तूं आपल्या शत्रूंशी युद्ध करावयास जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नको; कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणिले तो तुझ्याबरोबर आहे. (अनुवाद २०: १)
जेव्हा तूं असंख्य लोक तुझ्याविरुद्ध आहे असे पाहतो, तेव्हा
भिऊ नको. युद्ध हे तुझे नाही; युद्ध हे परमेश्वराचे आहे. (२ इतिहास २०: १५)
मग अंमलदारांनी लोकांना म्हणावे, ज्याने नवे घर बांधून त्यांत प्रवेश केला नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यांस दुसरा कोणी गृहप्रवेश करील. (अनुवाद २०:८ )
भीती ही एका व्यक्तीपासून दुसऱ्याला व्यक्तीला, आणि गटाला सुद्धा दिली जाऊ शकते, भीती ही संसर्गजन्य आहे- ती एक वाईट बातमी आहे, परंतु तसेच विश्वास आहे आणि ती एक चांगली बातमी आहे.
सार्वत्रिक अभ्यासाने हे दाखविले आहे की मानव हे घामा मध्येरासायनिकसुचना देतात जेव्हा ते घाबरलेले किंवा तणावात आलेले असतात. अभ्यासाने हे सुद्धा दाखविले आहे की मानवी घाम मध्ये रासायनिक सुचना ह्या भावने विषयी माहिती देऊ शकतात जे त्याचा वास घेतात.
मग अमलदारांनी लोकांना म्हणावे, ज्याने नवे घर बांधून त्यांत प्रवेश केला नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.
द्राक्षमळा लावून त्याचे प्रथमफळ खाल्ले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोण त्याचे फळ खाईल. एखादया स्त्रीची मागणी करून तिच्याशी लग्न केले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धांत मेल्यास दुसरा कोणी तिच्याशी लग्न करील.
अमलदारांनी सैनिकांस आणखी म्हणावे की, भित्रा व भ्याड मनाचा कोण आहे? त्याने घरी परत जावे, नाही तर त्याच्या सोबत्यांच्या हृदयाचेही त्याच्यासारखेच पाणीपाणी होईल. अमलदारांचे लोकांशी हे बोलणे संपल्यावर त्यांनी लोकांवर सेनानायक नेमावे. (अनुवाद २०: ५-९)
अनुवाद २० मध्येआवश्यकतेची एक मनोरंजक यादी आपल्याला सापडते, त्यांच्याविषयी ज्यांना देवाच्या सेने मध्ये लढण्यास परवानगी देण्यात येईल.
तीचाळण्याची प्रक्रिया केली जात होती ही खात्री करण्यास कीकेवळ तेच जे त्यांच्या मनाने ठाम आहेत त्यांस आध्यात्मिकरित्या युद्धात भाग घेऊ दयावे.
तेथे चार गोष्टी होत्या ज्याने त्यांस परमेश्वराच्या युद्धात प्रभावी होण्यावर प्रभाव टाकला होता. ते ज्यांना युद्धापासून वेगळे करावे ते हे:
१. ते पुरुष ज्यांनी नुकतेच नवीन घर बांधण्याचे संपविले किंवा नवीन घर विकत घेतले आहे.
२. पुरुष ज्यांनी नुकतेच द्राक्षमळा लावलेला आहे.
३. पुरुष ज्यांची मागणी झाली आहे परंतु विवाह झालेला नाही आणि
४. पुरुष जे भित्रे (घाबरणारे) किंवा सरळपणे, ज्यांचे मन युद्धात नाही.
कोणताही पुरुष जो यापैंकी कोणत्याही वर्गात येतो, त्याने घरी जावे. त्यांच्याशिवाय असणे हे उत्तम आहे यापेक्षा की त्यांना ठेवावे आणि त्यांनी युद्धामध्ये इतर योद्ध्यांवर नकारात्मक प्रभाव टाकावा.
विचलित, असमर्पित, भित्रे, किंवा घाबरलेल्या व्यक्तींवर युद्धामध्ये भरवंसा ठेवता येत नाही. पुरुष जे उरले होते, त्यांच्यामधून त्यांना सेनेचा पुढारी म्हणून निवडायचे होते.
प्रेषित पौलाने करिंथ येथील मंडळीला लिहिले, "परमेश्वराची सेवा एकाग्रतेने करा." (१ करिंथ ७: ३५)
परमेश्वर अजून देखील अनुयायी शोधत आहे जे ह्या जगाची काळजीस त्यांच्यावर प्रभुत्व करू देणार नाहीत. तो त्यांना शोधत आहे जे सर्व काही त्याग करतात आणि त्याच्या मागे चालतात.
आध्यात्मिक युद्ध हे भीती द्वारे लढले नाही पाहिजे. आध्यात्मिक युद्ध हे विश्वासा द्वारे लढले पाहिजे.
Chapters