे देवाचे वैभव जाण्याचे कारण नव्हते. वैभव हे अगोदरच निघून गेले होते, आणि हे केवळ त्या वास्तविकतेचे उघड प्रकटीकरण होते.
हे शक्य आहे की हे याजकास फार अगोदर उघड झाले होते. १ राजे ८:९ मध्ये आपण वाचतो की, "जेव्हा कोशाला मंदिरात ठेवण्यात आले होते जे शलमोनाने बांधिले होते, तेव्हा कोशामध्ये दहा आज्ञांच्या त्या दोन पाटीशिवाय काहीही नव्हते. अहरोनाची काठी व मान्नाबद्दल काय? (निर्गम १६:३३; गणना १७:१०; इब्री. ९:४). कोशामध्ये हे देवाचे वैभव होते जे या दोन वस्तूंना पिढ्यानपिढ्या ताजेतवाने ठेवत होते. मान्नाला कीड लागली असेन आणि काठी सुकून गेली असेन जेव्हा वैभव निघून गेले होते; म्हणून याजकाने या दोन्ही वस्तूंना काळजीपूर्वक काढून टाकले असेन. परंतु इस्राएली लोकांनी हे ओळखले की देवाचे वैभव हे निघून गेले आहे जेव्हा कोश हा घेऊन गेले होते.
हे आपल्याला शिकविते की देवाचे वैभव एका विशेष समयी आपल्याकडून निघून जाईल, परंतु नंतर खूप वेळ होऊन जाईपर्यंत ते आपल्या सभोवती असणाऱ्यांना उघड होऊ शकणार नाही. व्यक्तिगत किंवा चर्च म्हणून जेव्हा जगिकपणा किंवा पाप हे आपल्यामध्ये प्रगट होईल, तेव्हा हे प्रत्येकाला उघड होईल ज्यांना देवाच्या मार्गाविषयी काही समज असेल की देव हा निघून गेला आहे. परंतु वास्तविकता ही आहे की घसरण ही त्यानंतर खूप वेळेनंतर घडेल.
युद्धामध्ये त्यांच्या पराजयानंतर, इस्राएल लोकांच्या वडिलांनी योग्य प्रश्न विचारला" "देवाने आपल्याला पराजयाचा अनुभव का होऊ दिला?" परंतु त्यांनी देवासाठी व त्याच्याकडून उत्तरासाठी वाट पाहिली नाही. त्यांना काय चांगले वाटत होते त्यानुसार त्यांनी पुढील पाऊल उचलले. हे देखील आपल्याला सांगते की त्यांना देवाबरोबर व्यक्तिगत संबंध नव्हते. देवाबरोबर व्यक्तिगत संबंध तुम्हाला त्याची वाणी ऐकण्यास कारणीभूत ठरेल.
मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते. (1 शमुवेल 4:4)
देवाचे वचन शमुवेलाबरोबर होते, परंतु या तरुण संदेष्ट्याच्या आध्यात्मिक नेतृत्वाचे अनुसरण करण्यास राष्ट्र तयार नव्हते. ते हफनी व फिनहास, यांचे वाईट मार्ग जाणून देखील त्यांच्या नेतृत्वाचे अनुसरण करीत होते.
सैन्याच्या तळावर जेव्हा परमेश्वराच्या कराराचा कोश आणला तेव्हा सर्व इस्राएल लोकांमध्ये एकच जल्लोष झाला. या जयघोषाने भूमीही दणाणली. (1 शमुवेल 4:5)
ते कोशाला एक जादुई वस्तू, ताबीज, नशीब उघडणारे मंत्र म्हणून पाहण्यास त्याज जवळ आले होते, की त्याच्या अंगभूत सामर्थ्याने, त्यांना शत्रूवर विजय मिळेल.
त्यांच्या कामासाठी त्यांना देवाचा उपयोग करण्याची इच्छा होती. दु:खदपणे, त्यांना देवाबरोबर काहीही संबंध नव्हते.
10 तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले. 11 पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला आणि हफनी आणि फिनहास या एलीच्या मुलांचा वध केला. (1 शमुवेल 4:10-11)
अनेकजण जे आध्यात्मिक युद्धाबद्दल विचार करतात त्याविषयी हे विरोधात आहे. त्यांना वाटते की ते देवाच्या घरात प्रवेश करू शकतात आणि मंडळीमध्ये स्तुतीगीते मोठयाने बोलू शकतात, तेव्हा त्यांना मोठी कामें व देवाच्या राज्याच्या महान नवीन वाटचालीची शास्वती देण्यात येईल. देवाबरोबर त्यांना व्यक्तिगत काहीही संबंध नव्हते. त्यांच्यासाठी, कोश हा केवळ एक नशिबाचे मंत्र होते की त्यांच्या कामासाठी एक माध्यम म्हणून वापरावे. देवाचा उपयोग मनुष्य करू शकत नाही.
21 करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभव) असे ठेवले. 22 पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र करार कोश हस्तगत केला म्हणून “इस्राएलचे वैभव गेले” असे ती म्हणाली. (1 शमुवेल 4:21-22)
कोश हा पलीष्ट्याद्वारे हस्तगत केला गेला होता हे देवाचे वैभव जाण्याचे कारण नव्हते. वैभव हे अगोदरच निघून गेले होते, आणि हे केवळ त्या वास्तविकतेचे उघड प्रकटीकरण होते.
हे शक्य आहे की हे याजकास फार अगोदर उघड झाले होते. १ राजे ८:९ मध्ये आपण वाचतो की, "जेव्हा कोशाला मंदिरात ठेवण्यात आले होते जे शलमोनाने बांधिले होते, तेव्हा कोशामध्ये दहा आज्ञांच्या त्या दोन पाटीशिवाय काहीही नव्हते. अहरोनाची काठी व मान्नाबद्दल काय? (निर्गम १६:३३; गणना १७:१०; इब्री. ९:४). कोशामध्ये हे देवाचे वैभव होते जे या दोन वस्तूंना पिढ्यानपिढ्या ताजेतवाने ठेवत होते. मान्नाला कीड लागली असेन आणि काठी सुकून गेली असेन जेव्हा वैभव निघून गेले होते; म्हणून याजकाने या दोन्ही वस्तूंना काळजीपूर्वक काढून टाकले असेन. परंतु इस्राएली लोकांनी हे ओळखले की देवाचे वैभव हे निघून गेले आहे जेव्हा कोश हा घेऊन गेले होते.
हे आपल्याला शिकविते की देवाचे वैभव एका विशेष समयी आपल्याकडून निघून जाईल, परंतु नंतर खूप वेळ होऊन जाईपर्यंत ते आपल्या सभोवती असणाऱ्यांना उघड होऊ शकणार नाही. व्यक्तिगत किंवा चर्च म्हणून जेव्हा जगिकपणा किंवा पाप हे आपल्यामध्ये प्रगट होईल, तेव्हा हे प्रत्येकाला उघड होईल ज्यांना देवाच्या मार्गाविषयी काही समज असेल की देव हा निघून गेला आहे. परंतु वास्तविकता ही आहे की घसरण ही त्यानंतर खूप वेळेनंतर घडेल.
Chapters