जे मी तुम्हांला शिकवीत आहे की ते पाळावे. (अनुवाद ४; १)
आपल्याला लोकांना शिकविण्याची गरज आहे म्हणजे ते तसे करतील जे त्यांना शिकविले गेले आहे. याउलट, जे शिकविले गेले आहे ते लोकांनी आचरणात आणण्याची गरज आहे.
ज्या गोष्टी शिकविल्या गेल्या आहेत त्या जेव्हा तुम्ही आचरणात आणता, तेव्हा तीन गोष्टी होतात:
१. तुम्ही जगता
२. तुम्ही देशात जाता
३. तुम्हीदेश हस्तगत करता
तुम्ही वचनात काहीही अधिक जोडणार नाही किंवा त्यातून काहीही काढून टाकणार नाही, ज्याची मी तुम्हाला आज्ञा दिली आहे. (अनुवाद ४: २)
हा इशारा होता की देवाच्या शिकवणीत काहीही हेरफार करू नये. पवित्र शास्त्राचे प्रथम हस्तलिखित हे हाताने लिहिलेले होते, आणि ती नक्कल करणाऱ्यास हे सोपे होते कीत्यात चूक करावी परंतु परमेश्वर त्याच्या वचनावर लक्ष ठेवून आहे. (यिर्मया १: १२)
बआलपौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे; जे लोक बआलपौराच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यामधून नष्ट केले. (अनुवाद ४: ३)
बलामाच्या खोटया संदेष्ट्यांना राजा बालाक द्वारे वेतन देऊन बोलाविले होते की इस्राएली लोकांना शाप दयावे; परंतु प्रत्येक वेळी जेव्हा बलाम ने यहूदी लोकांना शाप देण्याचा प्रयत्न केला, तो शेवटी त्यांना आशीर्वाद देत राहीला (गणना २२-२४). त्याचे शाप कार्यरत झाले नाही, परंतु त्याच्याकडे योजना होती ज्याने कार्य केले.
त्याने आणि बालाक ने त्यांना एक मवाबीधार्मिकउत्सवासाठी आमंत्रण दिले आणि त्यांना प्रोत्साहन दिले की त्यात पूर्णपणे सहभाग घ्यावा (गणना २५). याचा अर्थ मंदिराच्या वेश्यांबरोबर लैंगिक सहवास करावयाचा होता आणि एका मनुष्याने तर एका 'स्त्रीला' यहूदी छावणी पर्यंत सुद्धा आणले.
ही वास्तविकता की परमेश्वराने २४००० लोकांचा वध करण्याद्वारे त्याच्या लोकांचा न्याय केला हे दर्शविते की यहूदी लोकांनी त्या दुष्ट उत्सवात फारच मनापासून भाग घेतला होता. शत्रूने जे शाप आणि लढाई द्वारे पूर्ण केले नव्हते ते त्यानेतडजोड करून पूर्ण केले होते.
पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिला ते सगळे आज जिवंत आहा. (अनुवाद ४:४)
यहूदी लोक ज्यांनी आमंत्रणाचा नकार केला आणि परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले ते अजूनही जिवंत होते, पुन्हाहे सत्य निश्चित होते की वचन हे आपले जीवन आहे.
वचनात ज्ञान
तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीलातुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. (अनुवाद ४: ६)
वरील वचनावरून, आपण हे पाहतो की:
वचन पाळल्याने आपण ज्ञान व समज मध्ये वाढण्यास आपल्याला साहाय्य करेल.
वचन पाळल्याने आपण आपल्या भोवतालच्या लोकांवर प्रभाव टाकू. जेव्हा लोक ऐकतील आणि पाहतील की काय चालले आहे, ते म्हणतील, "काय महान राष्ट्र!" किती बुद्धिमान आणि समजदार!(अनुवाद ४:४)
स्तोत्रकर्त्याने स्तोत्र ११९:९८ मध्ये लिहिले,
तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा अधिक सुज्ञ करितात;
कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत.
सर्वात मोठा शत्रू हा आपल्या जिवाचा शत्रू आहे. देवाच्या वचनाकडून ज्ञान हे तुम्हाला सैताना पेक्षा अधिक ज्ञानी करेल.
शत्रूला वचन ठाऊक असेन आणि तो त्याचा संदर्भ देऊ शकेल परंतु त्यास वचनाच्या ज्ञानाचीसमज नाही- ते त्याच्यापासून लपलेले आहे. उदाहरणार्थ, सैतानाला हे ठाऊक असते तर, त्यानेयेशूला वधस्तंभावर खिळिले नसते. (१ करिंथ २: ८)
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे.
कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करितो. (स्तोत्र ११९:९९)
देवाच्या वचनाचे ज्ञान हे आपल्याला ह्या जगाच्या शिक्षकांपेक्षा अधिक बुद्धिमान करते ज्यांच्या पाठीशी त्यांचे सर्व काही ज्ञान आहे. वय सुद्धा ज्ञानी सह तुलना करू शकत नाही जे देवाच्या वचनाकडून येते.
खरे ज्ञान हे केवळ विद्या गोळा करण्याच्याही पलीकडे जाते. विद्ये मध्ये मूल्य आहे, परंतु त्या विद्येला आपल्या जीवनात जीवन-बदलणाऱ्या मार्गाने कसे लागू करावे-ते खरे ज्ञान आहे.
तुमच्या सभोवती पाहा, बुद्धिमान आणि शिक्षित लोक हे अनावश्यकरित्या ज्ञानी असे नाहीत, आणि कोणाला केवळ त्यांच्या जीवनाच्या आचरणात पाहण्याची गरज आहे हे जाणण्यास की विद्या ही जीवनासाठी बुद्धिमान निर्णयाची आवश्यकपणे शास्वती नाही.
प्रेषित पौलाने लिहिले, ख्रिस्त येशू हा आपल्यासाठीज्ञान असा झाला आहे. (१ करिंथ १: ३०)
पौल मुख्यतः काय म्हणत आहे की वचन हे आपले ज्ञान आहे.
ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ति वेचून सुज्ञता संपादन कर.
त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नति करील;
त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करील;
ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल; तुला सुंदर मुकुट देईल. (नीतिसूत्रे ४: ७-९)
जर तुम्हाला ज्ञान पाहिजे तर तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल. परमेश्वर ज्ञानाचे काही स्तर एक दान म्हणून देतो, परंतु जर तुम्हाला अधिक ज्ञान हवे असेन, तर तुम्हाला निश्चय करावा लागेल की काहीही झाले तरी ते तुम्ही प्राप्त कराल. ही काही एक वेळेची प्रक्रिया नाही; ही दैनंदिन प्रक्रिया आहे की देवाच्या वचनात ज्ञानाचा शोध घ्यावा.
पापकबुली:
(हे सतत संपूर्ण दिवसभर बोलत राहा.)
ख्रिस्त येशू हा माझ्यासाठी देवाचे ज्ञान असा केला गेला आहे.
Chapters