परमेश्वर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर नगर रक्षीत नाही तर पहारेकऱ्याचे जागणे व्यर्थ आहे. (स्तोत्रसंहिता १२७:१)
राजा शलमोनला यरुशलेम मध्ये त्याच्या राज्यकाळात देवाचे मंदिर बांधण्याचे सौभाग्य मिळाले. प्रकल्प हा अवाढव्य होता. प्रकल्पावर देखरेख करण्याच्या दरम्यान त्यांने चांगला अनुभव प्राप्त केला असेन. (२ इतिहास अध्याय ३ व ४ ची तुलना करा)
पहारेकरी हे जाणून होते की यरुशलेमेच्या भिंतीवर चढून उभे राहावयाचे आहे की तेथील रहिवाश्यांचे रक्षण करावे. ते स्पष्ट प्रमाण असे सेवा देत होते की त्या नगराचा शासक तेथील रहिवाश्यांविषयी काळजी करणारा आहे. त्यासोबत, कोणत्याही येणाऱ्या धोक्यासाठी इशारा देण्याच्या पद्धती मध्ये त्यांना प्रशिक्षण दिलेले होते. राजा म्हणून, शलमोनाने त्याच्या राज्यकाळादरम्यान यरुशलेम नगराचे रक्षण करण्यास पहारेकरी नियुक्त केले असले पाहिजे.
हे चांगले अनुभव राजा शलमोनला असताना सुद्धा, एक महत्वाचे सत्य त्यास प्रकट केले गेले: “परमेश्वर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर नगर रक्षीत नाही तर पहारेकऱ्याचे जागणे व्यर्थ आहे.”
उदाहरणार्थ, यरीहोच्या भिंतीचा विनाश ह्या मुद्द्याला अधिक चांगले स्पष्ट करेल. यरीहोच्या लोकांनी सुरक्षेसाठी त्यांच्या उंच भिंतींवर भरंवसा ठेवला होता. परंतु कारण की परमेश्वराने भिंत बांधली नव्हती, इस्राएली लोकांकडून एक मोठ्या आवाजाने ती भिंत पूर्णपणे कोसळली. जरी त्यांच्याकडे पहारेकरी पहारा देत होते, ते ह्या अचानक विनाश ला थांबवू शकले नाही कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर नव्हता. (यहोशवा ६:१-२१ शी तुलना करा)
ह्या वृत्तांतामध्ये प्रत्येक ख्रिस्ती लोकांसाठी येथे एक महत्वाचा धडा आहे. त्या अर्थाने की, प्रत्येक व्यक्तिगत त्यांचे जीवन घडवीत होते (आध्यात्मिकदृष्ट्या, कौटुंबिक, आयुष्यक्रम इत्यादी). आपण विश्वासाची आपली क्षमता वाढविण्याची इच्छा बाळगतो सार्वकालिक जीवनाच्या ह्या शर्यती मध्ये, की आपल्या कुटुंबाला आनंदी करावे, शैक्षणिकता व धर्मनिरपेक्ष आयुष्यक्रमात आपली निर्माण क्षमता वाढवावी. आपण एक घर बांधीत आहोत ज्यास सावधानपूर्वक योजनेची गरज आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने योजना करण्याच्या महत्वास निश्चित केले. त्याने म्हटले, “बुरुज बांधावयाची इच्छा असता पहिल्याने बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की काय हे पाहत नाही असा तुम्हांत कोण आहे? (लूक १४:२८). एक ज्ञानी व्यक्ती योजना करतो, जे यशा कडे नेते.
योजना करण्याच्या प्रक्रीये दरम्यान, हे महत्वाचे आहे की प्रभूला ताबा घेऊ द्यावे. जेव्हा आपण आपले श्रम त्याच्या हातात समर्पित करतो, तो आमचे मार्ग यशस्वी करेल (नीतिसूत्रे १६:३). विचारांच्या त्याच ओघामध्ये, नीतिसूत्रे ३:५,६ आपल्याला सल्ला देते की आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका; आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर करा, म्हणजे तो तुमचा मार्गदर्शक होईल.
परमेश्वर सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे आणि त्यास श्रेष्ठ ज्ञान व समज आहे. त्याने ज्ञानाने पृथ्वीचा पाया घातला आहे. अनुभवी शिल्पकार किंवा अभियंता सारखे, देवाला अतुलनीय ज्ञान व समज आहे की आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागास घडवावे. हे सूचित करते की प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या योजना देवाच्या हातात समर्पित केल्या पाहिजे. त्याच्या विरोधात जाणे, जे केवळ निराशेकडे नेईल कारण की घर हे कोसळेल त्या इमारती सारखे ज्यास उत्तम पाया नाही.
याची खातरी करण्यासाठी की आपले श्रम हे व्यर्थ नाहीत, आपण देवाबरोबर मिळून परिश्रम केले पाहिजे की मध्यस्थी व उपासने द्वारे त्यास बनविण्याच्या प्रक्रीयेमध्ये समाविष्ट करावे.
तुम्ही पहाटेस उठता, उशिराने विश्रांति घेता,
व कष्ट करून अन्न खाता,
पण तुमचे हे करणे व्यर्थ आहे;
तोच आपल्या प्रियजनांस लागेल ते झोपेतही देतो. (स्तोत्रसंहिता १२७:२)
आपण खातरीने हा अनुमान लावू शकतो की शलमोनाने कठीण परिश्रमास निरुपयोगी ठरविले नाही कारण त्याची काही नीतिसूत्रे कठीण परिश्रम करणाऱ्या कामकऱ्यांस पुरस्कार देतात जे पहाटे लवकर उठतात (नीतिसूत्रे ६:६-११). ह्या स्त्रोताच्या सुरुवातीच्या ओळीपासून, आपण हे ओळखू शकतो की शलमोन त्याचा संदर्भ देत होता की अनेक लोक त्यांचा विश्वास त्यांच्या कठीण परिश्रमात ठेवतात त्याच प्रमाणे अवघडपणा जो देवा वर अवलंबून राहण्याऐवजी पूर्णपणे स्वतःवर अवलंबून राहण्याने येतो (कष्ट करून अन्न खाता).
अगोदरच उल्लेख केलेल्या व्यक्तीवर तो त्याचे मत व्यक्त करतो, बांधकाम करणारे, किंवा पहारेकरी, हे दोघेही पुढील कार्यक्रम मोठ्या प्रमाणात लागू करतात. स्वतःला व कोणाच्या कुटुंबासाठी दररोज अन्न व वस्त्र पुरविण्याच्या ध्येयासाठी जर केवळ कोणाचे कठीण परिश्रम असेल, तर स्त्रोत्रकर्ता त्यास जगण्याचा कनिष्ठ मार्ग असे मानतो. कोणाच्या नोकरी मध्ये परमेश्वरावर भरंवसा ठेवणे हे उत्तम जीवनासाठी पहिले पाऊल आहे.
लोक जे त्यांच्या स्वतःच्या कार्यावर त्यांच्या अवलंबून राहण्याद्वारे वाईटरित्या प्रभावित झाले आहेत ते निराशेला तोंड देतात. देवाचा आशीर्वाद हा त्याच्या प्रियजनांसाठी आहे की त्यांनी शांतपणे झोप घेण्यास समर्थ व्हावे. त्यांनी याची खातरी केली पाहिजे की देवाची बोटे ही सर्व वेळेला कार्यरत आहेत आणि शिवाय, त्याचे नेत्र हे त्यांच्यावर आहेत जरी जेव्हा ते झोप घेत आहेत.
आणखी एक दखल घेतली तर, संतुलन राखण्यासाठी, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही (नीतिसूत्रे १०:२२). कष्ट करणे हे व्यर्थ आहे, पहाटे लवकर उठणे आणि उशिरा विश्रांति घेण्यास जाणे. हे वचन देवाचा आशीर्वाद स्वीकारते की तो कोणाला श्रीमंत करतो. आपल्याला मद्याच्या आहारी जाण्याची गरज नाही की आपल्या गरजा पूर्ण कराव्यात. ते त्याऐवजी आपल्या स्वास्थ्यला खराब करेल. निर्मितीपूर्ण जीवनाची किल्ली ही देवापासून आहे. तो त्याच्या प्रियजनांस विश्रांति देत आशीर्वाद देतो.
तथापि, देवाच्या आशीर्वादापासून लाभ घेण्यासाठी त्याची वाणी व आज्ञेच्या प्रति पूर्ण आज्ञाधारक असण्याची गरज आहे. (अनुवाद २८:१ शी तुलना करा).
3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत.
आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या
भात्यातील बाणांसारखी आहेत.
5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणी [a] त्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.(स्तोत्रसंहिता १२७:३-५)
देवाने प्रथम जोडीला निर्माण केले या इच्छेने की मुलेबाळे असावीत. बायबल योग्यरीत्या म्हणते की, “मुलेबाळे ही परमेश्वरापासून वारसा आहेत,” याचा अर्थ काय आहे?
कल्पना करा की एक मित्र तुम्हांला त्याच्यासाठी खूप संपत्ती सांभाळण्यास सांगतो. तुम्हांला कसे वाटेल? तुमचा आदर होईल, की तो तुम्हांवर भरंवसा ठेवतो. परंतु तुम्ही याविषयी चिंतीत राहाल की तुम्ही ही संपत्ती कशी सुरक्षित ठेवू शकाल? परमेश्वर, आपला घनिष्ट मित्र, आई-वडिलांना काहीतरी देतो की त्याची काळजी घ्यावी जे पैशा पेक्षा फारच मौल्यवान आहे. त्यांच्या मुलाबाळांचे कल्याण व आनंदासाठी तो त्यांना सोपवितो.
कोणत्या काही गोष्टी आहेत ज्या आई-वडील करू शकतात की त्यांच्या मुलाबाळांना साहाय्य करावे की परमेश्वरास प्रेम करण्यास शिकावे? त्यांच्या मुलाबाळांना नैतिक धोक्यापासून ते कसे वाचवू शकतात? काही पाऊले जी आई-वडील उचलू शकतात त्यांचा विचार करा.
१. देवाच्या साहाय्यासाठी प्रार्थना करा
मानोहा व त्याच्या पत्नीने स्थित केलेल्या उदाहरणांकडे लक्ष द्या, जे शमशोन चे आई-वडील झाले. मानोहाने जेव्हा जाणले की तो व त्याच्या पत्नीला पुत्र मिळणार आहे, त्याने परमेश्वराकडे विनंती केली की, त्या बाळाचे पालनपोषण कसे करावे. (शास्ते १३:८)
२. आदर्शा द्वारे शिकवा
तुम्ही काय बोलता ते महत्वाचे आहे; तथापि, तुम्ही जे करता त्याचा तुमच्या लेकरावर शक्यतो मोठा परिणाम होतो. आपण याविषयी खातरी बाळगू शकतो की योसेफ व मरीयेने त्यांच्या मुलाबाळांना, त्यामध्ये येशू सुद्धा आहे, त्यांच्यासाठी उत्तम उदाहरण ठेवले होते. योसेफ कठीण परिश्रम करीत होता की त्याच्या कुटुंबाला साहाय्य करावे. त्यासोबत, योसेफाने त्याच्या घराण्याला प्रोत्साहन दिले की आध्यात्मिक गोष्टींची प्रशंसा करावी. (अनुवाद ४:९, १०)
जरी योसेफास नियमशास्त्रा द्वारे याची आवश्यकता नव्हती की त्याच्या कुटुंबाला त्याच्याबरोबर वर्षानुवर्षे यरुशलेमेस वल्हांडण सण साजरा करण्यास घेऊन जावे, तरी त्याने तसे केले (लूक २:४१-४२). त्याच्या समयी काही वडिलांनी अशी कौटुंबिक यात्रा गैरसोईची, जास्त वेळ घेणारी, व खर्चाची असे पाहिले असेन. तरीही, योसेफाने स्पष्टपणे आध्यात्मिक गोष्टींची प्रशंसा केली व त्याच्या लेकरांना तसेच करण्यास शिकविले होते. तसेच, मरीयेस पवित्र शास्त्र चांगलेच माहित होते. तिचे बोलणे व कृती द्वारे, यात काही शंका नाही की तिच्या लेकरांना देवाच्या वचनावर प्रीति करण्यास तिने शिकविले होते.
३. तुमच्या लेकरांना साहाय्य करा की चांगले सहयोगी असावे
आई व वडील या दोघांना ठाऊक असावयास हवे की त्यांची लेकरे कोणाबरोबर सहयोग ठेवतात व ते काय करीत आहेत? त्यामध्ये हे सुद्धा आहे की आई-वडिलांनी हे समजावे की त्यांची मुलेबाळे सामाजिक माध्यम व मोबाईल फोन द्वारे कोणाबरोबर संभाषण करीत असतात. मुलेबाळे कसा विचार व कृती करतात त्यावर ते सहयोगी मोठा प्रभाव करू शकतात. (१ करिंथ. १५:३३)
४. लेकरांना जितक्या लवकर शक्य असेल तेव्हा प्रशिक्षण देण्यास सुरु करा
जितक्या लवकर आई-वडील त्यांच्या लेकरांना प्रशिक्षण देतील, तितके उत्तम (नीतिसूत्रे २२:६). तीमथ्य चा विचार करा, जो त्याच्या वेळेत प्रेषित पौला बरोबर प्रवास करीत होता. तीमथ्य ची आई युनीके, व आजी लोईस ने त्यास “बालपणापासून” प्रशिक्षण दिले होते. (२ तीमथ्य १:५; ३:१५)
सैनिकांच्या हातातील बाणा बरोबर लेकरांची तुलना केली आहे, ते एक चिन्ह आहे की मुलेबाळे ही आध्यात्मिक शस्त्र आहेत. जर मुलाबाळांना देवासाठी तयार केले नाही, तर शत्रू त्यांचे अपहरण करेल व त्यांचा वापर देवाच्या राज्याच्या विरोधात करेल.
ह्या ज्ञानी पावलांचे अनुकरण करून की आपल्या मुलाबाळांचे रक्षण करावे हे प्रकट करते की आपल्या वारसा बद्दल आपण किती हर्ष करतो. आई-वडील हे आनंदी असतील जसे स्त्रोत्रकर्ता गीतास संपवितो: “ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य! वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते ओशाळणार नाहीत.”
अब्राहामाचे हे आशीर्वाद आहेत, “तुझे बीज तुझ्या शत्रूंच्या वेशी हस्तगत करितील”; आणि एका अर्थाने परमेश्वराच्या सर्व प्रियजनांसाठी हा आशीर्वाद आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०